शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

TET Exam: राज्यात मोठी शिक्षक भरती! टीईटी परीक्षेचा कालावधी ठरला; ठाकरे सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 17:42 IST

Teacher recruitment in Maharashtra: राज्यात एकूण 40 हजारावर शिक्षकांच्या जागा रिक्त असून टप्प्या टप्प्याने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Teacher Job: गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा एकदा पास झाली की आजीवन वैधता राहणार असल्याने शिक्षक होणाऱ्या उमेदवारांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात एकूण 40 हजारावर शिक्षकांच्या जागा रिक्त असून टप्प्या टप्प्याने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत. (Maha TET Exam schedule declaired By Education Department.)

राज्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये 27 हजार, माध्यमिकमध्ये 13000 अशा 40 हजार जागा रिक्त आहेत. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून टीईटी परीक्षा घेण्यात आली नव्हती. 2018-19 मध्ये अखेरची परीक्षा झाली होती. यामुळे यंदा उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षी 7 लाख उमेदवार परीक्षेला बसतात. ते यंदा तीन लाखांनी वाढण्याची शक्यता आहे. 

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 8 जुलै रोजी राज्यातील 6100 पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याची घोषणा केली होती. ही भरती प्रक्रिया कोरोना संकटामुळे पदभरती बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केला होता. यानुसार टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीMaharashtraमहाराष्ट्र