शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

"शिवसेना भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात कोसळली असून या पक्षात आता थर उरलेच नाहीत"; भाजपाचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 20:34 IST

BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena : बीड गर्भपात प्रकरणी एका महीलेचा मृत्यू झाला आहे. गोठ्यात गर्भपात करणाऱ्या संबंधित डॉक्टरांना खुनाचे कलम लावून अटक करावी, अशी मागणी देखील अतुल भातखळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली आहे.

मुंबई - शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis)  यांचे नवे सरकार आले. यानंतर भाजपने आता मुंबई महानगरपालिका निवडणुकांवर लक्ष्य केंद्रीत केले असून, भाजप मुंबई अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी वरळीत भव्य दहीहंडी उत्सवाचे (Dahi Handi 2022) आयोजन केले आहे. या खेळीने आशिष शेलार यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे सांगितले जात आहे. याच दरम्यान आता भाजपाने पुन्हा एकदा शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. "शिवसेना भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात कोसळली असून या पक्षात आता थर उरलेच नाहीत" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी "आमचे थर कोसळणार नाही हा शिवसेनेचा दावा योग्यच, कारण शिवसेना भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात कोसळली असून या पक्षात आता थर उरलेच नाहीत. त्यांचा भ्रष्टाचार, त्यांचा उर्मटपणा, त्यांची मस्ती या सगळ्यांना मुंबईकर जनता यावेळच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतून उत्तर देणार आहे" असं म्हटलं आहे. तसेच "मुंबईत खड्ड्यांमुळे झालेल्या दुर्दैवी मृत्युला शिवसेनेचा महापालिकेतील भ्रष्टाचार कारणीभूत. काळया यादीतील निलंबित भ्रष्ट अभियंत्यांना पुन्हा कामावर घेऊन प्रमोशन दिले" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

बीड गर्भपात प्रकरणी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गोठ्यात गर्भपात करणाऱ्या संबंधित डॉक्टरांना खुनाचे कलम लावून अटक करावी, अशी मागणी देखील अतुल भातखळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी देखील आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे..." असं म्हणत निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे..." आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय. भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत... लवकरच... मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत "करुन दाखवतील" आमचं ठरलंय!!" असं म्हटलं आहे. 

"ज्या वरळीत सेनेच्या (?) खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी महापौर आणि नगरसेवक असे नेत्यांचे थरावर थर आहेत, तिथे म्हणे  पक्षाला द्यायच्या 100 रूपयांच्या शपथपत्राला "बळ"  अपुरे पडतेय... दुसरीकडे भाजपाची जांबोरी मैदानातील दहिहंडी मुंबईकरांच्या प्रचंड प्रतिसादाने लक्षवेधी ठरतेय..." असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकांच्या मोर्चेबांधणीची सुरुवात युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळीतून केल्याचे सांगितले जात आहे. भाजपचा भव्य दहीहंडी उत्सव जांबोरी मैदानात हा उत्सव पार पडणार आहे.  

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाShiv Senaशिवसेना