शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

राज्यातील हिंसाचारामागं मोठी शक्ती; भाजपा-मनसे युतीबाबतही रावसाहेब दानवेंचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 20:24 IST

विधानसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट कौल जनतेने दिला पण दगाफटका करून अमर अकबर अँथनीचे सरकार स्थापन केले असा टोला रावसाहेब दानवेंनी लगावला.

नाशिक – त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. अमरावती, नांदेड मालेगाव येथे हिंसक आंदोलन सुरु झालं आहे. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र राज्यातील या वातावरणावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. राज्यातील हिंसाचारामागं एखादी मोठी शक्ती आहे असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी केला आहे.

नाशिक येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रावसाहेब दानवेंनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अतिक्रमण हटवलं जात आहे. त्रिपुरात मस्जिद पाडली असेल तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले? यामागे एखादी शक्ती आहे. संजय राऊतांचा आढावा घ्यायचा असेल तर वेगळी प्रेस घ्यावी लागेल. विधानसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट कौल जनतेने दिला पण दगाफटका करून अमर अकबर अँथनीचे सरकार स्थापन केले. या राज्यातली जनता सरकारवर नाराज आहे. २०२४ मध्ये भाजपा स्वतंत्र लढून तिन्ही पक्षांना चारी मुंड्या चित करून दाखवू असा इशारा त्यांनी दिला आहे.

तसेच भाजपामनसे युतीबाबत दानवेंनी सूचक विधान केले आहे. मनसे जो पर्यंत परप्रांतीय मुद्द्याबाबत बदल करत नाही तो पर्यंत मनसे भाजप युती शक्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी भाजपा कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात गेले. शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या. सरकारने दोन वेळेस पंचनामे केले पण मदत मिळाली नाही. दुष्काळ जाहीर केलाच नाही. विमा देखील शेतकऱ्याला मिळाला नाही. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. कर्मचाऱ्यांचे कुटुंब शासनाच्या दारात बसून मागण्या मागत आहेत. सरकारकडून समाधानकारक चर्चा नाही. मेडिकलच्या परीक्षा दोनदा पुढे ढकलल्या. दिलेल्या तारखेला शाळा सुरु झाल्या नाहीत. मंत्र्यांचे नातेवाईक ड्रग माफियांच्या धंद्यात आहेत आणि चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणणे सुरू आहे अशा वेगवेगळ्या विषयांवर रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेMNSमनसेBJPभाजपा