शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

सरकारच्या स्थिरतेबद्दल सातत्याने टीकाटिपणी करणाऱ्यांना ही द्विवर्षपूर्ती हेच खरेखुरे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 9:23 AM

Two years Of Mahavikas Aghadi: सरकारच्या स्थिरतेबद्दल सातत्याने टीकाटिपणी करणारे विश्लेषक, राजकीय विरोधकांसाठी ही द्विवर्षपूर्ती हेच खरेखुरे उत्तर आहे. वैचारिक भिन्नता असली तरी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि किमान समान कार्यक्रमाच्या झेंड्याखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.

बाळासाहेब थोरात  (महसूल मंत्री)सरकारच्या स्थिरतेबद्दल सातत्याने टीकाटिपणी करणारे विश्लेषक, राजकीय विरोधकांसाठी ही द्विवर्षपूर्ती हेच खरेखुरे उत्तर आहे. वैचारिक भिन्नता असली तरी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि किमान समान कार्यक्रमाच्या झेंड्याखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. गरीब माणसाची उन्नती हा या सरकारचा मुख्य कार्यक्रम राहिला.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, हे आश्वासन जनतेला दिले होते. त्याची पूर्ती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात करण्यात आली. शिवाय ही कर्जमाफी किचकट कागदपत्रांशिवाय आणि तत्काळ देण्यात आली. लोकांचे प्रश्न समजून घेण्याची आणि ते सोडविण्याची संवेदनशीलता असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने कोरोना विरोधात जो लढा दिला त्याचे जगभर कौतुक झाले. याउलट इतर राज्यांमध्ये दिसलेले चित्र विदारक होते, गंगेच्या पात्रात मृतदेह तरंगत होते. 

महसूल विभागाने स्टॅम्प ड्युटीत सवलत दिल्याने गृह खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली. ग्राहकांचा फायदा झाला. सरकारला महसूल मिळाला आणि बांधकाम व्यवसायात तेजी आली.

 महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात ई- पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. ८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई- पीक ॲपवर नोंदणी केली आहे. त्याआधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे सुलभ होणार आहे.

दोन वर्षांचा प्रवास सोपा नव्हता. केंद्रातील सत्ताधारी आणि त्यांच्या दबावाखाली असलेल्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी या संस्था, आयटी सेल सर्वांनी आघाडी सरकार पाडण्यासाठी नेत्यांच्या घरावर, राजकारणाशी संबंध नसलेल्या नातेवाइकांच्या घरावर धाडी घातल्या, मात्र सरकार पाडण्यात यश आले नाही. 

काँग्रेसचे सर्व मंत्री लोकहिताच्या दृष्टीने निर्णय घेत आहेत. जनतेलाही काँग्रेसची भूमिका पटलेली आहे. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये घवघवीत यश मिळाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी