शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Oxygen Shortage: ऑक्सिजनसाठी केंद्राने दिलेला कोट्यवधीचा निधी कुठे गेला? भाजपचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 18:15 IST

Oxygen Shortage: भाजपकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

ठळक मुद्दे‘पीएम केअर्स’मधून १० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पतशी राजेश टोपे यांची इच्छा होती का? - भाजपआदिवासी बांधवाची अवस्था खूपच बिकट - प्रसाद लाड

मुंबई: एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा देशाला बसत असून, दुसरीकडे कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, ऑक्सिजन यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकार यासाठी करत असलेल्या उपाययोजना कमी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला असून, ऑक्सिजनसाठी केंद्राने दिलेला कोट्यवधीचा निधी कुठे गेला, अशी विचारणा करण्यात आली आहे. (prasad lad criticises thackeray govt over oxygen shortage)

केंद्र सरकारने ५ महिन्यांपूर्वीच राज्यासाठी १० ऑक्सिजन प्लांट मंजूर केले होते. या प्लांटसाठी पीएम केअर फंडातून निधीही देण्यात आला होता. ५ महिने झाले तरी ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात आला नाही. या प्लांटचे काय झाले? हा निधी गेला कुठे?, अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर यासंदर्भात टीकास्त्र सोडले आहे. 

केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन: देवेंद्र फडणवीस

‘पीएम केअर्स’मधून १० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

कोरोना संकटाच्या काळात कोणत्याच राज्याला अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनची कमतरता भासू नये. प्रत्येक राज्य या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात राज्य सरकारांना पत्रे पाठविली होती. त्यानुसार ‘पीएम केअर्स’ निधीतून महाराष्ट्राला १० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी निधी देण्यात आला. मात्र, गेल्या चार ते पाच महिन्यात या निधीचा वापर करून राज्य सरकारने एकही प्रकल्प सुरू केलेला नाही. केंद्र सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेल्या निधीचे काय केले याचा आघाडी सरकारने हिशोब द्यावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी यावेळी केली. 

१ मेपासून लसीकरणासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक; अन्यथा लस मिळणार नाही!

तशी राजेश टोपे यांची इच्छा होती का?

वसई-विरार येथील रूग्णालयाला आग लागल्याने १३ रूग्णांचा मृत्यू झाला, ही अतिशय क्लेशदायक बातमी आहे. अशा घटना घडल्यावर मृतांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देऊन राज्य सरकारची जबाबदारी संपत नाही. एखादी बातमी ही महत्वपूर्ण व राष्ट्रीय बातमी होण्यासाठी अधिक रुग्णांचे मृत्यू व्हावेत, अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची इच्छा होती का, अशी विचारणाही लाड यांनी केली आहे. 

पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार; केंद्राची घोषणा

आदिवासी बांधवाची अवस्था खूपच बिकट

पालघर, तलासरीसारख्या दुर्गम भागात आदिवासी बांधवाची अवस्था खूपच बिकट आहे. आरोग्य सुविधांचा तुटवडा आहेत पण सरकारच्या निर्बंधामुळे रूग्णांना जवळ असलेल्या गुजरातमधील रुग्णालयांमध्ये जाता येत नाही. तसेच तेथील डॉक्टरांना तलासरी येथे रूग्णांना उपचार देण्यासाठी येण्याची परवानगी मिळत नाही. राज्य सरकारने आदिवासी बांधवांना उपचार घेण्यासाठी आवश्यक सुविधा द्याव्यात, अशी मागणीही लाड यांनी यावेळी बोलताना केली.

लस उपलब्धतेची खात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे: महापौर

राज्याला लाखांवर रेमडेसिवीर औषधे

केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मागणीनुसार १० दिवसात ४ लाख ३५ हजार रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आत्तापर्यंत राज्याला १ लाख ६५ हजार औषधे मिळाली आहेत. तसेच राज्य सरकारनेही विविध यंत्रणांच्या माध्यमातून ५ लाख औषधांची खरेदी केलेली आहे. तरीदेखील राज्यात औषधांचा तुटवडा आहे. ही औषधे कुठे गायब झाली? या औषधांचा काळाबाजार झाला का?, अशी शंका प्रसाद लाड यांनी वर्तवली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOxygen Cylinderऑक्सिजनUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारRajesh Topeराजेश टोपेBJPभाजपाPrasad Ladप्रसाद लाडPoliticsराजकारण