शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

सरकार चालवण्यास भाजप-शिवसेना अपयशी - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 20:13 IST

विकासाचे नाव घेत निवडून आलेले भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. विकासाच्या नुसत्याच बाजारगप्पा आपल्याला ऐकायला मिळतात.

पुणे - विकासाचे नाव घेत निवडून आलेले भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. विकासाच्या नुसत्याच बाजारगप्पा आपल्याला ऐकायला मिळतात. प्रत्यक्षात मात्र विकासकामे कोठेही दिसत नाही. आघाडीचे सरकार असताना राज्यावर २ लाख ८० हजार कोटींची कर्ज होते. मात्र सद्याच्या सरकारने कर्जमाफी आणि पायाभूत सुविधांचा विकासाच्या नावाखाली तब्बल ८ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर राज्यावर लादला आहे, असा थेट आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर केला.

पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ४५ आंगणवाडी सेविका, मदतनिस आणि पर्यवेक्षिका यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रम झाला. यावेळी अजित पवार बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, महिला बालकल्याण सभापती राणी शेळके, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, प्रभारी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चाटे उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले, राज्य सरकारला मागील तीन वर्षांत कोणत्याच घटकाचे प्रश्न सोडविता आले नाही. त्यामुळे सामान्यांना रस्त्यावर वारंवार उतरावे लागत आहे. आंगणवाडी सेविकांचा मानधनाची मागणी रास्त आहे. त्यांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे आहे. परंतू या सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. कोणीही आंदोलन आनंदाने करत नसते. मात्र सरकारला याचे गांभीर्यच नसल्याचे दिसून येते. आता या आंगणवाडी सेविका आपल्या न्याय मागण्यांसाठी पुन्हा राज्यभर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. 

विश्वास देवकाते म्हणाले, मुलींना शिकविल्यास देशाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. सावित्रीबाई फुले यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्यामुळेच आज महिला सगळ्या क्षेत्रात प्रगती करत आहे. जिल्ह्यातील आंगणवाडी सेविका अडीच लाख बालकांवर संस्काराचे मोठे काम करत आहे. त्यामुळे त्यांचा आपण सर्वांनी गौरव करणे कर्तव्यच आहे.  

सूरज मांढरे म्हणाले, आपल्या देशात मनुष्यबळ मोठे आहे. परंतू त्याला प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. आपले मनुष्यबळ प्रशिक्षित नसल्याने जगभरातील कंपन्या हजारो कोटींची गुंतवणूक करण्यास धजावत नाही. आपले मनुष्यबळ प्रशिक्षित झाल्यास हजारो कोटींची गुंतवणूक भारतात चालून येईल. त्यातून रोजगार निर्मिती होईल. सध्या आंगणवाडी सेविका कठिण परिस्थितीत उत्तम काम करत आहेत. त्यामुळे बाल वयात चिमुकल्यांवर चांगले संस्कार घडत आहेत. 

याप्रसंगी आंगणवाडी सेविकांना साडी-चोळी, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी भेट देण्यात आली. तसेच बारामती येथील आक्षय फाऊंडेशनच्या वतीने आंगणवाड्यांना ८३ लाख रूपय किंमतीचे गॅस शेगडी वाटप करण्यात आले.  

देव करो पालकमंत्र्यांची भविष्यवाणी खरी ठरो

सन २०१४ साली भाजप-शिवसेनेने मोठमोठी आश्वासने दिली आहेत. ती सर्व आश्वासने मागील तीन वर्षात पूर्ण झाली नाही. आता त्यांचेचे मंत्री जाहीर वाच्यता करायला लागले आहेत. हा एकप्रकारे त्यांना घरचा आहेर आहे. पुण्याचे पालकमंत्र्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरल्यास आम्ही २०१९ मध्ये सत्तेवर आल्यास आंगणवाडी सेविकांचे प्रश्न तातडीने सोडवू. या सरकारवर कोणत्याही घटकाचा विश्वास राहिल्या नसल्याचे असेही अजित पवार या वेळी म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPuneपुणे