शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
2
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
3
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
4
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
5
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
6
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
7
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
8
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
9
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
10
"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
11
"त्याला कशाला दोष देता?"; सुनील गावसकरांनी घेतली गौतम गंभीरची बाजू, दोषी कोण तेही सांगितलं
12
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
13
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
14
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
15
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
16
Virat Kohli: कोहली विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर; शतक ठोकताच बनेल क्रिकेटचा हुकमी 'ऐक्का'!
17
एकाच झटक्यात चांदी १६०० रुपयांपेक्षा अधिक महागली, सोन्याचे दरही वाढले; पाहा १४ ते २४ कॅरेट Gold रेट
18
लडाखबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; उपराज्यपालांकडून 'हे' अधिकार काढून घेतले...
19
"थकून घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा"; बांधकाम कामगारांवर बोलताना गिरीश महाजन यांचा सल्ला
20
बँक ग्राहकांनो लक्ष द्या! डिसेंबरमध्ये तब्बल १८ दिवस बँका बंद; सलग ५ दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कामे खोळंबणार!
Daily Top 2Weekly Top 5

“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 16:11 IST

BJP Leader Ram Naik News: जितेंद्र सिंह यांच्या विधानाचा गैरलाभ घेऊन ‘मुंबई’वरून विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजू नये, अशी टीका राम नाईक यांनी केली.

BJP Leader Ram Naik News: केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून मुंबई केले नाही, याचा आनंद असल्याचे विधान केले होते. या विधानावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई नको, बॉम्बेच हवे यातून हे शहर हळूच ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधी मुंबई नंतर संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता. या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी उडी घेतली असून, विरोधकांचा समाचार घेतला.

राज यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पंतप्रधान व मनुष्यबळ विकास मंत्री यांना पत्र लिहून आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून आयआयटी मुंबई केले पाहिजे, अशी विनंती करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच बॉम्बेचे मुंबई नामकरण करण्यामागे भाजपा नेते रामभाऊ नाईक यांचा मोठा वाटा आहे. आमच्यासाठी ते बॉम्बे नाही तर मुंबईच आहे. अशा प्रकारच्या ज्या बॉम्बेच्या खुणा आहेत त्या संपवून तेथे मुंबईच आले पाहिजे. मात्र, काही लोक सोईस्करपणे आपल्या मुलांना ज्या शाळेत शिकवितात त्याचे नाव बदलले पाहिजे, अशा प्रकारची विनंती करत नाहीत, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यानंतर आता राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले आहे.

विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजू नये

राम नाईक यांच्या सहा वर्षांच्या अविरत प्रयत्नांनंतर केंद्र सरकारने 'बॉम्बे' 'बम्बई' ऐवजी सर्व भाषांत 'मुंबई' हेच नाव वापरण्याचा अध्यादेश १५ डिसेंबर १९९५ रोजी जारी केला होता. मात्र नुकतेच केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी बॉम्बेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेच्या संदर्भात राम नाईक यांनी भूमिका मांडली. सिंह यांच्या वक्तव्याचा गैरलाभ घेऊन विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजू नये, 'बॉम्बे' 'बम्बई' चे 'मुंबई' करण्यामागच्या आमच्या यशस्वी प्रयत्नांनी इतिहास घडविला आहे असे ते म्हणाले.

'मुंबई'चे श्रेय घेण्याचा आता ३० वर्षांनी प्रयत्न करु नये

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी मुंबईच्या इतिहासाची पूर्ण माहिती नसल्याने 'आयआयटी'च्या नावातील 'बॉम्बे'ची भलामण केली असली, तरी वस्तुस्थिती समजल्यावर ते नक्कीच आपले विधान मागे घेतील, असा विश्वास 'बॉम्बे', 'बम्बई'चे 'मुंबई' करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी व्यक्त केला. मात्र संपूर्ण इतिहास माहिती असलेल्या विरोधकांनी त्यावरून टीकेची झोड उठवून 'मुंबई'चे श्रेय उपटण्याचा आता ३० वर्षांनी प्रयत्न करु नये, असा इशाराही नाईक यांनी यावेळी दिला.

दरम्यान, वर्षानुवर्षे पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्राची अस्मिता राखण्याचा ऐतिहासिक निर्णय करण्याचे भाग्य मला लाभले, बॉम्बे, बम्बईचे मुंबई झाले. बॉम्बे, बम्बईचे मुंबई झाल्यानंतर मद्रासचे चेन्नई, कलकत्याचे कोलकाता, बंगलोरचे बेंगलुरू, त्रिवेंद्रम तिरुअनंतपुरम् अशी अनेक मूळची नावे सरकारमान्य झाली, सर्वत्र वापरली जाऊ लागली. त्यानंतर मी उत्तर प्रदेशचा राज्यपाल असताना माझ्या आदेशानेच 'अलाहाबाद'चे प्रयागराज आणि 'फैजाबाद' चे 'अयोध्या' झाले. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही आता 'इंडिया ऐवजी आवर्जून 'भारत' म्हणताना आपण पाहतो, याकडेही नाईक यांनी लक्ष वेधले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Don't claim Mumbai credit after 30 years: Ram Naik slams opposition.

Web Summary : Ram Naik criticizes the opposition for attempting to take credit for renaming Bombay to Mumbai after 30 years. He highlights his efforts in the renaming and accuses the opposition of political opportunism. Naik also mentioned other city name changes in India.
टॅग्स :Ram Naikराम नाईकBJPभाजपाBMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२५Mahayutiमहायुती