शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

“...तर किमान ५ हजारांनी पराभव करु”; २०८ मतांनी विजयी झालेल्या नाना पटोलेंना भाजपाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 15:28 IST

Maharashtra Vidhan Sabha Assembly Election 2024 Result: स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले असताना फक्त २०८ मतांनी विजय मिळाला आणि तोच त्यांच्या जिव्हारी लागला, अशी टीका भाजपाने केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Assembly Election 2024 Result: या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभावला सामोरे जावे लागले. यानंतर महाविकास आघाडीने पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले आणि ईव्हीएमविरोधात तीव्र निषेध नोंदवला. इतकेच नाही तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच अवघ्या २०८ मतांनी विजयी झालेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाने आव्हान दिले आहे. 

मारकडवाडी येथील ईव्हीएम विरोधातील आंदोलनाला महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली. खुद्द शरद पवार यांनी या ठिकाणी जाऊन महायुतीवर टीका केली. शरद पवार यांच्या सभेनंतर भाजपाकडून महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्ह विरुद्ध जनजागृती केली जात आहे. भाजपा नेतेही या गावात जात आहेत. या छोट्याशा गावात सध्या शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. यातच नाना पटोले यांना विरोधात निवडणूक लढवणाऱ्या भाजपा उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी आव्हान दिले आहे.

...तर किमान ५ हजार मतांनी पराभव करु

नाना पटोले यांनी साकोली मतदारसंघातून राजीनामा देऊन मत पत्रिकेवरील निवडणुकीत पुन्हा उतरावे. ईव्हीएमनंतर त्यांचा मतपत्रिकेवरही किमान ५ हजार मतांनी पराभव करून दाखवू. नाना पटोले यांना असे वाटत आहे की, ईव्हीएममुळे त्यांचा निसटता विजय होऊ शकला आहे. अन्यथा ते मोठ्या मताधिक्याने जिंकले असते. तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मतदान पत्रिकेवरील निवडणूक लढवून दाखवावी. मुळात नाना पटोले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असताना आणि त्यांनी स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले असताना ही त्यांचा फक्त २०८ मतांनी निसटता विजय झाला आणि तोच त्यांच्या जिव्हारी लागल्यामुळे ते ईव्हीएम विरोधात नाहक ओरड करत असल्याची टीका अविनाश ब्राह्मणकर यांनी केली. 

दरम्यान, ईव्हीएम विरोधात खोटे आरोप करणाऱ्या नाना पटोले यांनी लक्षात ठेवावे की, ईव्हीएमच्या  मतांमध्ये मागे राहून ते टपाली मतांच्या जोरावर जिंकले आहे. एका प्रकारे जनतेच्या मतदानात त्यांचा पराभव झाला आहे. तोच पराभव लपवण्यासाठी आणि प्रतिमा जपण्यासाठी नाना पटोले ईव्हीएमला दोष देऊन आपल्या पराभवावर पांघरून टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, या शब्दांत अविनाश ब्राह्मणकर यांनी हल्लाबोल केला. ते एबीपीशी बोलत होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोलेNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाsakoli-acसाकोली