शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

Oxygen Shortage: ऑक्सिजनसाठी केंद्राने दिलेला कोट्यवधीचा निधी कुठे गेला? भाजपचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 18:15 IST

Oxygen Shortage: भाजपकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

ठळक मुद्दे‘पीएम केअर्स’मधून १० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पतशी राजेश टोपे यांची इच्छा होती का? - भाजपआदिवासी बांधवाची अवस्था खूपच बिकट - प्रसाद लाड

मुंबई: एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा देशाला बसत असून, दुसरीकडे कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, ऑक्सिजन यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकार यासाठी करत असलेल्या उपाययोजना कमी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला असून, ऑक्सिजनसाठी केंद्राने दिलेला कोट्यवधीचा निधी कुठे गेला, अशी विचारणा करण्यात आली आहे. (prasad lad criticises thackeray govt over oxygen shortage)

केंद्र सरकारने ५ महिन्यांपूर्वीच राज्यासाठी १० ऑक्सिजन प्लांट मंजूर केले होते. या प्लांटसाठी पीएम केअर फंडातून निधीही देण्यात आला होता. ५ महिने झाले तरी ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात आला नाही. या प्लांटचे काय झाले? हा निधी गेला कुठे?, अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर यासंदर्भात टीकास्त्र सोडले आहे. 

केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन: देवेंद्र फडणवीस

‘पीएम केअर्स’मधून १० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

कोरोना संकटाच्या काळात कोणत्याच राज्याला अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनची कमतरता भासू नये. प्रत्येक राज्य या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात राज्य सरकारांना पत्रे पाठविली होती. त्यानुसार ‘पीएम केअर्स’ निधीतून महाराष्ट्राला १० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी निधी देण्यात आला. मात्र, गेल्या चार ते पाच महिन्यात या निधीचा वापर करून राज्य सरकारने एकही प्रकल्प सुरू केलेला नाही. केंद्र सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेल्या निधीचे काय केले याचा आघाडी सरकारने हिशोब द्यावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी यावेळी केली. 

१ मेपासून लसीकरणासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक; अन्यथा लस मिळणार नाही!

तशी राजेश टोपे यांची इच्छा होती का?

वसई-विरार येथील रूग्णालयाला आग लागल्याने १३ रूग्णांचा मृत्यू झाला, ही अतिशय क्लेशदायक बातमी आहे. अशा घटना घडल्यावर मृतांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देऊन राज्य सरकारची जबाबदारी संपत नाही. एखादी बातमी ही महत्वपूर्ण व राष्ट्रीय बातमी होण्यासाठी अधिक रुग्णांचे मृत्यू व्हावेत, अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची इच्छा होती का, अशी विचारणाही लाड यांनी केली आहे. 

पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार; केंद्राची घोषणा

आदिवासी बांधवाची अवस्था खूपच बिकट

पालघर, तलासरीसारख्या दुर्गम भागात आदिवासी बांधवाची अवस्था खूपच बिकट आहे. आरोग्य सुविधांचा तुटवडा आहेत पण सरकारच्या निर्बंधामुळे रूग्णांना जवळ असलेल्या गुजरातमधील रुग्णालयांमध्ये जाता येत नाही. तसेच तेथील डॉक्टरांना तलासरी येथे रूग्णांना उपचार देण्यासाठी येण्याची परवानगी मिळत नाही. राज्य सरकारने आदिवासी बांधवांना उपचार घेण्यासाठी आवश्यक सुविधा द्याव्यात, अशी मागणीही लाड यांनी यावेळी बोलताना केली.

लस उपलब्धतेची खात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे: महापौर

राज्याला लाखांवर रेमडेसिवीर औषधे

केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मागणीनुसार १० दिवसात ४ लाख ३५ हजार रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आत्तापर्यंत राज्याला १ लाख ६५ हजार औषधे मिळाली आहेत. तसेच राज्य सरकारनेही विविध यंत्रणांच्या माध्यमातून ५ लाख औषधांची खरेदी केलेली आहे. तरीदेखील राज्यात औषधांचा तुटवडा आहे. ही औषधे कुठे गायब झाली? या औषधांचा काळाबाजार झाला का?, अशी शंका प्रसाद लाड यांनी वर्तवली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOxygen Cylinderऑक्सिजनUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारRajesh Topeराजेश टोपेBJPभाजपाPrasad Ladप्रसाद लाडPoliticsराजकारण