शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पत्रपंडितहो तुम्ही तर मियाँ दरबारी! आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 13:59 IST

चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका करणाऱ्या शिवसेनेला आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांना भाजपा नेते आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे.

मुंबई - काही महिन्यांवर आलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेना यांच्यातील वाकयुद्ध तीव्र झाले आहे. एकीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बेगडी हिंदुत्व परिधान केलेल्या शिवसेनेला औरंगाबादमधून हद्दपार करा, असे आवाहन केल्यानंतर शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखामधून चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका करणाऱ्या शिवसेनेला आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांना भाजपा नेते आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे.

शंभर कोटींवर १५ कोटी भारी पडतील, असे विधान करण्यात आले तेव्हा तुम्ही घरी बसला होता. स्वातंत्र्यवीर सावरकांना बलात्कारी म्हणणाऱ्यांशी तुम्ही दोस्ती केली आहे. मात्र आम्ही संभाजीनगर म्हटले तर तुम्ही अग्रलेखाची किती शाई वाया घालवलीत, पत्रपंडितहो तुम्ही तर मियाँ दरबारी आहात, अशा आशयाचे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. तसेच बेगडी हिंदुत्व पांघरलेल्या शिवसेनेला औरंगाबादेतून हद्दपार करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली होती. 

दरम्यान, भाजपा आणि चंद्रकांत पाटील यांना सामनाच्या आजच्या अग्रलेखातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात भाजपचे घोडे हे अजूनही मोगलांप्रमाणे सरळ पाणी प्यायला तयार नाहीत. विरोधी पक्ष म्हणजे फक्त लाथा झाडायला आणि हवे तसे बेताल बोलायलाच उरला आहे काय? असा प्रश्न लोकांना पडत आहे. आम्हाला महाराष्ट्रात शांतता हवी आहे. दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचे कितीही उकरून काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही हे दादामियांनी पक्के लक्षात ठेवावे. असे अनेक दादामियां गोधडय़ा भिजवत होते तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करून लढत होती असा टोला भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारSanjay Rautसंजय राऊत