शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

संघनिष्ठ अधिकारी शोधण्यापेक्षा पोलीस खात्यामधील 'वाझे' शोधा; भाजपचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 17:32 IST

dilip walse patil: राजकीय निष्ठा बाळगून काम करणाऱ्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांची माहिती घेणार असल्याचे दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) यांनी म्हटले होते.

ठळक मुद्देभाजपची दिलीप वळसे-पाटील यांच्यावर टीकापोलीस खात्यातील वाझे शोधण्याचा सल्लाकन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं - उपाध्ये

मुंबई :सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंगांच्या लेटरबॉम्बनंतर (Param Bir Singh Letter) गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांची निवड करण्यात आली. राजकीय निष्ठा बाळगून काम करणाऱ्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांची माहिती घेणार असल्याचे दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) यांनी म्हटले होते. यावरून पोलीस खात्यात आणखी किती 'वाझे' आहेत याचा शोध घ्या, असा टोला भाजपने लगावला आहे. (keshav upadhye taunts dilip walse patil)

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीका केली. दिलीप वळसे-पाटील यांनी गृहखात्याच्या कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांना राजकीय निष्ठा बाळगून असलेल्या अधिकाऱ्यांबद्दल विचारण्यात आले. पोलीस दलातील काही अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित असल्याची चर्चा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर, 'कुणाची निष्ठा काय आहे हे लवकरच तपासून पाहिलं जाईल,' असे त्यांनी स्पष्ट केले. यावर, संघनिष्ठ अधिकारी शोधण्यापेक्षा पोलीस खात्यात आणखी किती वाझे आहेत याचा शोध घ्यावा, असा सल्ला केशव उपाध्ये यांनी दिला आहे. 

“केंद्रातील मोदी सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे”

ते राज्यासाठी अधिक फायद्याचे असेल 

नवनियुक्त गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस खात्यात संघनिष्ठ अधिकारी कोण आहेत, याची तपासणी करू असं वक्तव्य केलं. आम्ही गृहमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितो की, संघनिष्ठ अधिकारी शोधण्यापेक्षा पोलीस खात्यात आणखी किती वाझे आहेत याचा शोध घ्यावा. ते राज्यासाठी अधिक फायद्याचे असेल, असे केशव उपाध्ये म्हणाले. 

कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं

कोरोना प्रादुर्भावाचा अटकाव करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या नावाखाली राज्य सरकारने लॉकडाऊन लावत जनतेची घोर फसवणूक केली आहे. रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्पर विरोधी विधाने पाहता राज्य सरकारची  परिस्थिती “कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं”, अशी झाली आहे, असा टोला केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला लगावला.

तृप्ती सावंत यांनी शिवसेना आणि बाळासाहेबांचा अवमान केला; माजी महापौरांची टीका

दरम्यान, राज्यावरील हे संकट टळण्यासाठी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सरकारला साथ देण्यास भाजप तयार आहे. मात्र, सरकारने सामान्य, गोरगरीब, कष्टकरी वर्गाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने या वर्गाला आर्थिक मदत द्यावी, असे भाजपने सुचवले होते. रविवारी आपला निर्णय जाहीर करून मुख्यमंत्री ‘मातोश्री’त बसले आहेत. या संकट काळात जनतेचे काय हा साधा प्रश्नही त्यांना पडत नसावा काय? सरकार एवढे निर्दयी कसे असू शकते?, असा घणाघात भाजपने सरकारवर केला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलsachin Vazeसचिन वाझेParam Bir Singhपरम बीर सिंग