शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

“वाल्मीक कराड-धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला”: सुरेश धस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:21 IST

Suresh Dhas News: धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे फार चांगले मित्र होते. विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड या दोघांमुळे त्यांच्या मैत्रीत दरी निर्माण झाली, असा दावा सुरेश धस यांनी केला.

Suresh Dhas News: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. तर भाजपा नेते सुरेश धस हेही यावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. यात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील उपस्थित राहिले. यातच आता २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या झालेल्या पराभवाला धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड जबाबदार असल्याचा मोठा दावा सुरेश धस यांनी केला आहे. 

या प्रकरणात सुरेश धस वाल्मीक कराडबाबत अनेक दावे करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. सुरेश धस यांच्याकडून होत असलेल्या टीकेवरून महायुतीत खटके उडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरेश धस यांच्याशी बोलतील, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

वाल्मीक कराड-धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला

पंकजा मुंडेंचा लोकसभेच्या पराभवानंतर माझ्याविषयी गैरसमज झाला. पंकजा मुंडे यांची जागा निवडून आली नाही, कारण लोकसभा निवडणुकीला बीड तालुक्यात ९८ हजार मते विरोधात गेली. ही मते कुणामुळे विरोधात गेली? यांच्याच कृपेमुळे आम्ही हरलो. सगळ्यांचे प्रारब्ध आम्ही ठरवू, असे धनंजय मुंडे म्हणाले होते. या सगळ्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. वाल्मीक कराडच्या दादागिरीचा प्रसार आणि प्रचार झाला. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, असा मोठा दावा सुरेश धस यांनी केला आहे. 

विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्या मैत्रीत दरी

बजरंग सोनावणे लोकसभा निवडणुकीत निवडून आले. धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे फार चांगले मित्र होते. या दोघांच्या मैत्रीचे वाटोळे विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड या दोघांनी केले. तेव्हापासून बजरंग सोनावणे विरोधात गेले, ते गेले नसते तर पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या नसत्या. दुसऱ्या कुणालाही उमेदवारी दिली असती तरीही पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या. बजरंग सोनावणेंसारखा तगडा उमेदवार तिकडे गेल्याने फटका बसला, असा दावाही सुरेश धस यांनी केला. ते टीव्ही९शी बोलत होते.  

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेPoliticsराजकारण