शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न, संभाजीराजेंना फसवलं - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 14:44 IST

Sanjay Raut : घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न असून स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी संभाजीराजे छत्रपतींना भाजपने फसवल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला आहे. 

मुंबई :  राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक होणार आहे. त्यामुळे या सहाही जागांसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील आणि त्यातील दोन उमेदवार शिवसेनेचे असतील, असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. तसेच, घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न असून स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी संभाजीराजे छत्रपतींना भाजपने फसवल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला आहे. 

संभाजी छत्रपती यांना भाजपकडून कशाप्रकारे फसवण्याचा प्रयत्न केला जात होता, हे आता स्पष्ट झालं आहे. भाजपला स्वतःचा उमेदवार टाकायचाच होता. घोडेबाजार करायचाच आहे. पण यासाठी संजाभीराजे छत्रपतींची ढाल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपल्याकडे लोकशाही आहे व प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, परंतु महाराष्ट्रात कोणी घोडेबाजार करून अशा प्रकारच्या निवडणुका लढणार असतील तर सरकारच सुद्धा बारीक लक्ष आहे. एवढंच मी सांगू शकेन, असे संजय राऊत म्हणाले.

आम्ही आमचा उमेदवार म्हणून संजय पवार यांना उतरवले आहे. मला आणि मुख्यमंत्र्यांना पूर्ण खात्री आहे की, जेवढी मतं हवीत विजयासाठी त्या मतांचा कोटा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार आणि आघाडीतील इतर उमेदवारी देखील विजय होतील, असे संजय राऊत यांनी म्हटले. 

काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीवर सुद्धा संजय राऊत यांनी भाष्य केले. काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीबाबत मी बोलणार नाही. कारण माझ्यापर्यंत कोणी येणार नाही. कोणत्या विषयावर नाराजी आहे, काय आहे? ते त्यांचे हायकमांड ठरवतील आणि सांगतील. महाविकास आघाडीतील धुसफूस यावरुन होणाऱ्या आरोपांबाबत काहीच तथ्य वाटत नाही. जर तसे काही असेल तर मुख्यमंत्री थेट सोनिया गांधींशी फोनवरुन संवाद साधतात. काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री यांच्यात उत्तम संवाद आहे,असे संजय राऊत म्हणाले.

तसेच, काँग्रेसने इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांची चांगली व्यवस्था आहे. मात्र, काँग्रेसने महाराष्ट्रातून कोणीतरी स्थानिक उमेदवार दिला, असता तर नक्कीच चांगली बळकटी पक्षाला मिळाली असती, मला वाटते की काँग्रेसने देशाचा विचार केलेला आहे व इतर राज्यांचा विचार केलेला आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती