शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
4
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
5
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
6
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
7
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
8
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
9
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
10
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
11
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
12
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
13
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
14
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
15
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
16
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
17
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
18
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
19
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
20
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 

“वाल्मीक कराड-धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला”: सुरेश धस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:21 IST

Suresh Dhas News: धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे फार चांगले मित्र होते. विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड या दोघांमुळे त्यांच्या मैत्रीत दरी निर्माण झाली, असा दावा सुरेश धस यांनी केला.

Suresh Dhas News: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. तर भाजपा नेते सुरेश धस हेही यावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. यात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील उपस्थित राहिले. यातच आता २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या झालेल्या पराभवाला धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड जबाबदार असल्याचा मोठा दावा सुरेश धस यांनी केला आहे. 

या प्रकरणात सुरेश धस वाल्मीक कराडबाबत अनेक दावे करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. सुरेश धस यांच्याकडून होत असलेल्या टीकेवरून महायुतीत खटके उडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरेश धस यांच्याशी बोलतील, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

वाल्मीक कराड-धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला

पंकजा मुंडेंचा लोकसभेच्या पराभवानंतर माझ्याविषयी गैरसमज झाला. पंकजा मुंडे यांची जागा निवडून आली नाही, कारण लोकसभा निवडणुकीला बीड तालुक्यात ९८ हजार मते विरोधात गेली. ही मते कुणामुळे विरोधात गेली? यांच्याच कृपेमुळे आम्ही हरलो. सगळ्यांचे प्रारब्ध आम्ही ठरवू, असे धनंजय मुंडे म्हणाले होते. या सगळ्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. वाल्मीक कराडच्या दादागिरीचा प्रसार आणि प्रचार झाला. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, असा मोठा दावा सुरेश धस यांनी केला आहे. 

विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्या मैत्रीत दरी

बजरंग सोनावणे लोकसभा निवडणुकीत निवडून आले. धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे फार चांगले मित्र होते. या दोघांच्या मैत्रीचे वाटोळे विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड या दोघांनी केले. तेव्हापासून बजरंग सोनावणे विरोधात गेले, ते गेले नसते तर पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या नसत्या. दुसऱ्या कुणालाही उमेदवारी दिली असती तरीही पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या. बजरंग सोनावणेंसारखा तगडा उमेदवार तिकडे गेल्याने फटका बसला, असा दावाही सुरेश धस यांनी केला. ते टीव्ही९शी बोलत होते.  

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेPoliticsराजकारण