शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भाजप-राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये 'या' बाबतीत चुरस; तर थोरात स्पर्धेतही नाही !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 4:46 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे आयटी सेल सोशल मिडियावर सक्रीय झाले आहेत. राजकीय पक्षाच्या नेत्यांचा सोशल मिडियाचा वापर पाहिल्यास भाजप आघाडीवर असून, राष्ट्रवादीची नेतेमंडळी सुद्धा सोशल मिडियावरून सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसते.

- मोसीन शेख

मुंबई - 2014 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशात सोशल मिडियाचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी सोशल मिडियाचे महत्त्व जाणून त्याकडे मोर्चा वळविला. मात्र यात काँग्रेस पक्ष अजूनही पिछाडीवर दिसत आहे. तर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सोशल वॉर पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष सोशल मिडियावर सक्रीय असून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात मात्र स्पर्धेतही दिसत नाहीत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे आयटी सेल सोशल मिडियावर सक्रीय झाले आहेत. राजकीय पक्षाच्या नेत्यांचा सोशल मिडियाचा वापर पाहिल्यास भाजप आघाडीवर असून, राष्ट्रवादीची नेतेमंडळी सुद्धा सोशल मिडियावरून सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसते. मात्र काँग्रेसचे नेते थोरात सोशल मिडियावर सक्रीय नसल्याचे त्यांनी केलेल्या पोस्टच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटर हैंडलवरून 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या एक महिन्याच्या काळात 144 ट्विट केली असून 34 रिट्वीट केली आहेत. तर गेल्या सात दिवसांत त्यांनी 23 ट्विट केली असून 6  रिट्वीट केली आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या काळात 143  ट्विट केली आहे, तर 35  रिट्वीट केली आहेत. तर अक्टोबर महिन्याच्या या सात दिवसांत 32  ट्विट केली असून, 13  रिट्वीट केली आहेत.

दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सप्टेंबर महिन्यात आपल्या अधिकृत ट्विटर हैंडलवरून फक्त 15 ट्विट केली असून, 4  रिट्वीट केली आहेत. तर ऑक्टोबरच्या  सात दिवसात त्यांनी 3 ट्विट आणि 2  रिट्वीट केली आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सोशल मिडियावर फारच मागे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

उद्धव ठाकरेंचं अधिकृत ट्विटर हैंडलचं नाहीट्विटरवर एक्टीव्ह असण्यासंदर्भात शिवसेनेचा विचार केला तर, ट्विटरवर पक्षाचे अधिकृत अकाऊंट असून ते नेहमी सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ट्विटरवर अधिकृत अकाऊंट नसल्याचे दिसून येते. तर मोजके मंत्री सोडले तर शिवसेनेचे नेते सुद्धा सोशल मिडियावर सक्रीय नसल्याचे पाहायला मिळते.