शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

राज्यातील हिंसाचारामागं मोठी शक्ती; भाजपा-मनसे युतीबाबतही रावसाहेब दानवेंचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 20:24 IST

विधानसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट कौल जनतेने दिला पण दगाफटका करून अमर अकबर अँथनीचे सरकार स्थापन केले असा टोला रावसाहेब दानवेंनी लगावला.

नाशिक – त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. अमरावती, नांदेड मालेगाव येथे हिंसक आंदोलन सुरु झालं आहे. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र राज्यातील या वातावरणावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. राज्यातील हिंसाचारामागं एखादी मोठी शक्ती आहे असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी केला आहे.

नाशिक येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रावसाहेब दानवेंनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अतिक्रमण हटवलं जात आहे. त्रिपुरात मस्जिद पाडली असेल तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले? यामागे एखादी शक्ती आहे. संजय राऊतांचा आढावा घ्यायचा असेल तर वेगळी प्रेस घ्यावी लागेल. विधानसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट कौल जनतेने दिला पण दगाफटका करून अमर अकबर अँथनीचे सरकार स्थापन केले. या राज्यातली जनता सरकारवर नाराज आहे. २०२४ मध्ये भाजपा स्वतंत्र लढून तिन्ही पक्षांना चारी मुंड्या चित करून दाखवू असा इशारा त्यांनी दिला आहे.

तसेच भाजपामनसे युतीबाबत दानवेंनी सूचक विधान केले आहे. मनसे जो पर्यंत परप्रांतीय मुद्द्याबाबत बदल करत नाही तो पर्यंत मनसे भाजप युती शक्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी भाजपा कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात गेले. शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या. सरकारने दोन वेळेस पंचनामे केले पण मदत मिळाली नाही. दुष्काळ जाहीर केलाच नाही. विमा देखील शेतकऱ्याला मिळाला नाही. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. कर्मचाऱ्यांचे कुटुंब शासनाच्या दारात बसून मागण्या मागत आहेत. सरकारकडून समाधानकारक चर्चा नाही. मेडिकलच्या परीक्षा दोनदा पुढे ढकलल्या. दिलेल्या तारखेला शाळा सुरु झाल्या नाहीत. मंत्र्यांचे नातेवाईक ड्रग माफियांच्या धंद्यात आहेत आणि चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणणे सुरू आहे अशा वेगवेगळ्या विषयांवर रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेMNSमनसेBJPभाजपा