शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

“वाल्मीक कराड-धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला”: सुरेश धस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:21 IST

Suresh Dhas News: धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे फार चांगले मित्र होते. विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड या दोघांमुळे त्यांच्या मैत्रीत दरी निर्माण झाली, असा दावा सुरेश धस यांनी केला.

Suresh Dhas News: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. तर भाजपा नेते सुरेश धस हेही यावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. यात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील उपस्थित राहिले. यातच आता २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या झालेल्या पराभवाला धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड जबाबदार असल्याचा मोठा दावा सुरेश धस यांनी केला आहे. 

या प्रकरणात सुरेश धस वाल्मीक कराडबाबत अनेक दावे करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. सुरेश धस यांच्याकडून होत असलेल्या टीकेवरून महायुतीत खटके उडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरेश धस यांच्याशी बोलतील, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

वाल्मीक कराड-धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला

पंकजा मुंडेंचा लोकसभेच्या पराभवानंतर माझ्याविषयी गैरसमज झाला. पंकजा मुंडे यांची जागा निवडून आली नाही, कारण लोकसभा निवडणुकीला बीड तालुक्यात ९८ हजार मते विरोधात गेली. ही मते कुणामुळे विरोधात गेली? यांच्याच कृपेमुळे आम्ही हरलो. सगळ्यांचे प्रारब्ध आम्ही ठरवू, असे धनंजय मुंडे म्हणाले होते. या सगळ्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. वाल्मीक कराडच्या दादागिरीचा प्रसार आणि प्रचार झाला. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, असा मोठा दावा सुरेश धस यांनी केला आहे. 

विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्या मैत्रीत दरी

बजरंग सोनावणे लोकसभा निवडणुकीत निवडून आले. धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे फार चांगले मित्र होते. या दोघांच्या मैत्रीचे वाटोळे विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड या दोघांनी केले. तेव्हापासून बजरंग सोनावणे विरोधात गेले, ते गेले नसते तर पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या नसत्या. दुसऱ्या कुणालाही उमेदवारी दिली असती तरीही पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या. बजरंग सोनावणेंसारखा तगडा उमेदवार तिकडे गेल्याने फटका बसला, असा दावाही सुरेश धस यांनी केला. ते टीव्ही९शी बोलत होते.  

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेPoliticsराजकारण