शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

“उद्धव ठाकरे अन् शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी”; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 16:15 IST

BJP Chandrashekhar Bawankule News: मविआत मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार आहेत. खोटारडेपणावर यांना मते मिळाली, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

BJP Chandrashekhar Bawankule News: आताच्या घडीला ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या पूर्ण होण्यासाठी राज्य सरकारला १३ तारखेपर्यंतची मुदत दिली असून, दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. यातच उद्धव ठाकरे आणि शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंच्या भाषणाला लोक कंटाळले. ते जे काही बोलत आहेत, ते फक्त मनोरंजन आहे. उद्धव ठाकरे कुठे, पंतप्रधान मोदी कुठे आणि देवेंद्र फडणवीस कुठे? ते अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांनी काय काम केले, ते सांगावे. टोमणे मारुन महाराष्ट्र पुढे जाणार नाही. सकाळचा भोंगा राजकीय असतो. भोंगे न वाजवता शेतकऱ्यांच्या विकासासाठी काय करता ते जरा सांगावे. राजकीय भाषणे करायची, खोटे नरेटिव्ह तयार करायचे. आता कुठला मुद्दा घेणार? उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे काय केले ते सांगावे? आत्ताची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर होईल तेव्हा उद्धव ठाकरे काय सांगू शकणार, असा सवाल बावनकुळे यांनी केला.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी

उद्धव ठाकरे आणि शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत. आता तेच मराठा आरक्षणाबाबत बोलत आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि लोकांना दूर नेण्याचे काम चालले आहे. सरकारला क्रेडिट द्यायचे नाही पण विकासाची कामे डायव्हर्ट करत आहेत. मविआत मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार आहेत. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना वाटते की, ते मुख्यमंत्री होतील. तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघांनीही वाटते की, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. 

दरम्यान, खटाखट खटाखट साडेआठ हजार रुपये देऊ हे खोटे बोलले. संविधान बदलणार हे खोटे बोलले. आदिवासी समाजाला सांगितले की, तुमचे हक्क काढणार असे सगळे खोटे बोलून हे निवडून आले. खोटारडेपणावर यांना मते मिळाली. जिथे खासदार निवडून आलेत तिथे साडेआठ हजार रुपये देणार होते. आता ३१ जागी त्यांनी साडेआठ हजारांचे वाटप सुरु करावे, या शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMaratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार