शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मराठी माणसाने निर्माण केलेले दोन पक्ष भाजपानं फोडले; जयंत पाटील कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 17:46 IST

महाराष्ट्र सरकारच्या सर्व यंत्रणा या सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम होत नाही ही सामान्य लोकांची तक्रार आहे असं जयंत पाटील यांनी सांगितले. 

अहमदनगर - Jayant Patil on BJP ( Marathi News ) महाराष्ट्रात मराठी माणसाने निर्माण केलेले दोन पक्ष फोडण्याचे काम गेल्या काही महिन्यात झाले. दोन्ही पक्षातल्या आमदारांना बाजूला काढून त्यांची मालकी देखील हिसकावण्यात आली. सर्व सरकारी यंत्रणा त्याला मदत करतात. ही भारतीय लोकशाहीच्या अस्तित्वाची धोक्याची घंटा आहे असं म्हटले तर वावगे ठरणार नाही, म्हणून आपण सर्वांनी जागरुक असले पाहिजे असं सांगत माजी मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर टीका केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाकडून अहमदनगरच्या कर्जत जामखेड येथे विजय निश्चय मेळावा घेण्यात आला. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबतीत निवडणूक आयोगाने अनपेक्षित निर्णय घेतला. जर या देशात न्याय शिल्लक राहिलेला असेल, तर पक्ष आणि चिन्ह परत आपल्याला मिळतील असा आम्हा सर्वांना आशावाद आहे. एखाद्या व्यक्तीचे काम हीच पोहोच पावती असते. त्यामुळे पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह घेऊन आपण लढू. नाणं जर खणखणीत असेल तर चिंता करण्याची गरज नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

त्याचसोबत मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही स्पष्टता नाही. सरसकट आरक्षणाची चर्चा आता जवळपास थांबलेली आहे. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सरकार काय करत आहे? त्याबद्दल सरकारमधले कुणीही काहीच बोलत नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत काहीच चर्चा नाही. या सरकारच्या काळात महाराष्ट्रात सामाजिक अस्थैर्य निर्माण झालेले आहे, त्यासाठी आपली लढाई आहे. महाराष्ट्र अधोगतीकडे चाललेला आहे त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. महाराष्ट्र सरकारच्या सर्व यंत्रणा या सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम होत नाही ही सामान्य लोकांची तक्रार आहे असं जयंत पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, आज महाराष्ट्रामध्ये राजकारणाचे गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांना राजकारणात आणण्याचे काम झालेले आहे. महाराष्ट्राचे बिहार झालेले आहे. एका ज्येष्ठ मंत्र्याच्या पेकाटात लाथ मारण्याची भाषा वापरली जाते. मुख्यमंत्र्यांनी व दोन उपमुख्यमंत्र्यांनी यावर काही आक्षेप घेतला का?. कदाचित तुम्हाला वाटत असेल की, आपण राजकीय संकटात आहोत. पण राजकारणात असे दिवस येत असतात. तुम्ही ठामपणे शरद पवार यांच्या मागे सक्षमपणे उभे राहाल. विधानसभा व लोकसभेची जबाबदारी तुम्ही सक्षमपणे खांद्यावर पेलाल असंही जयंत पाटील यांनी आवाहन केले. त्याचसोबत कर्जत जामखेडच्या विकासाला रोहित पवारांचे योगदान मोलाचे आहे. एक युवा नेता इथल्या लोकांमध्ये समरस होतो आणि नवनवीन कल्पना मांडत लोकांचे हित जोपासतो. एक मुलगा म्हणून सर्व कुटुंब आशेने रोहित पवार यांच्याकडे पाहतात. हे त्यांचं यश आहे असंही त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार