शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

"एकट्या शिंदेंची जबाबदारी नाही"; निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, CM फडणवीस स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:04 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाच्या स्थगितीवर बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.

CM Devendra Fadnavis on Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या काही निर्णयांवरुन मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या काही निर्णयांना फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. तसेच एकनाथ शिंदेंनी केलेल्या नियुक्त्या फडणवीस सरकारने रद्द केल्या होत्या. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार हे तिघांच्या समन्वयाने चालणारे सरकार असल्याचे म्हटलं आहे. स्थगिती संदर्भात राजकीय वर्तुळात असलेल्या चर्चांवर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांना आणि नियुक्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचे म्हटलं जात आहे. नुकतेच एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय आशर यांना मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून हटवल्याचे समोर आलं. त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. खालच्या स्तरावर चर्चा करुनच काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"गेल्या काही काळापासून माध्यमांमध्ये फडणवीसांनी शिंदेंच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली ही बातमी आवडती झाली आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही. जे जे राज्याच्या हिताचे आहे ते सुरु करत असताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी आणि अजित पवार होतो. त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत त्यांची जबाबदारी ही एकट्या एकनाथ शिंदेंची नाही आमच्या तिघांची आहे. प्रशासनात खालच्या स्तरावर गडबड होते. खालच्या स्तरावर चर्चा करुनच काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर स्थगिती दिली तरी फडणवीसांचा दणका असं म्हटलं जात. एखाद्या खात्याच्या मंत्र्यांने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्थगिती दिली तरी फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या खात्याला स्थगिती दिली असं म्हटलं जातं. अजित पवार थेट अटॅक करतात त्यामुळे त्यांच्या वाटेला कोणी जात नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"त्यामुळे एक गोष्ट सांगतो की हे समन्वयाने चालणारे सरकार आहे. या सरकारमध्ये आम्ही सगळे निर्णय तिघे मिळून घेतो. मंत्रिमंडळाच्या काही बैठका होतात. त्यापैकी काही बैठकांना अजित पवार असतात तर काही बैठकांना एकनाथ शिंदे असतात. तर काही बैठकांना दोघेही असतात. यावर जो आला नाही तो नाराज असं म्हटलं जातं. माध्यमांना क्वालिटीच्या बातम्या सापडत नाहीये आणि  विरोधकांना क्वालिटीची टीका करता येत नाहीये, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे