शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांचं थेट खरगेंना पत्र; ठाकरे-पवारांना सोडून काँग्रेसला दिला नवा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 14:03 IST

आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांवरील विश्वास उडाला असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

Prakash Ambedkar Letter ( Marathi News ) : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीची विरोधकांच्या महाविकास आघाडीसोबत सुरू असलेली बोलणी फिसकटल्याचं दिसत आहे. कारण आंबेडकर यांनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहीत आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांवरील विश्वास उडाला असून आम्ही काँग्रेसला सात लोकसभा मतदारसंघांमध्ये आमचा संपूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहोत, असा प्रस्ताव दिला आहे. काँग्रेसने आपल्या निवडीच्या कोणत्याही सात जागा सुचवाव्यात, त्या जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. 

मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या पत्रात प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे की, "भारत जोडो यात्रेच्या समारोप सभेवेळी तुम्हाला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. या भेटीवेळी आपली सविस्तर चर्चा होऊ न शकल्याने मी आज आपणास हे पत्र लिहीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली असून वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण न देता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सतत बैठका होत आहेत. आमच्यासोबत झालेल्या काही बैठकींमध्ये वंचितच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांनी नकार दिला. महाविकास आघाडीत या दोन्ही पक्षांचा वंचित बहुजन आघाडीविषयी असलेल्या चुकीच्या दृष्टीकोनामुळे आमचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे," अशा शब्दांत आंबेडकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसला नवा प्रस्ताव देत आंबेडकर म्हणाले, "हुकूमशाही, विभाजनकारी आणि लोकशाहीविरोधी भाजप-आरएसएसचं सरकार घालवण्याचा आमचा मुख्य अजेंडा अजूनही कायम आहे. त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रातील सात जागांवर मी वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला मिळालेल्या कोणत्याही सात जागांची आपण मला यादी द्यावी. आमचा पक्ष तुम्ही निवडलेल्या या सात जागांवर काँग्रेसला संपूर्ण पाठिंबा देईल." 

दरम्यान, काँग्रेससोबतच्या आघाडीबाबतही प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे. "वंचित आघाडी आपल्याला देत असलेला हा प्रस्ताव सौजन्यपूर्ण तर आहेच, शिवाय भविष्यातील आपल्या संभाव्य आघाडीच्या दृष्टीकोनातून पुढे केलेला हा मैत्रीचा हातही आहे," असं आंबेडकर यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे