शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

ओल्या दुष्काळासंदर्भात फडणवीसांची गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 19:28 IST

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून अकरा दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही...

मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून अकरा दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही. सत्तेत आणि मुख्यमंत्रीपदात 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना अडून बसली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. तर अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, यासाठी शाहांची भेट घेतल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी ( एनडीआरएफ ) चे अध्यक्षपद गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आहे. आपत्ती निवारण निधीचे वाटप करण्याचे अधिकार शहा यांच्याकडे असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन महाराष्ट्राला मदत करण्याची विनंती केली आहे. 

राज्यात एकीकडे सत्तासंघर्ष सुरु आहे तर दुसरीकडे परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे राज्यात कुणाचा सरकार येणार व शेतकऱ्यांना मदत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ चर्चा झाली. राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, यासाठी शहांची भेट घेतल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

 

एखांद्या राज्यात शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपती आल्यास तेथील शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम राज्य सरकारचे असते. या सर्वाची विशेष जवाबदारी राज्य कृषिमंत्री यांच्यावर असते. मात्र मदत करण्यासाठी लागणारी रक्कम राज्यसरकारकडून पुरवणे किंवा आपत्ती मोठी असल्यास केंद्र सरकारकडे राज्य सरकार मदत मागू शकतो.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीdroughtदुष्काळ