शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात पाढे वाचनात बदल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 12:34 IST

गणिताच्या पुस्तकातील संख्या वाचनात करण्यात आलेल्या काही बदलाबाबत सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरु आहे.

ठळक मुद्दे‘बालभारती’तर्फे इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात बदलनवीन प्रयोग म्हणून त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे उचित ठरेल, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांचे मत

पुणे : इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात संख्या वाचनात काही बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना समजण्यासाठी सोपे जावे यासाठी नवीन प्रयोग म्हणून त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे उचित ठरेल, असे मत शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे; परंतु शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींकडून याबाबत सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा केली जात आहे.‘बालभारती’तर्फे इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून, गणित विषयासह सर्वच विषयांचा अभ्यासक्रम बदललेला आहे. त्यात प्रामुख्याने गणिताच्या पुस्तकात २१ ते ९९ या संख्यांचे वाचन व शब्दात लेखन यात बदल केला आहे. सत्त्याण्णवऐवजी नव्वद सात असे शिकवावे; तसेच अठ्ठ्याण्णव, त्र्याण्णव, त्र्याहत्तर, सत्त्याऐंशी, त्रेसष्ट आदी पाठ करावे लागत नाहीत; तसेच लिहावे लागत नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी शिकविताना वीस सात, चाळीस तीन अशा प्रकारचे वाचन व लेखन शिकवावे; परंतु काही विद्यार्थी पारंपरिक पद्धतीने आधीच अठ्ठावीस, सत्तावीस हे शब्द शिकले असतील. त्यामुळे दोन्ही प्रकारचे शब्द ग्राह्य धरावेत. शब्दात संख्या लिहिताना विद्यार्थ्यांना नवी पद्धत सोपी असल्याचे अनुभवता येईल, असे ‘बालभारती’तर्फे पुस्तकाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन प्रयोग म्हणून याकडे पाहिले पाहिजे, असे गणित विषयाच्या अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.........जोडाक्षरे असणारे शब्द हे मुलांच्या मनात गणिताची नावड किंवा भीती निर्माण करू शकतात. त्यामुळे मुलांना सोप्या पद्धतीने गणितातील अंक समजून सांगण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला आहे. इंग्रजी भाषेसह कानडी, तेलगु, मल्याळी व तमीळ या दक्षिण भारतीय भाषांमध्ये याच प्रकारे संख्या वाचन केले जाते. काही अंकांबाबत विद्यार्थी गोंधळून जातात. उदा.७८, २५, २९ या अंकांचा उच्चार केल्यानंतर नेमकी कोणती संख्या पुढे आहे, हे विद्यार्थ्यांना सहज समजत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारा संभ्रम दूर करण्यासाठी या पद्धतीने गणित शिकवावे, अशा सूचना शिक्षकांना देण्यात येत आहे. परंतु, याच पद्धतीने शिक्षकांनी शिकवावे असा कोणताही अट्टहास शिक्षण विभागाने धरलेला नाही.- सुनील मगर, संचालक ,बालभारती........एक नवीन प्रयोग म्हणून या बदलाकडे पाहण्यास काहीही हरकत नाही; परंतु विद्यार्थी समजणे आणि शिक्षकांना शिकवणे सोपे जाईल, त्या पद्धतीने गणिताच्या अंकांची ओळख करून द्यावी. शिक्षण क्षेत्रात असे प्रयोग होण्याची आवश्यकता आहे. - रवी वरे, गणिताचे अभ्यासक

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणSchoolशाळाTeacherशिक्षक