शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कलंकशोभा!

By admin | Updated: February 15, 2017 00:50 IST

आजकाल राजकारणात ‘पण लक्षात घेतो कोण?’ असा कुणी हरी नारायण आपटे यांच्या कादंबरीतील सनातन प्रश्न विचारला तरी कोणी लक्षात घेईलच, असे नाही.

आजकाल राजकारणात ‘पण लक्षात घेतो कोण?’ असा कुणी हरी नारायण आपटे यांच्या कादंबरीतील सनातन प्रश्न विचारला तरी कोणी लक्षात घेईलच, असे नाही. आचार, विचार आणि व्यवहाराच्या पातळीवर हल्लीचे राजकारण खूप पुढे गेले आहे. पुढे सरकणे हे प्रागतिक लक्षण मानले जात असले, तरी हे क्षेत्र त्यास अपवाद ठरावे. गेला बाजार राजकारण आणि तत्त्वाची केव्हाच फारकत झाली असल्याने कोणाकडे किती कलंकित आहेत, यावरून एखाद्या राजकीय पक्षाच्या चारित्र्याचा ‘लसावी’ न काढलेलाच बरा...पूर्वी राजकारण ही सार्वत्रिक जीवनाची शेवटची पायरी असे. आता तीच ‘नामदेव पायरी’ झाल्याने सत्तेचा सोपान गाठणे सहज साध्य झाले आहे. आजवर सामाजिक कार्यातून तयार झालेले कार्यकर्ते राजकारणात येत. त्यामुळे त्यांच्याकडे किमान वैचारिक बैठक, स्वच्छ चारित्र्य आणि वादातीत पक्षनिष्ठा असायची. हल्ली आधी राजकारण आणि नंतर जमले तर समाजकार्य, असा उलटा प्रवास सुरू असल्याने कार्यकर्त्यांचा सामाजिक पिंड शेवटी कोरडा तो कोरडाच राहतो. वैचारिक धारणा आणि धोरणांचा दुष्काळ असल्याने असे राजकारण काळाच्या कसोटीवर टिकाव धरत नाही. मग अस्तित्वासाठी सुरू झालेला संघर्ष शेवटी लाचारीच्या पायरीवर येऊन ठेपतो. गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांची आज प्रकर्षाने आठवण होते. भारदेबुवांचे भाषण म्हणजे निरुपण असायचे. ‘संत महात्म्यांची वाट पुसत’ या ग्रंथात ते म्हणतात, ज्ञान असेल तरच भान येते. स्फूर्र्तींची मूर्ती होते आणि कार्यसिद्धी असेल तर आपोआप प्रसिद्धी मिळते. भारदेबुवा आज असते तर त्यांना हे उलटं लिहावं लागलं असतं. कारण हल्लीच्या राजकारणात ‘आधी प्रसिद्धी मग सिद्धी’ हा मूलमंत्र झाला आहे. राजकारणात ‘हरी’ राहिला नाही म्हणून ते ‘लहरी’ बनले आहे, असे निरीक्षणही भारदे एका ठिकाणी नोंदवितात. ‘हरी’ म्हणजे दीन, दलित, कष्टकरीवर्ग त्यांना अभिप्रेत होता. बाळासाहेब भारदे सलग वीस वर्षे राज्याचे सहकारमंत्री आणि दहा वर्षे विधानसभेचे अध्यक्ष होते. मंत्रिमंडळात घेतल्याची बातमी त्यांनी रेडिओवर ऐकली. शपथविधीसाठी ते एस.टी.ने मुंबईला निघाले. ही बातमी कळताच जिल्हाधिकाऱ्यांनी लाल दिव्याच्या गाडीने त्यांच्या एसटीचा पाठलाग केला. रस्त्यात गाडी अडविली. बाळासाहेबांना गाडीत बसण्याची विनंती केली. यावर ते म्हणाले, तुम्ही आणलेली लाल दिव्याची गाडी आणि एस.टी. दोन्ही वाहने सरकारीच. शिवाय, मी तिकीट काढलेले आहे. तेव्हा तुम्ही परत जा. मी एसटीने वेळेवर पोहोचतो! तात्पर्य काय तर, काळाच्या ओघात भारदेबुवांसारखे निष्काम कर्मयोगी विसराळी पडले आणि हितेंद्र ठाकूर, पप्पू कलानींसारखे कलंकित लोक राजकीय कुंडीतील शोभिवंत फुले बनली. सध्या अशा कलंकांचेच दिवस असल्याने कोणाकडे किती, असा हिशेब मांडायची गरज उरलेली नाही. सत्तेच्या हमामात सब नंगे असतील तर त्यांना गंगेच्या पाण्याने आंघोळ घातली तरी ओघळांचे तीर्थ थोडेच होणार? या गणंगाकडे ‘इलेक्ट्रोल मेरिट’ं नावाचा अद्भुत असा चिराग असतो. तो घासला की, म्हणे हमखास विजय मिळतो! असे जादुई चिरागवाले अल्लाउदीन सगळ्यांनाच हवे असतात. त्यामुळे भाजपात शंकराचार्यांची जागा गुंडाचार्यांनी घेतली, असा आरोप ‘मातोश्री’वरून झाला असला तरी, त्यांनाही गुंडाचार्यांमध्ये ‘आचार्य’ दिसले, हे काय कमी आहे!-नंदकिशोर पाटील