शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

“ठाकरे अन् पवारांना मुंबईत काँग्रेस नकोच, बाहेरचा रस्ता दाखवायचाय”; भाजपाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 16:01 IST

BJP Nitesh Rane News: उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना काँग्रेस मुंबईत नकोच आहे, यावर ठाकरे गटाच्या यादीवरून शिक्कामोर्तब होते, अशी टीका करण्यात आली आहे.

BJP Nitesh Rane News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. तर वंचित बहुजन आघाडीनेही काही उमेदवारांनी घोषणा केली. यानंतर मात्र महाविकास आघाडीतील धुसपूस समोर आल्याचे दिसत आहे. काँग्रेसने या यादीवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला नाराजीवरून फटकारले आहे. यातच या सगळ्या प्रकारावरून भाजपानेमहाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. 

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय होणे बाकी असताना उद्धव ठाकरे यांनी दोन जागांवर उमेदवार जाहीर केले. आघाडी धर्म पाळला असता तर बरे झाले असते. चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित करणे यामुळे आघाडी धर्माला गालबोट लागले, यावर त्यांनी पुनर्विचार करावा, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. तर बाळासाहेब थोरात यांनीही ठाकरे गटाच्या यादीवर नाराजी व्यक्त केली. या प्रकारानंतर भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

ठाकरे अन् पवारांना मुंबईत काँग्रेस नकोच आहे

नितेश राणे यांनी ठाकरे गटाने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीवरून डिवचले आहे. ते म्हणाले की, ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली. या गोष्टीवर शिक्कामोर्तब करते की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना काँग्रेस मुंबईत नकोच आहे. काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे. मुंबईतील ४ जागांवर ठाकरे गट लढवणार असेल तर, काँग्रेसच्या हाती काय लागणार, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. जे उद्धव ठाकरे स्वतःच्या भावासोबत राहिले नाहीत, ज्यांनी वडिलांचे विचार, धोरणे पुढे नेली नाहीत. संजय राऊतांच्या घरचे होऊ शकले नाहीत, तर हे तुमचे कसे होणार, अशी विचारणा नितेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान, चर्चेला मर्यादा असतात. ती चर्चा आमच्या दृष्टीने थांबलेली आहे असे आम्हाला वाटते. काँग्रेसने उमेदवार जाहीर केले त्यात रामटेक आहे. मग आम्ही आक्षेप घेतला का? पंतप्रधान कोणाला व्हायचे तर काँग्रेसचा होणार आहे. आम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जागा कुठे मागतो तर प्रादेशिक पक्ष म्हणून राज्यात जागा मागतो. महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे हे नेते आहेत. त्यांचे स्वत:चे स्थान आहे. प्रादेशिक पक्ष राहिले, टिकले तर पंतप्रधान काँग्रेसचाच होणार आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना फटकारले. 

टॅग्स :BJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४