शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 08:46 IST

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदेंनी केला हल्लाबोल, मागील सरकारने सर्व प्रकल्प बंद केले होते असा आरोप

मुंबई - आम्हाला शिव्याशाप देणं, आरोप करतात, मला कलंकनाथ नाव दिलं परंतु महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या नावाला कलंक ते आहेत. हिऱ्याच्या पोटी गारगोटी असं मी म्हणतो, बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्यांनी सोडले तेव्हा खऱ्याअर्थाने सर्व संपले अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय. योग्यवेळी मी बोलेन. आम्ही आतापर्यंत काही मनावर घेतले नाही. सरकार स्थापन झाल्यापासून नवनवीन उपाध्या आम्हाला दिल्या आहेत. जर आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत राहिलो तर कामावर आमचे दुर्लक्ष होईल त्यामुळे तिकडे लक्ष देत नाही. आयतखाऊ पेक्षा लाडका भाऊ कधीही चांगला, आतापर्यंत घरात बसूनच सर्व चाललं होतं आणि आजही सुरू आहे. ज्या जनतेने कौल दिला होता त्याच्याशी विश्वासघात कुणी केला हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे झालेल्या लोकसभेत आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवली. त्यांच्यापेक्षा स्ट्राईक रेट, मतांची टक्केवारी, जागा हे जनतेने दाखवून दिलंय असं त्यांनी सांगितले. 

तसेच तुम्ही जर स्वार्थासाठी, खुर्चीसाठी वैचारिक विचार सोडाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही. काँग्रेसच्या व्होटबँकवर ते मोठे होण्याचा प्रयत्न करतायेत. आम्ही टीमवर्क म्हणून काम करतोय. महायुती जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. रोज सकाळचे भोंगे दाखवण्यापेक्षा लोकांच्या जीवनात काय काय बदल होतायेत, विकास काय काय झालाय हे दाखवला तर तुमचा टीआरपी वाढेल. महाराष्ट्राचं लोकमत आमच्या बाजूने आहे असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.  न्यूज १८ लोकमतला त्यांनी मुलाखत दिली.

दरम्यान, मागील सरकारने ज्या योजना, प्रकल्प बंद केले होते मात्र या २ वर्षात आम्ही सर्व प्रकल्प पुन्हा सुरू केले. मेट्रो कारशेड, समृद्धी महामार्ग, नागपूर, पुणे मेट्रो, कोस्टल रोड यासारखे सर्व प्रकल्प आम्ही वेगाने पुढे नेतोय. वेळेच्या आधी हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मोठ्या प्रमाणात उद्योग येतायेत. रोजगार उपलब्ध होतायेत. परदेशी गुंतवणूक ५२ टक्के एकट्या महाराष्ट्रात आहेत. विकास आणि कल्याणकारी योजना याची सांगड आम्ही घालतोय. विविध योजना आमच्या सरकारने लोकांसाठी आणल्या आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात कधीही इतक्या योजना आल्या नाहीत. कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी योजना आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंब सुखी, समाधानी आनंदी कसं होईल यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे येणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवात आमचे सर्व घटक आमच्या कामाची पोचपावती देतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४