शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
3
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
4
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
5
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
6
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
7
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
8
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
9
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
10
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
11
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
12
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
13
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
14
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
15
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
16
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
17
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
18
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
19
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
20
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
Daily Top 2Weekly Top 5

“उद्धव ठाकरे अन् शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी”; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 16:15 IST

BJP Chandrashekhar Bawankule News: मविआत मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार आहेत. खोटारडेपणावर यांना मते मिळाली, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

BJP Chandrashekhar Bawankule News: आताच्या घडीला ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या पूर्ण होण्यासाठी राज्य सरकारला १३ तारखेपर्यंतची मुदत दिली असून, दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. यातच उद्धव ठाकरे आणि शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंच्या भाषणाला लोक कंटाळले. ते जे काही बोलत आहेत, ते फक्त मनोरंजन आहे. उद्धव ठाकरे कुठे, पंतप्रधान मोदी कुठे आणि देवेंद्र फडणवीस कुठे? ते अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांनी काय काम केले, ते सांगावे. टोमणे मारुन महाराष्ट्र पुढे जाणार नाही. सकाळचा भोंगा राजकीय असतो. भोंगे न वाजवता शेतकऱ्यांच्या विकासासाठी काय करता ते जरा सांगावे. राजकीय भाषणे करायची, खोटे नरेटिव्ह तयार करायचे. आता कुठला मुद्दा घेणार? उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे काय केले ते सांगावे? आत्ताची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर होईल तेव्हा उद्धव ठाकरे काय सांगू शकणार, असा सवाल बावनकुळे यांनी केला.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी

उद्धव ठाकरे आणि शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत. आता तेच मराठा आरक्षणाबाबत बोलत आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि लोकांना दूर नेण्याचे काम चालले आहे. सरकारला क्रेडिट द्यायचे नाही पण विकासाची कामे डायव्हर्ट करत आहेत. मविआत मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार आहेत. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना वाटते की, ते मुख्यमंत्री होतील. तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघांनीही वाटते की, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. 

दरम्यान, खटाखट खटाखट साडेआठ हजार रुपये देऊ हे खोटे बोलले. संविधान बदलणार हे खोटे बोलले. आदिवासी समाजाला सांगितले की, तुमचे हक्क काढणार असे सगळे खोटे बोलून हे निवडून आले. खोटारडेपणावर यांना मते मिळाली. जिथे खासदार निवडून आलेत तिथे साडेआठ हजार रुपये देणार होते. आता ३१ जागी त्यांनी साडेआठ हजारांचे वाटप सुरु करावे, या शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMaratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार