शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील राजकीय चर्चेच्या वादळामागे भाजपाचं 'ऑपरेशन २७२' प्लॅन; नेमकं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 21:26 IST

भाजपाच्या गेम प्लॅनमध्ये २७२ खासदार जमवणे सुरू आहे. हे टार्गेट आधी २६० इतके होते, परंतु महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर टार्गेट २७२ इतके झाले.

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध राजकीय चर्चांना वेग आला आहे. त्यात प्रामुख्याने शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं मनोमिलन होणार असं बोलले गेले. त्यानंतर आता अजित पवार गटाकडून शरद पवार गटाच्या खासदारांना कॉल करून फोडण्यात येत असल्याचा आरोप झाला आहे. हा आरोप शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आमच्या पक्षातील खासदारांना फोन करत आहेत. बाप-लेकीला सोडून आमच्याकडे या असं सांगितले जात आहे. आमचे खासदार फोडण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जात आहे मात्र आमच्या खासदारांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला. प्रत्येकजण त्यांच्यासारखे कमरेचा लंगोट डोक्यावर घालून फिरत नाही. आमच्याकडे आजही नैतिकता आहे असं त्यांनी म्हटलं.

नितीश कुमारांना घाबरवण्याचा प्रयत्न 

त्याशिवाय हे सगळे नितीश कुमार यांना एनडीएतच ठेवण्यासाठी केले जात आहे. शरद पवार येतायेत, उद्धव ठाकरे येतायेत अशा चर्चा केल्या जातात जेणेकरून नितीश कुमार एनडीएतच राहतील. आमच्या खासदारांना फोन केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे असंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. तर जोपर्यंत शरद पवार गटाचे खासदार फोडणार नाही तोवर केंद्रात मंत्रिपद देणार नाहीअसं भाजपाने अट ठेवली आहे. प्रफुल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद हवे. शरद पवार गटाचे ६-७ आमदार फोडले तर पटेल मंत्री बनतील असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

'ऑपरेशन २७२' प्लॅनिंग?

दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या ऑपरेशन २७२ ची चर्चा सुरू आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या बळावर केंद्रात भाजपाचं २४० खासदारांच्या पाठिंब्याने अल्पमतात सरकार बनले आहे. चंद्राबाबू नायडू १६ आणि नितीश कुमार यांचे १२ खासदार यावर केंद्र सरकार टिकून आहे. या दोन्ही नेत्यांवर अवलंबून राहणे सोडण्यासाठी भाजपाकडून ऑपरेशन २७२ चं प्लॅनिंग केले जात असल्याचं बोलले जाते. ज्यात शरद पवार गटाचे ८ आणि उद्धव ठाकरे गटाचे ९ खासदार यांच्यावर भाजपाची नजर आहे. भाजपाच्या गेम प्लॅनमध्ये २७२ खासदार जमवणे सुरू आहे. हे टार्गेट आधी २६० इतके होते, परंतु महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर टार्गेट २७२ इतके झाले. सर्व खासदार सोबत येतील किंवा एक तृतीयांश खासदार फोडले जातील असा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.  

टॅग्स :BJPभाजपाSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitish Kumarनितीश कुमारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNarendra Modiनरेंद्र मोदी