शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

Budget 2020: शेतकऱ्यांचे वर्गीकरण करूनच योजना राबवाव्यात- पोपटराव पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 3:35 AM

असंघटित क्षेत्रातला शेतकरी हा सर्वांत मोठा घटक आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न योग्य पद्धतीने कोणी मांडत नाही.

-पोपटराव पवार

असंघटित क्षेत्रातला शेतकरी हा सर्वांत मोठा घटक आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न योग्य पद्धतीने कोणी मांडत नाही. ग्रामीण विकासाचा विचार करताना त्यात प्रामुख्याने शेतकरी आणि त्याच्याभोवतीचे घटक डोळ्यासमोर असले पाहिजेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात १६ कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. शेती, सिंचन व ग्रामीण विकास यांच्यासाठी एकत्रित तीन लाख कोटींची घोषणा केली आहे़ मात्र, शेती योजना राबविताना सरसकटीकरण टाळायला हवे़ शेतकºयांचे वर्गीकरण करून त्यानुसार योजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे़ पड जमिनीवर सोलर योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे़ मात्र, या योजनेत सुसूत्रीकरणाचा अभाव दिसतो.

केंद्र सरकारने सेंद्रिय खते, शेती क्षेत्रात गुंतवणूक, सोलर ऊर्जा, ग्रामपंचायती फायबर आॅप्टिक केबलने जोडणे, अशा विविध योजनांसाठी तरतूद केली आहे़ तसेच स्वच्छ भारत योजनेसाठी १२ हजार ३०० कोटींची तरतूद आहे़ स्वच्छ भारत योजनेची अंमलबजावणी करताना ही योजना वैयक्तिक लाभांशी जोडायला हवी. गावे फायबर ऑप्टीक केबलने जोडून सर्व योजनांचे लाभ गावातून मिळायला हवेत. त्यासाठी ग्रामपंचायती सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत सुरू राहायला हव्यात़ त्यासाठी कर्मचारी नेमण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना मिळायला हवेत़ त्यासाठी स्वतंत्र तरतूदही १५व्या वित्त आयोगात करायला हवी़ १५ व्या वित्त आयोगाचा निधी देताना पाच हजार लोकसंख्येचा निकष रद्द करायला हवा.

कुसुम सोलर पंप योजना राबविताना एजन्सीवर अवलंबून न राहता महावितरणला अधिकार मिळायला हवेत. शेतकऱ्यांना सोलरचा परतावा कसा मिळणार याची स्पष्टता यायला हवी़ या अर्थसंकल्पात मनरेगाची तरतूद करायला हवी होती़ ती दिसत नाही़ शेतकामाला मनरेगाशी जोडून शेतकºयांना थेट मजुरी, सर्व पिकांना हमीभावाची तरतूद या अर्थसंकल्पात अपेक्षित होती़ कृषी योजना राबविताना बारामाही व सहामाही बागायतदार, अवर्षणग्रस्त शेतकरी, कोरडवाहू शेतकरी, नोकरदार शेतकरी असे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. 

ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करायला हवी होती़ छोट्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही, यासाठी तरतूद असायला हवी होती.शहरी भाग गृहीत धरून अर्थसंकल्प सादर केला जातो़ हा अर्थसंकल्प शेतीकेंद्रित असायला हवा.

यंदा अर्थसंकल्पात १६ कलमी कार्यक्रम, कुसुम योजना, रस्त्यांची तरतूद या बाबी चांगल्या आहेत़ अर्थसंकल्पातील तरतुदींची अंमलबजावणी व्हावी. अन्यथा, ‘नेहमीच येतो पावसाळा’, अशी त्याची अवस्था व्हायची़शेतमालाचे भाव वाढले की शहरी वर्गातून ओरड होते़ मात्र, भाव एका पिकाचे वाढतात तर इतर पिके तोट्यातच असतात. त्यावर कोणी बोलत नाही़ त्यामुळे सर्व शेतमालाला हमीभाव हवा़ त्यातून महागाईही आटोक्यात राहू शकते आणि शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळेल.

टॅग्स :budget 2020बजेटbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्लाbudget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषणFarmerशेतकरी