शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
4
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
5
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
6
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
7
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
8
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
9
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
10
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
11
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
12
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
13
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
14
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
15
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
16
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
17
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
18
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
19
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
20
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट

एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधी होणार होता, शेवटच्या क्षणी...; विरोधकांचा दावा, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:07 IST

प्रचंड बहुमत असलेल्या पक्षाच्या हाताखाली तुम्ही काम करता तेव्हा तुमच्यावर ही वेळ येते असंही संजय राऊतांनी म्हटलं.

मुंबई - जर दबावाचा अडेलतट्टूपणा तसाच राहिला तर त्यांच्याशिवाय पुढे जा असा निरोप भाजपा वरिष्ठांकडून राज्यातील नेत्यांना देण्यात आला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशिवाय शपथविधी होणार होता. शेवटच्या क्षणी ते तिथे पोहचले असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

दिल्लीतील पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, याआधी पक्षाच्या आदेशाने देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं होते. देशात अनेक ठिकाणी अशी उदाहरणे आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण जे मुख्यमंत्री होते, ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मंत्री म्हणून काम करत होते. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होते त्यानंतर त्यांनी मंत्री म्हणून काम केले आहे. मध्य प्रदेश असेल किंवा अन्य राज्यात असे प्रसंग घडले आहेत. परंतु एखाद्या माणसाच्या तोंडाला रक्त लागलं, वर्षा बंगल्याचं, सत्तेचे मग त्यांना शिकार सोडावी वाटत नाही असा टोला त्यांनी शिंदेंना लगावला.

तसेच उद्धव ठाकरे यांना वाटलं आपल्या सरकारने बहुमत गमावलं आहे तेव्हा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला आणि वर्षा बंगला सोडला. सत्तेचा मोह नाही. मिळालं, काम केले, सत्ता सोडली आणि निघून गेले. हे सगळ्यांना जमतं असं नाही. ज्यांना जमलं त्यांनी केले, ज्यांना नाही जमलं ते आदळआपट करतात. शपथविधी सोहळ्यावर भाजपाची छाप दिसली, कारण पंतप्रधान स्वत: तिथे होते. व्यासपीठ पाहिले तर भाजपाचे बहुतेक केंद्रीय मंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री आहेत. भाजपाचे १३२ आमदार आहेत. त्यामुळे छाप असणार आहे. व्यासपीठावर भाजपा नेत्यांचा वावर स्पष्ट दिसत होता. बहुमत मिळूनही फायदा काय हा लोकांचा सवाल आहे. अजून सरकार बनवले नाही, कॅबिनेट मंत्री बनवले नाही तर त्याचा फायदा काय..? प्रचंड बहुमत असलेल्या पक्षाच्या हाताखाली तुम्ही काम करता तेव्हा तुमच्यावर ही वेळ येते असंही संजय राऊतांनी म्हटलं.

दरम्यान, इतकं बहुमत असतानाही तिघांना शपथ घ्यायला १५ दिवस लागले. २३५ हून अधिक आमदार त्यांच्याजवळ होते. तरीही १५ दिवस सरकार बनवू शकले नाहीत. आझाद मैदानावर जो सोहळा झाला त्यात केवळ ३ जण होते. महाराष्ट्रासारख्या राज्याला आजही पूर्ण सरकार मिळालं नाही. आजही सर्वकाही ठीक नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते शेवटच्या क्षणी शपथ घ्यायला पोहचले, भाजपाने ठरवलं होतं, जर ते शपथ घेत नसतील तर त्यांच्याशिवाय हा सोहळा होणार होता. त्यानंतर माझे उपमुख्यमंत्रिपदही जाईल तेव्हा ते तिथे पोहचले असं संजय राऊतांनी सांगितले.

शक्यता नाकारता येत नाही

२ आठवडे झाले तरी सरकार नाही ही अस्वस्थता करणारी गोष्ट आहे. चांगले प्रशासन त्यांनी द्यावे ही माफक अपेक्षा आहे. लोकांचा कौल आपल्याला मान्य करावा लागतो. देशात महाराष्ट्राला एक नंबरला न्यावे, महाराष्ट्राचा हक्क दुसऱ्या राज्याला देऊ नये. महाराष्ट्राचा हक्क, सन्मान ठेवला पाहिजे. संजय राऊतांनी केलेला दावा नाकारता येत नाही. कारण जे आमंत्रण व्हॉट्सअपवर आले त्यात दोनच नावे होती. ते खरे निमंत्रण आहे की नाही मला माहिती नाही असं सांगत सुप्रिया सुळे यांनी राऊतांच्या दाव्याला दुजोरा दिला.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊतSupriya Suleसुप्रिया सुळेMahayutiमहायुती