शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “तुम्ही कितीही गर्दी करा, मते पडत नसतील तर अर्थच नाही”; आदित्य ठाकरेंच्या वर्मावर बोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 10:12 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेनेत उरलेल्या आमदार, खासदारांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून यावे, असे आव्हान देत आदित्य ठाकरेंच्या सभांची गर्दी कॅमेऱ्याची कमाल असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. ही हानी भरून काढण्यासाठी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे झंझावती दौरे सुरू आहेत. युवासैनिक आणि शिवसैनिकांची मोट बांधण्याचे जोरकस प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आदित्य ठाकरेंच्या सभांना होणाऱ्या गर्दीवरून भाजपने वर्मावर बोट ठेवले असून, तुम्ही कितीही गर्दी करा, मते पडत नसतील तर अर्थच नाही, असा टोला लगावण्यात आला आहे. 

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या ठिकठिकाणी होणाऱ्या सभांना मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. त्यापेक्षा मोठी गर्दी जमवून दाखविण्याचे आव्हानही दिले गेले. तर इकडे भाजपचे युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या गर्दीमागील गणित सांगत ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटात उरलेल्यांवर निशाणाही साधला आहे. गर्दी आणि सध्याची राजकीय गणिते सांगून राजकारणातील वास्तवाची स्वानुभावरून जाणीव करून देण्याचा प्रयत्नही विखे पाटील यांनी केला आहे.

ही तर कॅमेऱ्याची कमाल

सभेची गर्दी ही कॅमेऱ्याची कमालही असू शकते. ज्या पद्धतीने दाखवायचे, तसे चित्रिकरण केले असावे. अनेक राजकीय नेत्यांच्या सभांना गर्दी होते. लोकांना काय नवेपण आहे ते पाहण्याचे कुतूहल असते. ठाकरे यांना प्रतिसाद मिळत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही कितीही गर्दी केली आणि मते पडत नसतील तर त्याला अर्थ नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यासंबंधी लोकसभा निवडणुकाच्या वेळचा स्वत:चा अनुभवही त्यांनी सांगितला.

आडनाव अथवा कुटुंबाच्या आधारावर मते पडण्याचा काळ आता गेला

आपले आडनाव अथवा कुटुंबाच्या आधारावर मते पडण्याचा काळ आता गेला. त्यावेळी मी खासदार झालो यात माझे आजोबा, वडील यांच्या कार्याचे योगदान ५० टक्के आहे. मात्र ५० टक्के पक्ष व स्वकर्तृत्त्वावर आपले स्थान निर्माण करावे लागते. त्यामुळे तुम्ही कोणत्या कुटुंबातील आहात. कोठून आला आहात. तुमचे वडील कोण होते, आजोबा कोण होते. या गोष्टी आजच्या राजकारणात ५० टक्केच प्रभाव करतात, असे सुजय विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, आम्हीही शिवसेनेत होतो. नंतर काँग्रेसमध्ये गेलो. पुढे भाजपमध्ये आलो. शिवसेनेचे ते ४० आमदार काही दूधखुळे नाहीत. ते तिसऱ्यांदा अथवा चौथ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकलेले आहेत. मलाही लोकसभेत पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पाया भक्कम आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेची भाजपसोबत युती होती. त्यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आणि फोटो वापरून विजयी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत उरलेल्या आमदार आणि खासदारांनी आपला राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून यावे, असे आव्हान विखे-पाटील यांनी दिले.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSujay Vikheसुजय विखे