शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ठोकशाहीवर नाही, लोकशाहीवर विश्वास ठेवणारे सरकार आणा, अशोक चव्हाण यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 16:29 IST

आम्ही विनम्रपणे लोकांकडे जातो, हे मात्र ‘उखाड देंगे, फेक देंगे’ म्हणत गुंडांची भाषा वापरतात. ठोकशाहीच्या माध्यमातून पुन्हा सत्ता काजीब करण्याचा भाजपचा प्रयत्न हाणून पाडा आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आमचे सरकार आणा

ठळक मुद्देआम्ही विनम्रपणे लोकांकडे जातो, भाजपवाले मात्र ‘उखाड देंगे, फेक देंगे’ म्हणत गुंडांची भाषा वापरतातहे उन्मत्त सरकार आता पत्रकार, साहित्यिकांच्या लिखाणावही बंदी घालत आहे, ही लोकशाही नाही तर ठोकशाही आहेठोकशाहीच्या माध्यमातून पुन्हा सत्ता काजीब करण्याचा भाजपचा प्रयत्न हाणून पाडा आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आमचे सरकार आणा

गडचिरोली - आम्ही विनम्रपणे लोकांकडे जातो, हे मात्र ‘उखाड देंगे, फेक देंगे’ म्हणत गुंडांची भाषा वापरतात. हे उन्मत्त सरकार आता पत्रकार, साहित्यिकांच्या लिखाणावही बंदी घालत आहे, ही लोकशाही नाही तर ठोकशाही आहे. ठोकशाहीच्या माध्यमातून पुन्हा सत्ता काजीब करण्याचा भाजपचा प्रयत्न हाणून पाडा आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आमचे सरकार आणा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान रविवारी (दि.१३) गडचिरोलीत आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी खा.चव्हाण म्हणाले, जेवढी कामे काँग्रेसच्या कार्यकाळात झाली तेवढी कोणीच केली नाहीत. उलट आमच्या कार्यकाळात मंजूर झालेली कामे हळूहळू ठप्प पडली. गडचिरोली जिल्ह्यातल्या सुरजागडमधील लोहखनिज दुसºया जिल्ह्यात जात आहे. स्थानिक लोक मात्र रोजगारात मागे पडत आहेत. मात्र या सरकारला त्याची काळजी नाही. आदिवासींना आरोग्य सुविधा मिळत नाही. कुपोषणाने मुलं मरत असताना यांचे मंत्री उन्मत्तपणे ‘मरता है तो मरने दो’ म्हणतात. दारूबंदीच्या जिल्ह्यात भाजपचेच दारू आणि वाळू माफिया फोफावले आहेत. सिंचनाची कामे रखडली, कर्जमाफी जाचक अटींमध्ये अडकवून ठेवली. गडचिरोलीत तर ‘पालकमंत्री शोधून काढा, १००० रुपये मिळवा’ अशी स्थिती झाली आहे. भाजप आणि शिवसेना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ‘आपण दोघे भाऊ, मिळून वाटून खाऊ’ अशा भूमिकेतून सत्ता उपभोगणा-या या दोन्ही पक्षांना आता खाली उतरवण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असून त्याबाबतची बोलणी सुरू असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.यावेळी मंचावर विधिमंडळ उपगट नेते आ.विजय वडेट्टीवार, अ.भा.काँग्रेस कमिटीचे सचिव आणि विदर्भ समन्वयक आशिष दुवा, माजी खासदार मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, माजी आ.आशिष देशमुख, आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आनंदराव गेडाम, अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष राजू वाघमारे, अतुल लोंढे, किशोर गजभिये, रविंद्र दरेकर, जिल्हा प्रभारी सुरेश भोयर, अमर वराडे, अनंत गावड यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी मंचावर विराजमान होते. कार्यक्रमाचे संचालन नगरसेवक सतीश विधाते तर आभार प्रदर्शन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जिल्हाभरातील नागरिक उपस्थित होते.

सर्व चौकीदार चोर नाहीतकाँग्रेसचे विधीमंडळातील उपगटनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खोट्या आश्वासनांचा समाचार घेताना ‘चौकीदार ही चोर है’ असे नारे प्रेक्षकांकडून वदवून घेतले. तो धागा पकडत खा.अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात सर्वच चौकीदार चोर नाहीत, तर ‘देशाचा चौकीदार चोर आहे’ असा नारा दिला. देशाच्या चौकीदारामुळे इमानदारीने काम करणारे बिचारे इतर चौकीदार बदनाम होऊ नये, अशी कोपरखळी त्यांनी मारली.

 

धानाला ८०० रुपये अनुदान द्याशेजारच्या छत्तीसगड, मध्यप्रदेशात सत्तेवर आलेले काँग्रेसचे सरकार धानाला २५०० रुपये भाव देत आहे. पण महाराष्ट्रातील सरकारला आपल्या शेतक-यांची फिकीर नाही. शेतक-यांना आता प्रतिक्विंटल ८०० रुपये अनुदान दिले पाहीजे अशी अपेक्षा खा.चव्हाण यांनी व्यक्त केली.

जनता म्हणेल त्यालाच उमेदवारी 

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसमधून ४-५ लोक इच्छुक आहेत. पक्षाचा विजय नक्की होणार याचे हे संकेत आहे. पण कोणी कोणाच्या जवळचा आहे यावर नाही, तर जनता ज्याच्या बाजुने असेल त्याला उमेदवारी मिळेल. हीच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भूमिका असल्याचे प्रदेशाध्यक्ष खा.चव्हाण यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसGadchiroliगडचिरोलीBJPभाजपाPoliticsराजकारण