शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

बळीराजाची दिवाळी अंधारातच!, व्यापा-यांनी भाव पाडले, परतीच्या पावसाने कृषीमालाची प्रतवारी खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 5:04 AM

परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान झाल्याने बळीराजा दिवाळीत दुहेरी संकटात सापडला आहे. कृषीमालाची प्रतवारी खराब झाल्याचे सांगत ऐन दिवाळीत व्यापा-यांनी शेतक-यांची अडवणूक करत भाव पाडले आहेत.

- योगेश बिडवईमुंबई : परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान झाल्याने बळीराजा दिवाळीत दुहेरी संकटात सापडला आहे. कृषीमालाची प्रतवारी खराब झाल्याचे सांगत ऐन दिवाळीत व्यापा-यांनी शेतक-यांची अडवणूक करत भाव पाडले आहेत. तर भारनियमनामुळे पाणी असून कृषिपंप बंद असल्याने दिवाळी अंधारातच साजरी होत आहे.विदर्भात पावसामुळे शेतमाल खराब झाल्याचे सांगत व्यापा-यांनी भाव पाडले आहेत. गेल्या वर्षी कापसाला क्विंटलला ५२०० रुपये भाव होता. यंदा तो चार हजारांवर आला आहे. कृषीमालाची हमीभावाने खरेदी न केल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश असले तरी व्यापाºयांनी त्यास दाद दिलेली नाही, अशी माहिती शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी ‘लोकमत’ला दिली. पावसामुळे कपाशी पडणे, बोंडे काळी होण्यासारखे संकट ओढवले आहे. चिखलामुळे कापूस वेचणीही अचडणीत आली आहे. सोयाबीन ओले झाल्याने त्यालाही भाव नाही.मराठवाड्यात कडधान्यालाही फटका बसला आहे. उदीड, मुगाला क्विंटलला ३२०० ते ३४०० रुपये भाव आहे. तर सोयाबीन २७०० रुपयांपर्यंत विकले जात आहे.सरकारी खरेदी केंद्रावर माल खरेदी करताना अटीच खूप असल्याचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शेतकरी अविनाश गुंजकर यांनी सांगितले. हिंगोलीत दोन केंद्रे जाहीर झाले असताना अजून एकही सुरू झाले नसल्याचेही ते म्हणाले.पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातही धान्य बाजारात विशेष तेजी नाही. क्विंटलमागे मका ८०० ते १३०० तर सोयाबीन २४०० ते २८०० रुपये दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतक-याला खर्च निघणेही अवघड झाले आहे. नाशिक, पुण्यात दिवाळीतही भाजीपाला विक्रीतून चार चांगले पैसे मिळविण्याचे शेतक-यांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही.गेल्या वर्षी कापसाला ५२०० ते ५५०० रु. भाव होता. या वर्षी४ हजार रुपये भाव आहे. भावाअभावी शेतक-याचे दिवाळे निघाले आहे.- विजय जावंधिया,ज्येष्ठ नेते, शेतकरी संघटनानाफेडमार्फत तेलबिया व कडधान्याची आॅनलाइन खरेदी करण्याचे आदेश सरकारने दिलेत. त्याचे राज्यातील संबंधित केंद्रांवरील कर्मचाºयांना प्रशिक्षणही दिले आहे. लवकरच खरेदी सुरू होईल. शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड१०१ केंद्रांवर हमीभावाने खरेदीराज्यात पणन मंत्रालयाकडून १०१ केंद्रांवर हमीभावाने उडीद, मूग, सोयाबीनची खरेदी सुरू असल्याचे सरकारी पातळीवर सांगितले जात आहे. मात्र अनेक केंद्रे अजून सुरू झालेली नाहीत, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. ही खरेदी केंद्रे प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यात आहेत. मक्याबाबत मात्र अजून निर्णय झालेला नाही.आॅनलाइन खरेदीचा गोंधळआॅनलाइन खरेदीला अजून सुरुवात झालेली नाही. त्यासाठी शेतकºयाला सात-बारा उताºयासह इतर पुरावे द्यावे लागणार आहेत. सात-बारा उताºयावर नोंद नसल्यास त्याची सरकारी खरेदी होणार नाही.शेतमाल हमीभाव प्रत्यक्ष दर(क्विंटल/रु.) (क्विंटल/रु.)भरडधान्ये ५,०५० ३२००-३४००सोयाबीन ३,०५० २६००-२७००कापूस ४,१२०-४३२० ४,०००मका १,४२५ —-

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार