शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

महाराष्ट्रातील राजकीय चर्चेच्या वादळामागे भाजपाचं 'ऑपरेशन २७२' प्लॅन; नेमकं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 21:26 IST

भाजपाच्या गेम प्लॅनमध्ये २७२ खासदार जमवणे सुरू आहे. हे टार्गेट आधी २६० इतके होते, परंतु महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर टार्गेट २७२ इतके झाले.

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध राजकीय चर्चांना वेग आला आहे. त्यात प्रामुख्याने शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं मनोमिलन होणार असं बोलले गेले. त्यानंतर आता अजित पवार गटाकडून शरद पवार गटाच्या खासदारांना कॉल करून फोडण्यात येत असल्याचा आरोप झाला आहे. हा आरोप शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आमच्या पक्षातील खासदारांना फोन करत आहेत. बाप-लेकीला सोडून आमच्याकडे या असं सांगितले जात आहे. आमचे खासदार फोडण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जात आहे मात्र आमच्या खासदारांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला. प्रत्येकजण त्यांच्यासारखे कमरेचा लंगोट डोक्यावर घालून फिरत नाही. आमच्याकडे आजही नैतिकता आहे असं त्यांनी म्हटलं.

नितीश कुमारांना घाबरवण्याचा प्रयत्न 

त्याशिवाय हे सगळे नितीश कुमार यांना एनडीएतच ठेवण्यासाठी केले जात आहे. शरद पवार येतायेत, उद्धव ठाकरे येतायेत अशा चर्चा केल्या जातात जेणेकरून नितीश कुमार एनडीएतच राहतील. आमच्या खासदारांना फोन केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे असंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. तर जोपर्यंत शरद पवार गटाचे खासदार फोडणार नाही तोवर केंद्रात मंत्रिपद देणार नाहीअसं भाजपाने अट ठेवली आहे. प्रफुल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद हवे. शरद पवार गटाचे ६-७ आमदार फोडले तर पटेल मंत्री बनतील असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

'ऑपरेशन २७२' प्लॅनिंग?

दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या ऑपरेशन २७२ ची चर्चा सुरू आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या बळावर केंद्रात भाजपाचं २४० खासदारांच्या पाठिंब्याने अल्पमतात सरकार बनले आहे. चंद्राबाबू नायडू १६ आणि नितीश कुमार यांचे १२ खासदार यावर केंद्र सरकार टिकून आहे. या दोन्ही नेत्यांवर अवलंबून राहणे सोडण्यासाठी भाजपाकडून ऑपरेशन २७२ चं प्लॅनिंग केले जात असल्याचं बोलले जाते. ज्यात शरद पवार गटाचे ८ आणि उद्धव ठाकरे गटाचे ९ खासदार यांच्यावर भाजपाची नजर आहे. भाजपाच्या गेम प्लॅनमध्ये २७२ खासदार जमवणे सुरू आहे. हे टार्गेट आधी २६० इतके होते, परंतु महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर टार्गेट २७२ इतके झाले. सर्व खासदार सोबत येतील किंवा एक तृतीयांश खासदार फोडले जातील असा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.  

टॅग्स :BJPभाजपाSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitish Kumarनितीश कुमारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNarendra Modiनरेंद्र मोदी