शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 06:30 IST

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा केला. शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करत त्यांनी भेट घेतली.

दादांचा ‘आदर्श’ स्वीकारला का?

उपमुख्यमंत्री अजित पवार बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कधी अधिकारी, कार्यकर्ते, नेते, इतकेच काय काही वेळा माध्यम प्रतिनिधीही त्यांच्या शब्दबाणांतून सुटले नाहीत. दोन दिवसांपूर्वी त्यांचे पुतणे आणि शरद पवार गटाचे आ. रोहित पवार यांनीही अधिकाऱ्यांना जाहीर बैठकीत खडसावल्याचा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. आता  काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनीही कृषी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ‘व्यवस्था सुधारा, ती तुमची जबाबदारी आहे, नाहीतर तुम्हाला मोठी अद्दल घडवीन,’ असे पटोले या व्हिडीओत म्हणतात. राजकीय नेत्यांनी दादांचा  हा ‘आदर्श’ घेतला की काय?

देवाभाऊ, एवढं एक काम करा ना!

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे असे म्हणतात. जनतेसमोर सत्ताधारी- विरोधकांनी एकमेकांवर कडाडून टीका करायची. मात्र, एखादे काम साधून घ्यायचे असल्यास सौम्य भाषा, नव्हे भावनिक साद घालावी. असेही घडते. असाच एक किस्सा कामगार मेळाव्यात घडला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले. माथाडींना घरे मिळावीत यासाठी फडणवीस यांनी निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “देवाभाऊ संवेदनशील आहेत, हा प्रश्न तुमच्यासाठी किरकोळ आहे, आम्हाला फक्त निर्णय हवा आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या या आवाहनाला कामगारांनीही दाद दिली नसेल तर नवल.

ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा केला. शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करत त्यांनी भेट घेतली. वाटेत जिथे जिथे शेतकरी त्यांच्या ताफ्याला हात दाखवत तिथे ताफा थांबवून ते त्यांच्याशी चर्चा करत. मात्र, एके ठिकाणी त्यांची गाडी थांबली असता खा. संजय राऊत कारमध्येच बसले होते. त्यावरून भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रदेश कार्यालयातून दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेलेले राऊत गाडीत बसून काजू-बदाम खात होते, असा आरोप केला. एकीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे, तर दुसरीकडे राजकीय चिखलफेक सुरू आहे. त्यामुळेच आरोप-प्रत्यारोपांच्या पुरात अजून बरेच काही वाहून जाणार असे दिसते.

माथाडी मेळाव्यात भाजपची छाप!

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी, माथाडी कामगारांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच छाप नेहमीच दिसून येते. त्यातच ज्येष्ठ नेते शरद  पवार हे तर या कष्टकऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय. परंतु, आता परिस्थिती बदलली असल्याचा प्रत्यय अण्णासाहेब पाटील यांच्या नवी मुंबईत झालेल्या जयंती सोहळ्यात आला. यावेळी मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात मराठा आरक्षणावरच भर दिला. दुसरीकडे व्यासपीठावर भाजपचेच नेते अधिक होते. त्यामुळे आता कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपमय झाली, अशीच चर्चा होती. त्यामुळे याचे आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Wet Drought: Politicians' Blame Game Amidst Farmers' Tears and Nutty Allegations.

Web Summary : Marathwada farmers face devastation while politicians engage in blame games. Allegations fly as leaders visit flood-hit areas. Fadanvis addresses Mathadi workers, focusing on Maratha reservation, shifting political dynamics in the agricultural sector.
टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवार