शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

"एकट्या शिंदेंची जबाबदारी नाही"; निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, CM फडणवीस स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:04 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाच्या स्थगितीवर बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.

CM Devendra Fadnavis on Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या काही निर्णयांवरुन मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या काही निर्णयांना फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. तसेच एकनाथ शिंदेंनी केलेल्या नियुक्त्या फडणवीस सरकारने रद्द केल्या होत्या. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार हे तिघांच्या समन्वयाने चालणारे सरकार असल्याचे म्हटलं आहे. स्थगिती संदर्भात राजकीय वर्तुळात असलेल्या चर्चांवर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांना आणि नियुक्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचे म्हटलं जात आहे. नुकतेच एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय आशर यांना मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून हटवल्याचे समोर आलं. त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. खालच्या स्तरावर चर्चा करुनच काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"गेल्या काही काळापासून माध्यमांमध्ये फडणवीसांनी शिंदेंच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली ही बातमी आवडती झाली आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही. जे जे राज्याच्या हिताचे आहे ते सुरु करत असताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी आणि अजित पवार होतो. त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत त्यांची जबाबदारी ही एकट्या एकनाथ शिंदेंची नाही आमच्या तिघांची आहे. प्रशासनात खालच्या स्तरावर गडबड होते. खालच्या स्तरावर चर्चा करुनच काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर स्थगिती दिली तरी फडणवीसांचा दणका असं म्हटलं जात. एखाद्या खात्याच्या मंत्र्यांने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्थगिती दिली तरी फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या खात्याला स्थगिती दिली असं म्हटलं जातं. अजित पवार थेट अटॅक करतात त्यामुळे त्यांच्या वाटेला कोणी जात नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"त्यामुळे एक गोष्ट सांगतो की हे समन्वयाने चालणारे सरकार आहे. या सरकारमध्ये आम्ही सगळे निर्णय तिघे मिळून घेतो. मंत्रिमंडळाच्या काही बैठका होतात. त्यापैकी काही बैठकांना अजित पवार असतात तर काही बैठकांना एकनाथ शिंदे असतात. तर काही बैठकांना दोघेही असतात. यावर जो आला नाही तो नाराज असं म्हटलं जातं. माध्यमांना क्वालिटीच्या बातम्या सापडत नाहीये आणि  विरोधकांना क्वालिटीची टीका करता येत नाहीये, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे