शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

“ठाकरे अन् पवारांना मुंबईत काँग्रेस नकोच, बाहेरचा रस्ता दाखवायचाय”; भाजपाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 16:01 IST

BJP Nitesh Rane News: उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना काँग्रेस मुंबईत नकोच आहे, यावर ठाकरे गटाच्या यादीवरून शिक्कामोर्तब होते, अशी टीका करण्यात आली आहे.

BJP Nitesh Rane News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. तर वंचित बहुजन आघाडीनेही काही उमेदवारांनी घोषणा केली. यानंतर मात्र महाविकास आघाडीतील धुसपूस समोर आल्याचे दिसत आहे. काँग्रेसने या यादीवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला नाराजीवरून फटकारले आहे. यातच या सगळ्या प्रकारावरून भाजपानेमहाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. 

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय होणे बाकी असताना उद्धव ठाकरे यांनी दोन जागांवर उमेदवार जाहीर केले. आघाडी धर्म पाळला असता तर बरे झाले असते. चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित करणे यामुळे आघाडी धर्माला गालबोट लागले, यावर त्यांनी पुनर्विचार करावा, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. तर बाळासाहेब थोरात यांनीही ठाकरे गटाच्या यादीवर नाराजी व्यक्त केली. या प्रकारानंतर भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

ठाकरे अन् पवारांना मुंबईत काँग्रेस नकोच आहे

नितेश राणे यांनी ठाकरे गटाने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीवरून डिवचले आहे. ते म्हणाले की, ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली. या गोष्टीवर शिक्कामोर्तब करते की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना काँग्रेस मुंबईत नकोच आहे. काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे. मुंबईतील ४ जागांवर ठाकरे गट लढवणार असेल तर, काँग्रेसच्या हाती काय लागणार, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. जे उद्धव ठाकरे स्वतःच्या भावासोबत राहिले नाहीत, ज्यांनी वडिलांचे विचार, धोरणे पुढे नेली नाहीत. संजय राऊतांच्या घरचे होऊ शकले नाहीत, तर हे तुमचे कसे होणार, अशी विचारणा नितेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान, चर्चेला मर्यादा असतात. ती चर्चा आमच्या दृष्टीने थांबलेली आहे असे आम्हाला वाटते. काँग्रेसने उमेदवार जाहीर केले त्यात रामटेक आहे. मग आम्ही आक्षेप घेतला का? पंतप्रधान कोणाला व्हायचे तर काँग्रेसचा होणार आहे. आम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जागा कुठे मागतो तर प्रादेशिक पक्ष म्हणून राज्यात जागा मागतो. महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे हे नेते आहेत. त्यांचे स्वत:चे स्थान आहे. प्रादेशिक पक्ष राहिले, टिकले तर पंतप्रधान काँग्रेसचाच होणार आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना फटकारले. 

टॅग्स :BJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४