शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या विरोधात लढा उभारणार: राणा जगजितसिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 10:55 AM

सरकारने २ लाख रुपयांपर्यंतची केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांचे सप्टेंबर, २०१९ पर्यंतचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विधानसभेत केली. त्यासाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मार्च, २०२० पासून लागू होईल, असे ठाकरे यांनी जाहीर केले. मात्र सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाळला नसून, याविरोधात शेतकऱ्यांच्या साथीने लढा उभारणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिला आहे.

नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारने शेवटच्या दिवशी २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली. मात्र सरकारने २ लाख रुपयांपर्यंतची केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तर याच मुद्यावरून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकार स्थापन होण्यापूर्वी औरंगाबादसह मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दौरा केला होता. तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता, अटी-शर्ती बाजूला ठेवून तातडीची मदत म्हणून हेक्टरी २५ हजाराची मदत देण्याची मागणी ठाकरेंनी त्यावेळी केली होती. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना ही मदत मिळण्याची अपेक्षा होती. परंतु अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ही नुकसान भरपाई मुख्यमंत्री देऊ शकले नसल्याचा आरोप राणा जगजितसिंह यांनी केला आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत आपले सरकार आल्यावर शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. तर शेतकरी कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करण्याची घोषणा सुद्धा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र शनिवारी सरकराने जाहीर केलेल्या कर्जमाफीत फक्त २ लाख रुपयांचीच माफी असणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काळात सरसकट कर्जमाफी व शेतकऱ्यांना २५ हजाराची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारणार असल्याचा इशारा राणा जगजितसिंह पाटील यांनी दिला आहे.