शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 16:25 IST

BJP Nitesh Rane News: राहुल गांधी पार्ट टाइम राजकारणी आहेत. अधिकतर परदेशातच असतात. जनतेशी नाळ अजिबात नाही, अशी टीका करण्यात आली आहे.

BJP Nitesh Rane News: राहुल गांधी हे जनतेशी नाळ नसलेले नेते आहेत. देशासाठी पर्यटक असलेले नेते आहेत. अधिक वेळ ते बाहेरच असतात. आताही बाहेरच आहेत. देशाची बदनामी करतात. थोडे दिवस देशात राहतात आणि पुन्हा परदेशात जातात. अर्धवेळ राजकारणी आहेत. यांना १०० टक्के भारतीय म्हणायचे का हा प्रश्न उपस्थित होतो, या शब्दांत भाजपा नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी टीका केली. 

बिहार निवडणूक निकालांवर नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींवर निशाणा साधताना नितेश राणे म्हणाले की, अशा लोकांना बिहारच्या जनतेने नाकारले. एका बाजूला व्होटचोरी म्हणून बोंब मारायची आणि दुसरीकडे लोकशाहीची थट्टा करायची, ही राहुल गांधींची सवय आहे. त्यामुळे बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या एनडीएला बिहारच नेतृत्व करण्याची संधी दिली आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. 

काँग्रेस आणि मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे

मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. यावर भाष्य करताना नितेश राणे म्हणाले की, काँग्रेस आणि मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत तर आपण लाबून हसणे योग्य आहे. काँग्रेसवाले नुसत्या सुक्या धमक्या देतात. विजय वडेट्टीवार वेगळे बोलतात, वर्षा गायकवाड वेगळे बोलतात, तर तिकडे अस्लम शेख वेगळे बोलणार. मात्र, हे सगळे मुंबईवर हिरव्यांचे राज्य आणण्यासाठी हे कार्यक्रम आहेत. काँग्रेसची भाषा ही जिह्याद्यांची भाषा आहे. काँग्रेसवर मुंबईसह, राज्यात, देशात कुणाचाही विश्वास राहिला नाही, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली. 

दरम्यान, देशाच्या संरक्षण मंत्रालयाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सैनिक शाळा सुरू होत आहे. ही जिल्हासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या शाळेच्या माध्यमातून भविष्यात अनेक सैनिकांसह मोठे अधिकारी त्यातून तयार होतील. हा विश्वास आहे, असे राणे यांनी नमूद केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP mocks Congress-MNS alliance talks, criticizes Rahul Gandhi sharply.

Web Summary : BJP's Nitesh Rane slams Rahul Gandhi as a part-time politician, disconnected from the people. He mocked potential Congress-MNS alliance talks, saying it's laughable. Rane also highlighted the upcoming Sainik school in Sindhudurg as a source of pride.
टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे congressकाँग्रेसMNSमनसेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी