शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

Maharashtra Political Crisis: NCPचे १० बडे नेते रडारवर! ५ जणांची कागदपत्रं तयार; BJP खासदाराचा मोठा दावा, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 15:08 IST

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष सर्वांत भ्रष्ट असल्याची घणाघाती टीका भाजप खासदाराने केली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते ईडीच्या रडावर आल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० नेत्यांवर ईडीची करडी नजर असून, यापैकी ५ नेत्यांच्या प्रकरणांची कागदपत्रेही तयार झाली असल्याचा मोठा दावा एका भाजप खासदाराने केला आहे.

सुरुवातीला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अगदी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. यानंतर आता मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली होती. मोहित कंबोज यांच्यानंतर आता भाजप खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या १० नेत्यांबाबत मोठा दावा केल्याचे सांगितले जात आहे. 

राष्ट्रवादीच्या १० बड्या भ्रष्ट नेत्यांची प्रकरणे तपास  यंत्रणांना देणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १० बड्या भ्रष्ट नेत्यांची प्रकारणे केंद्रीय तपास  यंत्रणांना देणार असून, यातील ५ जणांची कागदपत्रे तयार झाल्याचा गौप्यस्फोट माढाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे. आत्तापर्यंत किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज अशा पद्धतीचे आरोप करत होते. आता भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर मैदानात उतरले असून, राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष  सर्वात भ्रष्ट असल्याचा घणाघात निंबाळकर यांनी केला. आपण तक्रार देणार असणाऱ्या दहा पैकी पाच राष्ट्रवादी बड्या नेत्यांच्या पुराव्याच्या फाईल तयार झाल्याने त्या ईडी आणि सीबीआयडीकडे देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

ईडीची वक्रदृष्टी पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे

सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार याना क्लिन चिट दिल्याचा आभास निर्माण केला जात असला तरी जनतेच्या पैशाचा भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. पवार यांच्या लवासा प्रकरणावर देखील सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारल्याचे सांगताना या जमिनी देताना जलसंपदा मंत्री कोण होता? जमिनी कशा दिल्या, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. जलसंपदा मंत्रालयात अनेक प्रकरणात घोटाळे झाले असल्याचे आरोप असल्याने या चौकशा तर होणारच, असा इशाराही निंबाळकर यांनी दिला. यानंतर पुन्हा एकदा राज्यात ईडीची वक्रदृष्टी राष्ट्रवादीकडे वळणार याचे संकेत मिळू लागले आहेत. 

दरम्यान, फलटण येथील एक बडा नेता कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाला, जेलमध्ये जाण्यापेक्षा आता भाजपत गेलेले बरे, असे सांगत सुटला असला तरी कृष्ण खोरे महामंडळात अनेक फाईलवर सह्या केल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. आता भाजपमध्ये आला तरी या प्रकरणांच्या चौकशी होणार, असे निंबाळकर यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच सोलापूर जिल्ह्यातील उजनीचे पाणी बारामतीकडे वळविण्याचा निर्णय आता कायमचा रद्द केला जाणार असून नीरेचे पाणी पुन्हा दुष्काळी सांगोला आणि सोलापूरला परत मिळविले जाणार असल्याचे रणजित निंबाळकर म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळNCPराष्ट्रवादी काँग्रेसRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरBJPभाजपा