शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

केंद्र, राज्य सरकार टिष्ट्वटरवर चालते : तटकरे

By admin | Updated: August 18, 2015 23:10 IST

जोरदार टीका : महामार्ग डागडुजीबाबत सोयरसुतकच नाही

चिपळूण : कोकणवासीयांचा लाडका गणेशोत्सव महिन्यावर आला असताना मुंबई - गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. केंद्र व राज्य सरकारला त्यांचे सोयरसुतक नाही. आघाडी सरकार एक महिन्यापूर्वी प्रत्यक्ष पाहणी करुन महामार्गाची डागडूजी करत असे. परंतु, या सरकारने अद्याप कोणत्याही हालचाली केलेल्या नसल्याचे सांगून हे सरकार टिष्ट्वटरवर चालते, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. केंद्र व राज्य सरकारला जनतेचे प्रश्न समजले नाहीत. त्यांना प्रश्नांचे गांभीीर्य नाही. सहकार समजला नाही. सभागृहात मुख्यमंत्री अनेक प्रश्नांची उत्तरे न देता ती प्रलंबित ठेवतात. या सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. अच्छे दिन आयेंगेचे स्वप्न दाखवून यांनी लोकांना गंडवले. आता आम्हा सर्वांना एकत्र यायला हवे. नियतीने आम्हाला तशी संधी दिली आहे. आम्ही सर्व विरोधक एकत्र येऊन याचा मुकाबला करू, असे तटकरे यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांवरील आरोपांबाबत ते म्हणाले, आम्ही केव्हाही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे. सत्य जनतेसमोर यायला हवे, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई - गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. आम्ही सत्तेत असताना गणेशोत्सवाच्या काळात महिनाभर अगोदर रस्त्यावर उतरुन पाहणी करत होतो. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजना केली जात होती. परंतु, या सरकारने अद्याप काहीही केलेले नाही. जे मंत्री आहेत त्यांना आपले अधिकार समजत नाहीत. ते काम करत नाहीत. त्यामुळे जनतेला वेठीस धरले जात आहे. आंबा व काजू नुकसानीबाबत ते म्हणाले, आघाडी सरकारने हेक्टरी २५ हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. तेच आता सुरु आहे. मार्चमधील अधिवेशनात आपण आंबा नुकसानीबाबत भूमिका मांडली होती. त्यानंतर तीन महिन्यांनी जूनमध्ये निर्णय जाहीर केला. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. मराठवाड्यात दुष्काळ पडला आहे. तेथे सरकारने १४ सप्टेंबरपर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस जेलभरो आंदोलन करणार आहे. त्याच धर्तीवर कोकणातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन मी स्वत: कोकणात येऊन राष्ट्रवादीचे आंदोलन करेन. आपल्याकडील कुटुंब व्यवस्थेच्या प्रश्नामुळे २० टक्के रक्कम शासनाला परत जाते, यालाही त्यांनी दुजोरा दिला. राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्यावर कारवाई करण्याबरोबरच बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्याबाबत समाजाच्या विविध स्तरावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पुरस्कार कोणाला द्यायचा, हा सरकारचा अधिकार आहे. परंतु, ज्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत त्यावरुन जनतेच्या काही अपेक्षा आहेत. त्यामुळे सरकारने आपली भूमिका जाहीर करायला हवी, असे तटकरे यावेळी बोलताना म्हणाले. (प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. या पक्षाला १९९९ नंतर प्रथमच विरोधी पक्षात बसण्याची संधी मिळाली. आता प्रदेशाध्यक्ष म्हणून चांद्यापासून बांध्यापर्यंत पक्ष बांधणी करण्याचे अवघड आव्हान आपल्यासमोर आहे. शासन जे निर्णय घेते त्याविरोधात प्रभावीपणे आपली भूमिका मांडली जाईल. विधान परिषदेत आम्ही सरकारचा मुकाबला करतो. परंतु, विधानसभेत सरकार आपला आवाज दाबते. पराभवानंतर कार्यकर्त्यांचे मनोबल खचले होते. या कार्यकर्त्यांना धीर देऊन त्यांना उभारी देऊन पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करते. कोकणातही आमची स्थिती मजबूत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादी प्रथम क्रमांकावर आहे, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.मुंबई-गोवा महामार्गाकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. आंबा नुकसान भरपाई मिळाली नाही तर आंदोलन करणार.भाजप युती सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास.संघटना मजबूत करणार.आमदार रमेश कदम यांच्यावर कारवाई अटळ.बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्याबाबत सरकारने भूमिका जाहीर करावी.