शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
2
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
3
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
5
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
6
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
7
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
8
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
9
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
11
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
12
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
13
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
14
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
15
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
16
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
17
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
18
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
19
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
20
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा

सेन्सॉर प्रेक्षकांनी लावायला हवे; सरकारने नव्हे : सय्यद असगर वजाहत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 20:22 IST

लेखक किंवा नाटककार कधी थांबत नाही आणि थांबणारही नाही.

ठळक मुद्दे चिन्ह, प्रतीक, प्रतिमा, भावभावना याचा आधार घेऊन ते मार्गक्रमण करत राहतातकेवळ विरोधाला विरोध नसावा

पुणे : ‘नाटक’ हे समाजसापेक्ष असते. प्रेक्षकांना नाटक किंवा एखादी कलाकृती चांगली नाही असे वाटले तर प्रेक्षकचं ते नाटक पाहायचे कि नाही यावर निर्णय घेतील. ते प्रेक्षकांनीच ठरवलं पाहिजे.‘सेन्सॉर’ प्रेक्षकांनी लावायला हवे, सरकारने नव्हे’,अशा शब्दातं जामिया मिलिया इस्लामियॉं युनिव्हर्सिटीचे माजी हिंदी विभागप्रमुख आणि ज्येष्ठ लेखक प्रा.सय्यद असगर वजाहत यांनी कलाकृतींवरील ‘सेन्सॉरशीप’ वर टीका केली. दिल्लीच्या नँशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) च्या वतीने आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या( एमईएस) कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसच्या सहकार्याने 90 दिवसांची कार्यशाळा दि. 22 जानेवारीपर्यंत पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेच्या उदघाटनानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. कार्यशाळेप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एमईएसच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धधे आणि एनएसडीचे प्रभारीसंचालक प्रा. सुरेश शर्मा तसेच ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे,ज्येष्ठ नाटककार शफाहत खान, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे वरिष्ठसल्लागार ए.एन.रॉय, मएसोच्या नियामक मंडळाच्या आणि मएसोकॉलेज आॅफ परफॉर्मिंग आर्टसच्या सल्लागार समितीच्या सदस्य डॉ.माधवी मेहेंदळे, मएसो कॉलेज आॅफ परफॉर्मिंग आर्टसचे सल्लागार विद्यानिधी वनारसे व ज्येष्ठ रंगकर्मी किरण यज्ञोपवित उपस्थित होते. नाटय-चित्रपट-साहित्य क्षेत्रातील लेखकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सरकारकडून लादण्यात येणारी ‘सेन्सॉरशीप’ याविषयांवर सय्यद असघर वजाहत यांनी परखड भाष्य केले.’प्रेक्षक’हा नाटकाचा महत्वपूर्ण घटक आहे. प्रेक्षक समाजातील वास्तविकता नाटकामध्ये पाहू इच्छितो. ज्या समाजातून प्रेक्षक आला आहे. त्याच्या समस्यांचे प्रतिबिंब नाटकामध्ये उमटावे असे त्याला वाटते असे सांगून ते म्हणाले, नाटककार आणि लेखकांच्या लेखनावर कितीही बंदी घातली तरी ते नवीन मार्ग निर्माण करतात.  चिन्ह, प्रतीक, प्रतिमा, भावभावना याचा आधार घेऊन ते मार्गक्रमण करत राहतात.  त्यामुळे लेखनावर कितीही बंदी घातली तरी ते लेखन करीतच राहातील. 1975 च्या आणीबाणीच्या काळातही सरकारने लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. तरीही आम्ही लेखन करतच राहिलो.  लेखक किंवा नाटककार कधी थांबत नाही आणि थांबणारही नाही.  ‘सेन्सॉर’ लोकांनी लावायला पाहिजे, सरकारने नव्हे. नाटक आमच्यासाठी चांगले नाही असे जर लोकांना वाटले तर तेच नाटक पाहायला जाणार नाहीत. सुशिक्षित देशांमध्ये समाज  ‘सेन्सॉर’ लावू शकतो. केवळ लोकांमध्ये जागरूकता असणे गरजेचे आहे. त्यांना नाट्य आणि चित्र साक्षर केले पाहिजे. लोकांनीच म्हटले की आम्हाला एखादी कलाकृती पाहायची नाही तर कोण काय करू शकेल? त्यामुळे चांगले किंवा वाईट हे लोकांना ठरवू देत याकडे त्यांनी लक्ष वेधले.     नाट्यलेखन कार्यशाळोविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, आजपर्यंत कधीही तीन महिन्यांची कार्यशाळा झालेली नाही हे एक ऐतिहासिक पाऊल आहे.  कुणाला कला शिकविली जात नाही अशी वक्तव्य केली जातात. आपण प्रतिभेचे महत्व नाकारू शकतच नाही. पण त्या प्रतिभेला संधी मिळणे गरजेचे आहे.  कुणी गात असेल त्याला चांगला गुरू मिळाला तर तो उत्तम गायक होऊ शकतो.  तसाच कुणी लेखन करत असेल तर त्याच्या लेखानाला उभारी मिळेल. नाटयलेखन आव्हानात्मक नक्कीच आहे. नाट्य लेखनात वैज्ञानिक जाणीव गरजेची आहे. ..........केवळ विरोधाला विरोध नसावाकलाकार एका पक्षाच्या झेंड्याखाली नसतो. वेगळी विचारसरणी नक्कीच असू शकते. कलाकार चुकीच्या गोष्टींवर नेहमीच आवाज उठवत आला आहे. हे आज नाही पूर्वापार चालत आले आहे. चुकीच्या गोष्टींना विरोध करणे नवीन नाही. विरोध करावा पण केवळ विरोधाला विरोधाला नसावा. जे आज प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. संवाद साधायला हवा. चर्चा व्हायला हव्यात. पण कुणी संवाद साधायला तयार नसते. मी काश्मिरच्या विस्थापित पंडितांवर नाटक लिहिले. मला सरकारकडून नव्हे उलट समाजातून अधिक विरोध झाला असल्याचे एनएसडीचे संचालक प्रा. सुरेश शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाGovernmentसरकार