शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यातील ‘सीईटी’चा निर्णय अजून अधांतरीच; अद्याप सर्वेक्षणच सुरू : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 15:24 IST

पुढील सात-आठ दिवसांत त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर निर्णय

ठळक मुद्देआणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास बारावी गुणांवरच प्रवेश दिला जाण्याचे संकेत

पुणे : राज्यात एमएचटी-सीईटी देणारे पाच ते साडे पाच लाख विद्यार्थी आहे. त्यांची परीक्षा घ्यायची असल्यास जिल्हा, तालुका स्तरावर त्यांना आणू शकतो का, त्याठिकाणची यंत्रणा, शारीरिक अंतर ठेवून त्यांची आसन व्यवस्था करणे अशा काही मुद्यांवर सीईटी सेलचे आयुक्तांकडून सर्वेक्षण केले जात आहे. पुढील सात-आठ दिवसांत त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी स्पष्ट केले. तसेच आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास बारावी गुणांवरच प्रवेश दिला जाण्याचे संकेत सामंत यांनी दिले.

सामंत यांनी गुरूवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. राज्य शासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर तृतीय वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला असून त्यावर सर्वोच्च न्यायालयातही प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. शुक्रवारी त्यावर निकाल येणे, अपेक्षित आहे. यावर बोलताना सामंत म्हणाले, न्यायालयाचा निकाल आल्यानंतर त्यानुसार भुमिका घेतली जाईल. पण कोविड परिस्थितीमुळे परीक्षा न घेण्याची शासनाची भुमिका आहे. तेच प्रतिज्ञापत्रातही आहे. परीक्षाच घेणार नाही, असे कुठल्याही जीआरमध्ये नाही. काही जणांना त्याबाबत गैरसमज पसरविले. परिस्थिती निवळल्यानंतर गुणांकन सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल.’सीईटीबाबत अद्यापही शासनाने ठोस भुमिका घेतलेली नाही. त्याबाबत बोलताना सामंत यांनी सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगितले. ‘सीईटी यंत्रणा स्वायत्त असल्याने आयुक्तांकडून सर्वेक्षण केले जात आहे. पाच ते साडे-पाच लाख विद्यार्थ्यांना जिल्हा, तालुका किंवा विभागीय स्तरावर आपण आणु शकतो का, ही अडचण आहे. काही संस्थांच्या शाळा, वसतिगृहात क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्याठिकाणी परीक्षासाठी संगणक व इतर यंत्रणा सक्षम आहे की नाही, याची पडताळणी केली जात आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. आणीबाणीची परिस्थिती आली तर बारावीच्या गुणांवरच प्रवेश देण्याचा विचार केला जाऊ शकतो. मात्र अनेक विद्यार्थी बारावीऐवजी सीईटीसाठी चांगला अभ्यास करता. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. या सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय होईल,’ असहीे त्यांनी स्पष्ट केले.-----------निर्णय कुलगुरूंच्या चर्चेनंतरचमंत्री झाल्यापासून आजपर्यंत प्रत्येक निर्णय घेताना सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा केली आहे. मागील पाच वर्षात जेवढी चर्चा कुलगुरूंशी झाली नसेल, तेवढ्या बैठका, चर्चा मी मंत्री झाल्यावर केली आहे. काही लोक धादांत खोटे बोलून त्याचे भांडवल करत असल्याची टीका सामंत यांनी विरोधकांवर केली.--------------

टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतexamपरीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार