शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

भाजपच्या सर्व्हेत "वंचित" वंचितच !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 11:43 AM

लोकसभेला आंबेडकरांनी आघाडीसोबत जाणे टाळल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सहा ते सात जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. तर वंचितला एक जागा मिळाली. आता वंचित बहुजन आघाडी विधानसभेला पुन्हा एकदा जोर लावण्यासाठी सज्ज झाली आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत. त्यानुसार विविध पक्षांच्या युत्या आणि आघाड्यांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जागा वाटपावरून आघाडीत चर्चा सुरू आहे. मात्र युतीत अद्याप जागा वाटपावर फॉर्म्युला ठरला नाही. त्यामुळे युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. राज्यातील अनेक विधानसभा मतदार संघात भाजप शिवसेनेच्या पुढे दिसत आहे. त्यातच आता भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची चिंता वाढली आहे. यामध्ये भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे देखील टेन्शन वाढले आहे. तर नव्याने उदयास आलेला वंचित बहुजन आघाडी पक्षही चिंतेत आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि असुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुनज आघाडीने मोठ्या प्रमाणात मते घेतली. दलित आणि मुस्लिमांना एकत्र करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा आंबेडकारांचा प्रयोग चांगलाच गाजला. परंतु, खुद्द प्रकाश आंबेडकरांना लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदार संघातून पराभव पत्करावा लागला. लोकसभेला आंबेडकरांनी आघाडीसोबत जाणे टाळल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सहा ते सात जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. तर वंचितला एक जागा मिळाली. आता वंचित विधानसभेला पुन्हा एकदा जोर लावण्यासाठी सज्ज झाला आहे.

दरम्यान नुकताच भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत सर्व्हे आला आहे. यामध्ये भाजपला स्वबळावर बहुमत म्हणजेच १६०, शिवसेनेला ९० आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ३८ जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर भाजप-शिवसेना युतीला २३० जागा जिंकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर आघाडीला ५८ जागा दाखविण्यात आल्या आहेत. परंतु, या सर्व्हेमध्ये वंचित बहुनज आघाडी आणि मनसेला एकही जागा दाखविण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व्हेत वंचित आणि मनसेचा उल्लेखच नाही की, या दोन्ही पक्षांना भोपळाही फोडता येणार नाही, याविषयी स्पष्ट उल्लेख नाही.