शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 10:37 IST

"मी कोणी नाही. मी शुन्य आहे, उद्धव ठाकरे याला अर्थ नाही" ही तुमच्या मुलाखतीमधील काही कबुलीची वक्तव्ये आवडली असा चिमटा भाजपाने काढला आहे.

मुंबई- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित करण्यात आला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह सत्ताधारी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला. याच मुलाखतीत ठाकरेंनी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करत निवडणुकीच्या मतदानावर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यावरून भाजपाने पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंची ही मुलाखत विरोधाभासाने भरली असून त्यात काही कबुलीची वक्तव्ये आवडली असं सांगत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खोचक टोला लगावला आहे.

केशव उपाध्ये म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आज जी मुलाखत दिली त्यात टीका-टिप्पणी केली ती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा प्रकार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात यश मिळाले त्यावेळी निवडणूक आयोगाबद्दल आणि ईव्हीएमबद्दल तुमची तक्रार नव्हती. विधानसभेला अपयश आल्यावर मात्र बॅलट पेपरवर मतदानाची मागणी करू लागलात. निवडणूक आयोग कदाचित आमचं निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो पण शिवसेना हे नाव दुसऱ्याला देऊ शकत नाही, असे आपण म्हटले आहे. संपूर्ण मुलाखत अशा विरोधाभासाने भरलेली आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच "मी कोणी नाही. मी शुन्य आहे, उद्धव ठाकरे याला अर्थ नाही" ही तुमच्या मुलाखतीमधील काही कबुलीची वक्तव्ये आवडली. लोकसभेच्या वेळी आपल्याला जिंकायचं आहे हे आपलेपण होतं, विधानसभेला मला जिंकायचंय हा आपल्यात जो मीपणा आला तेव्हा पराभव झाला. उद्धव ठाकरेंनी असेच बोलत राहावे. आपोआप पितळ उघड पडेल असा खोचक टोलाही भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिवसेनेचे अस्तित्व शाह कधी संपवू शकत नाहीत. इतकी वर्ष होऊनही ते जनतेला माझ्यापासून तोडू शकत नाहीत. निवडणूक आयोग कदाचित आमचे निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो किंवा गोठवू शकतो परंतु शिवसेना हे नाव दुसऱ्याला देऊ शकत नाही. त्यांना तो अधिकारच नाही. उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का? या धोंड्याला पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. त्याशिवाय लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीत खेचाखेची झाली, आम्ही त्या वेळी चार-चार, पाच-पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचं म्हणून सोडून दिले. विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. त्यावेळी तू तू मै मै झाले. त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा