शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: NCPचे १० बडे नेते रडारवर! ५ जणांची कागदपत्रं तयार; BJP खासदाराचा मोठा दावा, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 15:08 IST

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष सर्वांत भ्रष्ट असल्याची घणाघाती टीका भाजप खासदाराने केली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते ईडीच्या रडावर आल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० नेत्यांवर ईडीची करडी नजर असून, यापैकी ५ नेत्यांच्या प्रकरणांची कागदपत्रेही तयार झाली असल्याचा मोठा दावा एका भाजप खासदाराने केला आहे.

सुरुवातीला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अगदी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. यानंतर आता मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली होती. मोहित कंबोज यांच्यानंतर आता भाजप खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या १० नेत्यांबाबत मोठा दावा केल्याचे सांगितले जात आहे. 

राष्ट्रवादीच्या १० बड्या भ्रष्ट नेत्यांची प्रकरणे तपास  यंत्रणांना देणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १० बड्या भ्रष्ट नेत्यांची प्रकारणे केंद्रीय तपास  यंत्रणांना देणार असून, यातील ५ जणांची कागदपत्रे तयार झाल्याचा गौप्यस्फोट माढाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे. आत्तापर्यंत किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज अशा पद्धतीचे आरोप करत होते. आता भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर मैदानात उतरले असून, राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष  सर्वात भ्रष्ट असल्याचा घणाघात निंबाळकर यांनी केला. आपण तक्रार देणार असणाऱ्या दहा पैकी पाच राष्ट्रवादी बड्या नेत्यांच्या पुराव्याच्या फाईल तयार झाल्याने त्या ईडी आणि सीबीआयडीकडे देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

ईडीची वक्रदृष्टी पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे

सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार याना क्लिन चिट दिल्याचा आभास निर्माण केला जात असला तरी जनतेच्या पैशाचा भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. पवार यांच्या लवासा प्रकरणावर देखील सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारल्याचे सांगताना या जमिनी देताना जलसंपदा मंत्री कोण होता? जमिनी कशा दिल्या, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. जलसंपदा मंत्रालयात अनेक प्रकरणात घोटाळे झाले असल्याचे आरोप असल्याने या चौकशा तर होणारच, असा इशाराही निंबाळकर यांनी दिला. यानंतर पुन्हा एकदा राज्यात ईडीची वक्रदृष्टी राष्ट्रवादीकडे वळणार याचे संकेत मिळू लागले आहेत. 

दरम्यान, फलटण येथील एक बडा नेता कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाला, जेलमध्ये जाण्यापेक्षा आता भाजपत गेलेले बरे, असे सांगत सुटला असला तरी कृष्ण खोरे महामंडळात अनेक फाईलवर सह्या केल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. आता भाजपमध्ये आला तरी या प्रकरणांच्या चौकशी होणार, असे निंबाळकर यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच सोलापूर जिल्ह्यातील उजनीचे पाणी बारामतीकडे वळविण्याचा निर्णय आता कायमचा रद्द केला जाणार असून नीरेचे पाणी पुन्हा दुष्काळी सांगोला आणि सोलापूरला परत मिळविले जाणार असल्याचे रणजित निंबाळकर म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळNCPराष्ट्रवादी काँग्रेसRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरBJPभाजपा