शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

…अन्यथा गाठ माझ्याशी अन् धनगरांशी आहे; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 11:18 IST

आगामी अर्थसंकल्पात तरी सत्य आणि न्यायानं धनगरांना निधी द्यावा. आश्वासनाचं पोतेरं फिरवू नये अन्यथा तुम्ही करत असलेल्या अन्यायाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असं पत्र गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना लिहिलं आहे.

मुंबई – राज्यात एकीकडे मराठा आरक्षण पुन्हा पेटत असताना दुसरीकडे धनगर समाजाच्या विविध मागण्यांवरुन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर(BJP Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना(DCM Ajit Pawar) पत्र लिहिलं आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली होती. जोपर्यंत धनगर समाजाला ‘एसटी’चा दाखला मिळत नाही. मुघल, इंग्रज हर एक गनिमांना अंगावर घेऊन स्वातंत्र्याचा ध्वज उंचवणारा माझा समाज. माझ्या समाजाचा वापर  आज प्रस्थापितांच्या सतरंज्या उचलण्यासाठी व्हावा, अशी काही मोजक्या घराण्यांची इच्छा आहे असं सांगत पडळकरांनी पवार कुटुंबीयांवर आरोप केला आहे.

गोपीचंद पडळकर म्हणतात की, आरक्षण(Dhangar Reservation) मिळत नाही तोपर्यंत कोंडी फोडण्याची ताकद फडणवीस सरकारनं धनगर समाजासाठी दिलेल्या "जे आदिवासांनी ते धनगरांना" या धोरणांतर्गत महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजनेसह २२ कल्याणकारी योजनेत होती. यासाठी १ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. मात्र प्रस्थापितांनी सत्ता ताब्यात घेऊन परत ३ कोटी धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्याचं काम केलंय. लॉकडाऊन, अतिवृष्टी, गावागावत हल्ले, आघाडीचं सरकार आलं की विस्थापितांना टाचेखाली चिरडण्याचा राक्षसी आनंद प्रस्थापितांना घ्यायचा असतो असं त्यांनी सांगितले.

तसेच आजही धनगर समाज अनेक सुविधांपासून वंचित आहे. धनगर वाड्यांवर नसलेल्या मुलभूत सुविधांमुळे अर्थचक्र बिघडले आहे. इतक्या सर्व समस्यांशी धनगर समाज कधी नव्हे इतका संघर्ष आजघडीला करतोय. त्यामुळे त्यांच्या लढवय्या बाहूंना बळ देऊन सामाजिक न्याय स्थापित करणं गरजेचे आहे. आगामी अर्थसंकल्पात तरी सत्य आणि न्यायानं धनगरांना निधी द्यावा. आश्वासनाचं पोतेरं फिरवू नये अन्यथा तुम्ही करत असलेल्या अन्यायाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. धनगरांच्या सक्षमीकरणाच्या योजना तातडीनं लागू करा, अन्यथा गाठ ३ कोटी धगनर बांधवांशी आणि गोपीचंद पडळकर यांच्याशी आहे लक्षात ठेवा असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

दरम्यान, मागील अर्थसंकल्पात फडणवीस सरकारनं केलेल्या योजनांचे फक्त बाह्य स्वरुप बदलून नव्या घोषणा केल्या परंतु या योजना फक्त कागदावरच राहिल्या. यामुळे धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्यासाठीच तुम्ही घोषणा केल्या होत्या का? असा सवाल धनगर समाजाच्या मनात वारंवार उपस्थित राहत आहे. अस्तित्त्वावर प्रश्न उभा राहिला की, साधी मुंगीसुद्धा बलाढ्य हत्तीला लोळवते, तुम्ही ३ कोटी धनगर समाजाला हिणकस वागणूक देताय असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरDhangar Reservationधनगर आरक्षणBJPभाजपा