शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

सरकार चालवण्यास भाजप-शिवसेना अपयशी - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 20:13 IST

विकासाचे नाव घेत निवडून आलेले भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. विकासाच्या नुसत्याच बाजारगप्पा आपल्याला ऐकायला मिळतात.

पुणे - विकासाचे नाव घेत निवडून आलेले भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. विकासाच्या नुसत्याच बाजारगप्पा आपल्याला ऐकायला मिळतात. प्रत्यक्षात मात्र विकासकामे कोठेही दिसत नाही. आघाडीचे सरकार असताना राज्यावर २ लाख ८० हजार कोटींची कर्ज होते. मात्र सद्याच्या सरकारने कर्जमाफी आणि पायाभूत सुविधांचा विकासाच्या नावाखाली तब्बल ८ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर राज्यावर लादला आहे, असा थेट आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर केला.

पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ४५ आंगणवाडी सेविका, मदतनिस आणि पर्यवेक्षिका यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रम झाला. यावेळी अजित पवार बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, महिला बालकल्याण सभापती राणी शेळके, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, प्रभारी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चाटे उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले, राज्य सरकारला मागील तीन वर्षांत कोणत्याच घटकाचे प्रश्न सोडविता आले नाही. त्यामुळे सामान्यांना रस्त्यावर वारंवार उतरावे लागत आहे. आंगणवाडी सेविकांचा मानधनाची मागणी रास्त आहे. त्यांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे आहे. परंतू या सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. कोणीही आंदोलन आनंदाने करत नसते. मात्र सरकारला याचे गांभीर्यच नसल्याचे दिसून येते. आता या आंगणवाडी सेविका आपल्या न्याय मागण्यांसाठी पुन्हा राज्यभर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. 

विश्वास देवकाते म्हणाले, मुलींना शिकविल्यास देशाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. सावित्रीबाई फुले यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्यामुळेच आज महिला सगळ्या क्षेत्रात प्रगती करत आहे. जिल्ह्यातील आंगणवाडी सेविका अडीच लाख बालकांवर संस्काराचे मोठे काम करत आहे. त्यामुळे त्यांचा आपण सर्वांनी गौरव करणे कर्तव्यच आहे.  

सूरज मांढरे म्हणाले, आपल्या देशात मनुष्यबळ मोठे आहे. परंतू त्याला प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. आपले मनुष्यबळ प्रशिक्षित नसल्याने जगभरातील कंपन्या हजारो कोटींची गुंतवणूक करण्यास धजावत नाही. आपले मनुष्यबळ प्रशिक्षित झाल्यास हजारो कोटींची गुंतवणूक भारतात चालून येईल. त्यातून रोजगार निर्मिती होईल. सध्या आंगणवाडी सेविका कठिण परिस्थितीत उत्तम काम करत आहेत. त्यामुळे बाल वयात चिमुकल्यांवर चांगले संस्कार घडत आहेत. 

याप्रसंगी आंगणवाडी सेविकांना साडी-चोळी, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी भेट देण्यात आली. तसेच बारामती येथील आक्षय फाऊंडेशनच्या वतीने आंगणवाड्यांना ८३ लाख रूपय किंमतीचे गॅस शेगडी वाटप करण्यात आले.  

देव करो पालकमंत्र्यांची भविष्यवाणी खरी ठरो

सन २०१४ साली भाजप-शिवसेनेने मोठमोठी आश्वासने दिली आहेत. ती सर्व आश्वासने मागील तीन वर्षात पूर्ण झाली नाही. आता त्यांचेचे मंत्री जाहीर वाच्यता करायला लागले आहेत. हा एकप्रकारे त्यांना घरचा आहेर आहे. पुण्याचे पालकमंत्र्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरल्यास आम्ही २०१९ मध्ये सत्तेवर आल्यास आंगणवाडी सेविकांचे प्रश्न तातडीने सोडवू. या सरकारवर कोणत्याही घटकाचा विश्वास राहिल्या नसल्याचे असेही अजित पवार या वेळी म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPuneपुणे