शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

…अन्यथा गाठ माझ्याशी अन् धनगरांशी आहे; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 11:18 IST

आगामी अर्थसंकल्पात तरी सत्य आणि न्यायानं धनगरांना निधी द्यावा. आश्वासनाचं पोतेरं फिरवू नये अन्यथा तुम्ही करत असलेल्या अन्यायाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असं पत्र गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना लिहिलं आहे.

मुंबई – राज्यात एकीकडे मराठा आरक्षण पुन्हा पेटत असताना दुसरीकडे धनगर समाजाच्या विविध मागण्यांवरुन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर(BJP Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना(DCM Ajit Pawar) पत्र लिहिलं आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली होती. जोपर्यंत धनगर समाजाला ‘एसटी’चा दाखला मिळत नाही. मुघल, इंग्रज हर एक गनिमांना अंगावर घेऊन स्वातंत्र्याचा ध्वज उंचवणारा माझा समाज. माझ्या समाजाचा वापर  आज प्रस्थापितांच्या सतरंज्या उचलण्यासाठी व्हावा, अशी काही मोजक्या घराण्यांची इच्छा आहे असं सांगत पडळकरांनी पवार कुटुंबीयांवर आरोप केला आहे.

गोपीचंद पडळकर म्हणतात की, आरक्षण(Dhangar Reservation) मिळत नाही तोपर्यंत कोंडी फोडण्याची ताकद फडणवीस सरकारनं धनगर समाजासाठी दिलेल्या "जे आदिवासांनी ते धनगरांना" या धोरणांतर्गत महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजनेसह २२ कल्याणकारी योजनेत होती. यासाठी १ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. मात्र प्रस्थापितांनी सत्ता ताब्यात घेऊन परत ३ कोटी धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्याचं काम केलंय. लॉकडाऊन, अतिवृष्टी, गावागावत हल्ले, आघाडीचं सरकार आलं की विस्थापितांना टाचेखाली चिरडण्याचा राक्षसी आनंद प्रस्थापितांना घ्यायचा असतो असं त्यांनी सांगितले.

तसेच आजही धनगर समाज अनेक सुविधांपासून वंचित आहे. धनगर वाड्यांवर नसलेल्या मुलभूत सुविधांमुळे अर्थचक्र बिघडले आहे. इतक्या सर्व समस्यांशी धनगर समाज कधी नव्हे इतका संघर्ष आजघडीला करतोय. त्यामुळे त्यांच्या लढवय्या बाहूंना बळ देऊन सामाजिक न्याय स्थापित करणं गरजेचे आहे. आगामी अर्थसंकल्पात तरी सत्य आणि न्यायानं धनगरांना निधी द्यावा. आश्वासनाचं पोतेरं फिरवू नये अन्यथा तुम्ही करत असलेल्या अन्यायाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. धनगरांच्या सक्षमीकरणाच्या योजना तातडीनं लागू करा, अन्यथा गाठ ३ कोटी धगनर बांधवांशी आणि गोपीचंद पडळकर यांच्याशी आहे लक्षात ठेवा असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

दरम्यान, मागील अर्थसंकल्पात फडणवीस सरकारनं केलेल्या योजनांचे फक्त बाह्य स्वरुप बदलून नव्या घोषणा केल्या परंतु या योजना फक्त कागदावरच राहिल्या. यामुळे धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्यासाठीच तुम्ही घोषणा केल्या होत्या का? असा सवाल धनगर समाजाच्या मनात वारंवार उपस्थित राहत आहे. अस्तित्त्वावर प्रश्न उभा राहिला की, साधी मुंगीसुद्धा बलाढ्य हत्तीला लोळवते, तुम्ही ३ कोटी धनगर समाजाला हिणकस वागणूक देताय असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरDhangar Reservationधनगर आरक्षणBJPभाजपा