शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

३५ हजार कोटींच्या अधिकारांवर तुळशीपत्र

By admin | Published: September 22, 2014 9:19 AM

शिवसेना-भाजपा युती तुटली तर मुंबई, ठाणेसह प्रमुख महापालिका व नगरपालिकांमधील किमान ३५ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक अधिकारांवर या दोन्ही पक्षांना तुळशीपत्र ठेवायला लागेल.

शिवसेना-भाजपा युतीतील तणाव : चार महापालिकांमधील सत्तेची समीकरणे बिघडणार संदीप प्रधान, मुंबईशिवसेना-भाजपा युती तुटली तर मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, अंबरनाथ, बदलापूर अशा प्रमुख महापालिका व नगरपालिकांमधील किमान ३५ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक अधिकारांवर या दोन्ही पक्षांना तुळशीपत्र ठेवायला लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती फुटल्याने राज्याची सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंग होतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील असलेली सत्ता गमावण्याचा तुघलकी निर्णय दोन्ही पक्ष घेतील अशी शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.मुंबई महापालिकेत दीर्घकाळ शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. सध्या तेथे शिवसेनेचे ७५ तर भाजपाचे ३१ नगरसेवक आहेत. युती तुटल्यास शिवसेनेला सत्ता टिकवण्याकरिता मनसेच्या २८ नगरसेवकांची मदत घ्यावी लागेल. अथवा विरोधक या दोन्ही पक्षांना बाजूला सारून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतील. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३० हजार कोटी रुपयांचा आहे. ही महापालिका म्हणजे शिवसेनेकरिता जीव की प्राण आहे. त्यामुळे युती तुटली आणि मुंबई महापालिकेतील सत्ता शिवसेनेने गमावली तर तो शिवसेनेच्या जिव्हारी हल्ला असेल.ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ५३ सदस्य असून काँग्रेसमधील सहा नगरसेवक काही दिवसांपूर्वी रवी फाटक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत दाखल झाले. त्यापैकी चार शिवसेनेसोबत आहेत. भाजपाचे केवळ आठ तर मनसेचे सात नगरसेवक येथे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड युती तुटल्यावर २२०० कोटींचा अर्थसंकल्प असलेली ही महापालिका ताब्यात घेण्याची संधी सोडणार नाहीत. येथेही मनसेचा पाठिंबा मिळाला तर शिवसेनेची सत्ता कदाचित टिकून राहील. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे ३२, भाजपाचे नऊ तर मनसेचे २८ नगरसेवक आहेत. येथेही युती तुटली तर १६०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेली ही महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्याकरिता शिवसेनेला खटपट करावी लागेल. पुढील वर्षी येथे निवडणूक असल्याने राज्यात फुटीमुळे युतीची सत्ता येणार नसेल तर काही नगरसेवक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूला वळू शकतात.औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेचे ३०, भाजपाचे १५ तर मनसेचा एक नगरसेवक आहे. काही अपक्ष व भारिप-बहुजन महासंघ यांचा पाठिंबा युतीला आहे. युती फुटली तर येथील राजकीय समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे. या महापालिकेचा अर्थसंकल्प ७९० कोटींचा आहे. नगरपालिकांमध्येही एकत्रअंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांमध्येही युतीची सत्ता असून या दोन्ही नगरपालिकांचा अर्थसंकल्प प्रत्येकी २०० कोटींचा आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेचे १७, भाजपाचा एक तर मनसेचे सात सदस्य आहेत. बदलापूरमध्ये शिवसेनेचे १३, भाजपाचे सात तर मनसेचे तीन सदस्य आहेत. महापालिकांचे वार्षिक अर्थसंकल्पमुंबई - ३०,००० कोटी  ठाणे- २२०० कोटीकल्याण-डोंबिवली -  १६०० कोटीऔरंगाबाद - ७९० कोटी

अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका - २०० कोटी