शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

संभाजी भिडे गुरुजींच्या विधानावर उदयनराजे आक्रमक; म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 16:43 IST

संभाजी भिडे (sambhaji bhide) यांनी धक्कादायक आणि आक्षेपार्ह विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजे (udayanraje bhosale) चांगलेच आक्रमक झाले.

ठळक मुद्देसंभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर उदयनराजेंची प्रतिक्रियामी त्यांच्याशी चर्चा करूनच बोलेन - उदयनराजेकोण काय म्हणाले ते मला विचारू नका - उदयनराजे

सातारा: राज्यातील कोरोनाची स्थिती, लसीकरण मोहीम, लसींचा तुटवडा यांवरून राजकारण तापताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (sambhaji bhide) यांनी कोरोनामुळे मरणारी माणसे जगायच्या लायकीची नाहीत, असे धक्कादायक आणि आक्षेपार्ह विधान केले. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. (udayanraje bhosale react on sambhaji bhide guruji statement over corona)

सांगली येथे बोलताना संभाजी भिडे गुरूजी यांनी कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना धक्कादायक विधान केले. कोरोना हा रोग नसून, कोरोनाने मरणारी माणसे जगण्याच्या लायकीची नाहीत. जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील. लष्कराला काय मास्क लावून लढायला सांगणार आहोत का, असा रोकडा सवाल भिडे गुरूजींनी विचारला होता. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली.

केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करतंय; विखे-पाटील आक्रमक 

कोण काय म्हणाले ते मला विचारू नका

माझे प्रश्न मला विचारा, कोण काय म्हणाले ते मला विचारू नका. ते ज्या अँगलने बोलले त्यांनाच माहिती आहे. हवे तर मी त्यांच्याशी चर्चा करूनच बोलेन, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता. लोकसंख्या पाहूनच कोरोना लसींचे वाटप झाले पाहिजे. लसीच्या वाटपावरून उगाच वाद निर्माण करण्यात अर्थ नाही, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. तसेच लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही, असे उदयनराजे भोसले यांनी ठामपणे सांगितले.

कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार? राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

दरम्यान, दारुची दुकाने उघडी आहेत, त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे, त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे, लोकांनी बंड करुन उठायला हवे. असले हे शासन फेकून दिले पाहिजे. अजिबात उपयोगाचे नाही, असे संभाजी भिडे म्हणाले होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपाCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस