शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

'वंचित'ची राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीत सामील होण्याची शक्यता धुसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 11:32 IST

राज्यातील नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची वाट न पाहता निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी केल्या आहेत. त्यामुळे वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता दिवसेंदिवस धुसर होत आहेत.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाला गांभीर्याने घेतले आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक जागांवर आघाडीला जागा गमवाव्या लागल्या. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी वंचितला सोबत घेणार हे निश्चित मानले जात होते. परंतु, अजुनही योग्य दिशेने बोलणी झाली नसून राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या आघाडीत वंचित सामील होण्याच्या आशा धुसर दिसत आहे.

प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सुरुवातीला ४० जागांची ऑफर दिली होती. त्याचवेळी राज्यभर इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतींचा सपाटा सुरूच ठेवला होता. त्यानंतर आंबेडकरांनी काँग्रेसला १४४ जागांची ऑफर दिली. तसेच राष्ट्रवादीची साथ सोडण्याची अट ठेवली. एकूणच आंबेडकरांकडून काँग्रेसला मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळे कार्यकर्ते नाराज आहेत. अशा स्थितीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राज्य पातळीवरील नेत्यांना सूचना केल्या आहेत.

राज्यातील नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची वाट न पाहता निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी केल्या आहेत. त्यामुळे वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या आशा दिवसेंदिवस धुसर होत आहेत. तसेच प्रकाश आंबेडकरांचा प्रभाव कमी करण्यासाठी राज्यातील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे उपाययोजनाही सुचविल्याचे समजते.

दलित आणि मुस्लीम मतदारांना एकत्र करून प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. या आघाडीचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. आघाडीच्या डझनभर जागा वंचितमुळे पडल्या. परंतु, हा प्रभाव कमी करण्यासाठी दलित आणि मुस्लिमांना अधिक प्रमाणात उमेदवारी दिल्यास आंबेडकरांची ताकत कमी करणे शक्य असल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राखीवपेक्षा २० टक्के अधिक जागांचा मागासर्गीयांना आणि मुस्लिमांना देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या उपाय योजनेमुळे देखील वंचित काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणे शक्य नसल्याचे स्पष्ट होते.