शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

...तर भाजपा भुईसपाट होईल

By admin | Updated: January 18, 2017 06:50 IST

भाजपासोबत युती नकोच, असा सूर मंगळवारी शिवसेनेच्या नेत्यांनी येथे झालेल्या मेळाव्यात लावला.

औरंगाबाद : भाजपासोबत युती नकोच, असा सूर मंगळवारी शिवसेनेच्या नेत्यांनी येथे झालेल्या मेळाव्यात लावला. भाजपाशी युती झाली नाही, तर भाजपा भुईसपाट होईल, असे वक्तव्य राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले, तर दुसरीकडे खा. चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा खरा प्रतिस्पर्धी भाजपाच असल्याचे वक्तव्य केले. मंगळवारी येथे झालेल्या औरंगाबाद-जालना शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपासून ते स्थानिक पातळीपर्यंतच्या भाजपा यंत्रणेवर जोरदार टीका करत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी औरंगाबादेतील गुलमंडीतून (गुलमंडीत भाजपाचा पदाधिकारी राहातो.) भाजपाने दीड कोटी पाठविले, तर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नगरपालिकेसाठी दीड ते दोन कोटी रुपयांचा मलिदा वाटल्याचा गंभीर आरोप खैरे यांनी केला. केलेले आरोप सिद्ध करून दाखवेन, पैठणमध्ये भाजपाचे लोक पैसे वाटताना पकडले गेले. जि.प. निवडणुकीतदेखील भाजपा पैठण पॅटर्न राबवेल. भाजपा शिवसेनेशी सुडाचे राजकारण करीत आहे. त्यामुळे युती कशाला करायची? लक्ष्मीदर्शनची भाषा करणारे खा. रावसाहेब दानवे कानात सांगतात, जा कामाला लागा, असे खैरे म्हणाले. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तर भाजपाला सज्जड दम भरला. भाजपाने शिवसेनेसोबत युती केली नाही, तर ते भुईसपाट होतील, असा अहवालच माझ्याकडे आहे. त्यामुळे युती करायचीच नाही, असे माझे मत आहे. तुमचे मत काय आहे, असे त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारले, त्या वेळी सर्वांनी हात उंचावून ‘युती नको ’, ‘युती नको’ असा सूर लावला. भाजपा वाजवीपेक्षा जास्त जागा मागत आहे. त्यामुळे युतीबाबत विचार करावाच लागेल, असे खोतकर म्हणाले. (प्रतिनिधी)>नेत्यांनो, खिशात हात घाला!या वेळी परभणीचे खा. संजय जाधव हे व्यासपीठावरील खा. खैरे, राज्यमंत्री खोतकर यांच्याकडे पाहून म्हणाले, तुमच्या निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असेल, तर या निवडणुकींमध्ये १ ते २ कोटींचा खर्च नेत्यांनी केला पाहिजे. भाजपाने पुण्यातील एका निवडणुकीत १० हजार रुपये एका मताला दिले. नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी खिशात हात घातला पाहिजे. नेत्यांनी बहाणे करून निवडणुकीतून पळ काढू नये. त्यांनी सर्कल, गणाची जबाबदारी घेतली पाहिजे.तसेच उमेदवारी मिळेपर्यंत लाखोंचा खर्च करण्याची भाषण करणारे उमेदवारी मिळताच हातवर करून टाकतात, असेही ते म्हणाले.