शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

मराठी माणसाने निर्माण केलेले दोन पक्ष भाजपानं फोडले; जयंत पाटील कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 17:46 IST

महाराष्ट्र सरकारच्या सर्व यंत्रणा या सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम होत नाही ही सामान्य लोकांची तक्रार आहे असं जयंत पाटील यांनी सांगितले. 

अहमदनगर - Jayant Patil on BJP ( Marathi News ) महाराष्ट्रात मराठी माणसाने निर्माण केलेले दोन पक्ष फोडण्याचे काम गेल्या काही महिन्यात झाले. दोन्ही पक्षातल्या आमदारांना बाजूला काढून त्यांची मालकी देखील हिसकावण्यात आली. सर्व सरकारी यंत्रणा त्याला मदत करतात. ही भारतीय लोकशाहीच्या अस्तित्वाची धोक्याची घंटा आहे असं म्हटले तर वावगे ठरणार नाही, म्हणून आपण सर्वांनी जागरुक असले पाहिजे असं सांगत माजी मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर टीका केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाकडून अहमदनगरच्या कर्जत जामखेड येथे विजय निश्चय मेळावा घेण्यात आला. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबतीत निवडणूक आयोगाने अनपेक्षित निर्णय घेतला. जर या देशात न्याय शिल्लक राहिलेला असेल, तर पक्ष आणि चिन्ह परत आपल्याला मिळतील असा आम्हा सर्वांना आशावाद आहे. एखाद्या व्यक्तीचे काम हीच पोहोच पावती असते. त्यामुळे पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह घेऊन आपण लढू. नाणं जर खणखणीत असेल तर चिंता करण्याची गरज नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

त्याचसोबत मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही स्पष्टता नाही. सरसकट आरक्षणाची चर्चा आता जवळपास थांबलेली आहे. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सरकार काय करत आहे? त्याबद्दल सरकारमधले कुणीही काहीच बोलत नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत काहीच चर्चा नाही. या सरकारच्या काळात महाराष्ट्रात सामाजिक अस्थैर्य निर्माण झालेले आहे, त्यासाठी आपली लढाई आहे. महाराष्ट्र अधोगतीकडे चाललेला आहे त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. महाराष्ट्र सरकारच्या सर्व यंत्रणा या सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम होत नाही ही सामान्य लोकांची तक्रार आहे असं जयंत पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, आज महाराष्ट्रामध्ये राजकारणाचे गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांना राजकारणात आणण्याचे काम झालेले आहे. महाराष्ट्राचे बिहार झालेले आहे. एका ज्येष्ठ मंत्र्याच्या पेकाटात लाथ मारण्याची भाषा वापरली जाते. मुख्यमंत्र्यांनी व दोन उपमुख्यमंत्र्यांनी यावर काही आक्षेप घेतला का?. कदाचित तुम्हाला वाटत असेल की, आपण राजकीय संकटात आहोत. पण राजकारणात असे दिवस येत असतात. तुम्ही ठामपणे शरद पवार यांच्या मागे सक्षमपणे उभे राहाल. विधानसभा व लोकसभेची जबाबदारी तुम्ही सक्षमपणे खांद्यावर पेलाल असंही जयंत पाटील यांनी आवाहन केले. त्याचसोबत कर्जत जामखेडच्या विकासाला रोहित पवारांचे योगदान मोलाचे आहे. एक युवा नेता इथल्या लोकांमध्ये समरस होतो आणि नवनवीन कल्पना मांडत लोकांचे हित जोपासतो. एक मुलगा म्हणून सर्व कुटुंब आशेने रोहित पवार यांच्याकडे पाहतात. हे त्यांचं यश आहे असंही त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार