शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

"रिक्षावाला घाम गाळतो, कुठलाही व्यवसाय नसताना आदित्य ठाकरेंच्या नावे कोट्यवधीची संपत्ती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 10:53 IST

याआधीही या गटाचे संजय राऊत, आदित्य ठाकरे व स्वतः उद्धव ठाकरे यांनीही शिंदे यांच्यासह सर्व बंडखोरांना त्यांच्या व्यावसायिक स्तरावरून हिणविले आहे असं भाजपानं म्हटलं.

मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादीत दिग्गज नेते आहेत, ते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं विधान करून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत चांगलेच अडचणीत आले आहेत. महाविकास आघाडी सरकार बनवताना मुख्यमंत्रिपदाची चर्चा झाली होती. त्यात शरद पवारांनी असं विचारल्याने उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री बनण्याची वेळ आली असा दावा अरविंद सावंत यांनी केला. मात्र पवारांनी रिक्षावाला शब्दच वापरला नाही असं राष्ट्रवादीने सांगताच सावंत यांनी यू-टर्न घेत तो शब्द आमची भाषा आहे. शरद पवार बोलले नाहीत अशी सारवासारव केली. मात्र आता यावरून भाजपाने ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात ‘रिक्षावाला’ हा व्यावसायिकतेचा उपरोध करणारा शब्द शरद पवार यांनी वापरला नसून तो आपण वापरला अशी कबुली अरविंद सावंतांनी दिली. ठाकरे गटाचे शिल्लक खासदार सावंत यांनी आपल्यावरील राजकीय संस्काराचे दर्शन घडविले आहे. हा शिंदे यांचा अपमान तर आहेच, पण उदरनिर्वाहासाठी घाम गाळणाऱ्या रिक्षाचालतांच्या व्यवसायाचाही अपमान आहे. या देशात आणि जगात सर्वत्र श्रमाला प्रतिष्ठा आहे, याचे संस्कार सावंत यांना राजकीय उंचीवर नेऊन बसविणाऱ्या ठाकरे सेनेतही नाहीत याचा हा आणखी एक पुरावा आहे असा आरोप त्यांनी केला. 

तसेच याआधीही या गटाचे संजय राऊत, आदित्य ठाकरे व स्वतः उद्धव ठाकरे यांनीही शिंदे यांच्यासह सर्व बंडखोरांना त्यांच्या व्यावसायिक स्तरावरून हिणविले आहे. ठाकरे कुटुंब हेच या सर्वांचे उद्धारकर्ते आहेत आणि या कुटुंबाच्या उपकारांमुळेच हे नेते मोठे झाले अशा आशयाची दर्पेक्ती करताना, या नेत्यांनी आपला पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले कष्ट आणि खाल्लेल्या खस्ता यांचा ठाकरे कुटुंबास कृतघ्न विसर पडला. मुख्यमंत्री शिंदे यांना शरद पवार यांच्या नावाआडून रिक्षावाला असे हिणविणाऱ्या सावंतांनी याच संस्कृतीचा कित्ता गिरविला आहे असा टोला केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटाला लगावला. 

दरम्यान, व्यावसायिक प्रतिष्ठा पाहूनच कोणी कोणाच्या हाताखाली काम करायचे हा निकष महाविकास आघाडीच्या नेतानिवडीत असेल, तर आदित्य ठाकरे यांच्या हाताखाली काम करण्यास कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील ते दिग्गज तयार झाले असते का? कारण, व्यवसायाचा नेमका तपशील जाहीर नसतानाही कोट्यवधीची मालमत्ता आदित्य ठाकरेंच्या नावावर जमा होती. अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिणविल्यामुळे श्रीमंती आणि धनसत्ता हे नेतृत्वगुणाचे लक्षण मानणारी ठाकरे गटाची मानसिकता स्पष्ट झाली आहे. व्यवसायावरून सामाजिक प्रतिष्ठेचा स्तर ठरविणाऱ्या या मानसिकतेचा निषेध व्हायलाच हवा असंही भाजपानं म्हटलं आहे. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेBJPभाजपाArvind Sawantअरविंद सावंत