शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

ब्रिटिशकालीन सात पुलांची खस्ता हालत!

By admin | Updated: August 5, 2016 01:05 IST

बुलडाणा जिल्ह्यातील पुलांचे ऑडिट होण्याची शक्यता.

नीलेश शहाकार बुलडाणा, दि. ४ - दळणवळण व जनसंपर्कासाठी रस्त्यांसह पुलांचेही महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी नदी व मार्गावरील पूलनिर्मिती करताना शासनाकडून गांभीर्याने पाहले जाते. परंतु जिल्ह्यात सद्यस्थितीत ब्रिटिशकालीन पूल असून, त्यापैकी सात पुलांची खस्ता हालत झाली आहे. याकडे तत्काळ जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले नाही, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नकारता येत नाही.नदी-नाल्यांवर निर्माण केलेले पूल मजबूत असणे आवश्यक आहे. बर्‍याच वेळा पावसाळय़ात ग्रामीण भागात नदीला पूर आल्यामुळे पाण्यासोबत पूल वाहून जातो. यामुळे गावाचा संपर्क तुटतो. गावाच्या विकासासाठी शासनाने ग्रामीण भागात बर्‍याच ठिकाणी नवीन पुलांची निर्मिती केली आहे. शिवाय बरेच पूल १९२६ ते १९३९ या ब्रिटिश काळात बांधण्यात आले आहेत. या पुलांची मजबुती कायम ठेवण्यासाठी पुलांची उंची कमी ठेवण्यात आली आहे.बुलडाणा शहर ब्रिटिशकाळात ब्रिटिश प्रशासनाचे मुख्यालय होते. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाबाबत जागरुकता दाखत ब्रिटिश अधिकार्‍यांनी येथील विविध नद्यांवर अनेक पुलांची निर्मिती केली. यापैकी सद्यस्थितीत सात पुलांचा वाहतुकीसाठी वापर केला जातो. मात्र या पुलांची प्रशासनाकडून नियमित देखभाल होत नसल्यामुळे सर्वच पूल जर्जर झाले आहेत. यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन या पुलांवरून प्रवास करावा लागतो.दोन दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजिक सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकारची घटना जिल्ह्यात एखाद्या पुलावर भविष्यात होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने सदर पुलांकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.या मार्गावर आहे ब्रिटिशकालीन पूल मार्ग                          नदी                           वर्षमलकापूर - जालना    (आमना)                   १९३९मलकापूर - जालना    (खडकपूर्णा)               १९२६जालना - मेहकर        (पैनगंगा)                   १९२६ नांदुरा - मोताळा        (विश्‍वगंगा)                १९३३येरली -                     ( पूर्णा )                     १९२६टिवरोडा                   ( पूर्णा )                      (उपलब्ध नाही )खामगाव - चिखली    ( मन)                        (उपलब्ध नाही )