शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

...तर भाजपा भुईसपाट होईल

By admin | Updated: January 18, 2017 06:50 IST

भाजपासोबत युती नकोच, असा सूर मंगळवारी शिवसेनेच्या नेत्यांनी येथे झालेल्या मेळाव्यात लावला.

औरंगाबाद : भाजपासोबत युती नकोच, असा सूर मंगळवारी शिवसेनेच्या नेत्यांनी येथे झालेल्या मेळाव्यात लावला. भाजपाशी युती झाली नाही, तर भाजपा भुईसपाट होईल, असे वक्तव्य राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले, तर दुसरीकडे खा. चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा खरा प्रतिस्पर्धी भाजपाच असल्याचे वक्तव्य केले. मंगळवारी येथे झालेल्या औरंगाबाद-जालना शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपासून ते स्थानिक पातळीपर्यंतच्या भाजपा यंत्रणेवर जोरदार टीका करत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी औरंगाबादेतील गुलमंडीतून (गुलमंडीत भाजपाचा पदाधिकारी राहातो.) भाजपाने दीड कोटी पाठविले, तर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नगरपालिकेसाठी दीड ते दोन कोटी रुपयांचा मलिदा वाटल्याचा गंभीर आरोप खैरे यांनी केला. केलेले आरोप सिद्ध करून दाखवेन, पैठणमध्ये भाजपाचे लोक पैसे वाटताना पकडले गेले. जि.प. निवडणुकीतदेखील भाजपा पैठण पॅटर्न राबवेल. भाजपा शिवसेनेशी सुडाचे राजकारण करीत आहे. त्यामुळे युती कशाला करायची? लक्ष्मीदर्शनची भाषा करणारे खा. रावसाहेब दानवे कानात सांगतात, जा कामाला लागा, असे खैरे म्हणाले. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तर भाजपाला सज्जड दम भरला. भाजपाने शिवसेनेसोबत युती केली नाही, तर ते भुईसपाट होतील, असा अहवालच माझ्याकडे आहे. त्यामुळे युती करायचीच नाही, असे माझे मत आहे. तुमचे मत काय आहे, असे त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारले, त्या वेळी सर्वांनी हात उंचावून ‘युती नको ’, ‘युती नको’ असा सूर लावला. भाजपा वाजवीपेक्षा जास्त जागा मागत आहे. त्यामुळे युतीबाबत विचार करावाच लागेल, असे खोतकर म्हणाले. (प्रतिनिधी)>नेत्यांनो, खिशात हात घाला!या वेळी परभणीचे खा. संजय जाधव हे व्यासपीठावरील खा. खैरे, राज्यमंत्री खोतकर यांच्याकडे पाहून म्हणाले, तुमच्या निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असेल, तर या निवडणुकींमध्ये १ ते २ कोटींचा खर्च नेत्यांनी केला पाहिजे. भाजपाने पुण्यातील एका निवडणुकीत १० हजार रुपये एका मताला दिले. नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी खिशात हात घातला पाहिजे. नेत्यांनी बहाणे करून निवडणुकीतून पळ काढू नये. त्यांनी सर्कल, गणाची जबाबदारी घेतली पाहिजे.तसेच उमेदवारी मिळेपर्यंत लाखोंचा खर्च करण्याची भाषण करणारे उमेदवारी मिळताच हातवर करून टाकतात, असेही ते म्हणाले.