शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

महाराष्ट्रातच नाही तर भारतातही एकट्याने लढू : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 9:06 PM

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी गुरुवारी फेरनिवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पुण्यात लोकमत डॉट कॉम'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपले विचार मांडले. आगामी काळात भाजपच्या संघटनावाढीवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. 

पुणे : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. अशावेळी आगामी स्थानिक स्वराज्यसंस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुका एकत्रित लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध इतर असे चित्र दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. मात्र ''महाविकास आघाडी आता सर्वदूर एकत्र येऊन लढणार हे आम्ही गृहीत धरले आहे. महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात भाजपला एकट्याला लढावे लागेल हे आता स्पष्ट झाले आहे.  त्याची पूर्ण तयारी आम्ही करत आहोत' असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडले आहे.  त्यांची

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी गुरुवारी फेरनिवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पुण्यात लोकमत डॉट कॉम'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपले विचार मांडले. आगामी काळात भाजपच्या संघटनावाढीवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. 

  •  सलग दुसऱ्यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून कामाची संधी मिळाली आहे, त्याविषयी पहिली प्रतिक्रिया काय आहे ?

जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजप मानला जातो. अशा पक्षाचा एकदा प्रदेशाध्यक्ष व्हायला मिळालं याचा आनंद होताच आता ती जबाबदारी पुन्हा मिळाल्याचा अभिमान आहे. या पुढील काळात कार्यकर्त्यांचे सत्ताधरी पक्षाचे कार्यकर्ते ते विरोधी पक्षाचे कार्यकर्ते अशी मानसिकता करण्यात खूप मेहनत घ्यावी लागेल. आमचा पिंड विरोधी पक्षाचा आहे. त्यामुळे सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम नक्की करू. 

 

  • भाजपमध्येही एकनाथ खडसेंसारखे नेते अजूनही नाराज असल्याचे बोलले जाते, त्यासाठी काही विशेष परिश्रम घेणार का ?

 प्रत्येक कुटुंबात थोडीफार नाराजी असतेच. मात्र ती नाराजी संपवली जाते आणि लोक आयुष्यभर त्यात राहतात. हे तर आमचं विचारांचं कुटुंब आहे. त्यामुळे ही नाराजी त्या-त्यावेळी संपवली जाते, गेली आहे. यापुढेही असा कोणता पक्ष निर्माण झाला तर सोडवण्यास आम्ही  समर्थ आहोत.

  • महाविकास आघाडीचे सरकार घेत असलेल्या निर्णयांकडे कसे बघता ? 

 सरकारच्या चांगल्या निर्णयाचं स्वागत आहे. डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे, मराठीची सक्ती राष्ट्रगीत सक्ती, शिवभोजन थाळी अशा निर्णयांचे स्वागत आहे. मात्र त्यांनी कर्जमाफी फसवी दिली आहे.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही. अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची कर्जमाफी केलेली नाही. त्यांनी सध्या दिलेली करमाफी ही आधीच्या सरकारने दिलेली आहे. 

  • तुम्हाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाते, त्याचा काही त्रास होतो का ?

 आम्ही समाधानी आहोत. दिवसभराच्या कामाच्या आढाव्यानंतर काही चूक झाली असे वाटत नसेल तर अशा 'ट्रोलिंग-बिलिंग'ला मला काही अर्थ वाटत नाही.काही बाबतीत अतिरेक होतो आहे. खुर्ची तुटण्यासारखी क्षुल्लक गोष्ट ट्रोल होणे पटण्यासारखे नाही. 

  • पालकमंत्री म्हणून अजित पवार पुण्याच्या प्रश्नांसंदर्भांत करत असलेल्या कामावर समाधानी आहात का  ?

 मी देखील पुण्याचा पालकमंत्री होतो. अजित पवार आढावा घेतात याचा आनंद आहेत. पण ते घेत असलेला आढावा हा आम्ही घेतलेल्या निर्णयांचा घेत आहेत. आम्हीच आणलेल्या २४ बाय ७ पाणीपुरवठा, मेट्रो, रिंगरोड अशाच योजनांना ते गती देत आहेत. 

  • तुमचं फेरनिवडणूक होतील हे वक्तव्य गाजले होते, त्यावर अजूनही ठाम आहात का ?

सरकारमध्ये अंतर्गत विरोध वाढतो आहे. उदा. नितीन राऊत म्हणतात वीज मोफत तर दुसरीकडे अजित पवार पैसे कुठून आणणार असं विचारतात. राज्यसभेत अनिल देसाईंनी प्रायव्हेट बिल आणले आहे. त्यात त्यांनी दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना सुविधा देणे बंद कराव्यात अशी मांडणी केली आहे. हा जवळजवळ समान नागरी कायदा झाला आहे. त्यांनी याविषयी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला विचारले का ? असा अंतर्गत विरोध वाढत गेला तर सरकार टिकणार नाही आणि आम्ही सरकार स्थापन करणार नाही. तेव्हा मात्र फेरनिवडणूका होतील असे मला वाटते. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाPoliticsराजकारण