शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 17:27 IST

BJP Minister Chandrakant Patil News: ठाकरे बंधू किती दिवस एकत्र राहतात. निवडणुकांपर्यंत तरी एकत्र राहतात की त्या आधीच वेगळे होतात, हे काळच ठरवेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

BJP Minister Chandrakant Patil News: राज्यातील महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या मूडमध्ये नाही. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचना पूर्ण होईल, मग रिझर्व्हेशन पडतील, मग नोटिफिकेशन निघेल. त्यामुळे साधारण ऑक्टोबर महिन्यात एक ग्रुप जिल्हा परिषदा किंवा नगरपालिका, नोव्हेंबर महिन्यात एक ग्रुप जिल्हा परिषदा, एकावेळेस निवडणुका घेता येणार नाहीत. असे करता करता महानगरपालिकेच्या निवडणुका शेवटी डिसेंबर महिन्यात होतील, असे सूतोवाच भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, लोकशाहीत कोणी कोणावर बोलू शकते. उद्धव ठाकरे २०१९ ला मुख्यमंत्री झाल्यापासून अशा प्रकारची विधाने करत आहेत, जी सामान्य माणसाला आवडत नाहीत. पण उद्धव ठाकरेंना कोण आवरणार? त्याने काही फरक पडत नाही. दोन ठाकरे एकत्र आल्याचा हिंदू माणसाला आनंदच झालेला आहे. परंतु, ठाकरे बंधू किती दिवस एकत्र राहतात. निवडणुकांपर्यंत तरी एकत्र राहतात की त्या आधीच वेगळे होतात, हे काळच ठरवेल, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

आतापर्यंत हे दोन्ही भाऊ एकत्र का आले नाहीत?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होतेच की, आता उद्धव ठाकरे हे पुढचा मुद्दा मुंबई तोडणार असल्याचाच मांडणार. कसली मुंबई तोडणार? कुणाची हिंमत आहे मुंबई तोडण्याची? आम्ही मेलोत का? मुंबई काही कुणी तोडत नाही. पण, दरवेळेस मराठी माणसांच्या भावनांशी खेळायचे, हिंदी-मराठी विषय असाच केला आहे. मराठी माणूस हुशार झालेला आहे. आतापर्यंत हे दोन्ही भाऊ एकत्र का आले नाहीत, मुंबई महानगरपालिका जाणार असे आता त्यांना दिसू लागले आहे. गेल्या २० वर्षांत कधी राज ठाकरेंना विचारले नाही. आम्हाला कुणीही नको, अशाच मानसिकतेत तुम्ही होतात. दिल्ली गेले, राज्य गेले आणि आता महापालिकाही गेली, तर ठाकरे सगळेच गमावून बसतील, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. 

दरम्यान, हिंदुत्ववादी माणूस भावनिक आहे. मात्र राजकीय फायद्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले की कुटुंब म्हणून एकत्र आले, हे पाहावे लागेल. मुंबई महापालिकेतील ठाकरेंचे ७५ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. आता राजकीय सोय म्हणून उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना जवळ करत आहे. मुंबई महापालिका ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे आठवले नाहीत, राज ठाकरे यांच्या चिरंजिवाने विधानसभा निवडणूक लढवली, तेव्हा तुम्ही माघार घेतली नाहीत, या शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसे