शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील अपघातात द्या माणुसकीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 20:16 IST

रस्त्यावर एखाद्याचा अपघात झाल्यास त्या जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी नागरिक बघ्याची भूमिका घेताना दिसतात...

ठळक मुद्देसुप्रीम कोर्टाच्या तत्वांनुसार स्वत:चे नाव व पत्ता पोलिसांनी सांगणे बंधनकारक नाही.

पुणे :  रस्त्यावर एखाद्याचा अपघात झाल्यास त्या जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी नागरिक बघ्याची भूमिका घेताना दिसतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे अशा व्यक्तींना वाटणारी कोर्ट कचे-यांची व पोलिसांकडून दिल्या जाणा-या त्रासाची भीती. त्या अपघातग्रस्त व्यक्तीला जर वेळीच उपचार मिळाले तर त्याचे प्राण नक्कीच वाचू शकतात. यासाठी महाराष्ट्र आथोर्पेडिक असोसिएशन (एमओए) तर्फे 28 एप्रिल ते 5 मे दरम्यान '' रस्त्यावरील अपघातात द्या माणुसकीचा हात'' या शीर्षकाखाली विविध ठिकाणी जागरूकता प्रशि़क्षण उपक्रम राबिवले जाणार आहेत. महाराष्ट्र अथोर्पेडिक डे निमित्त हे उपक्रम प्रि-हॉस्पिटल ट्रॉमा केअर (अपघातग्रस्त व्यक्तीला रूग्णालयात दाखल करेपर्यंत घ्यावयाची काळजी) आणि नागरिकांचा सहभाग यावर केंद्रित करण्यात आले असल्याची माहिती  एमओए चे माजी अध्यक्ष डॉ.पराग संचेती, एमओए चे सदस्य डॉ.चंद्रशेखर साठ्ये,सदस्य डॉ.गोवर्धन इंगळे आणि पीओएसचे सचिव डॉ.संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.एखाद्याचा दुदेर्वाने जर कुठे अपघात झाला तर आजही लोक मदतीचा हात पुढे करायला धास्तावतात. पण हा भीतीचा दृष्टीकोन काढून टाकणे गरजेचे आहे. अपघात झालेल्या व्यक्तीला हॉस्पिटलला दाखल करण्यापूर्वी मदत करून कशी काळजी घ्यावी याची माहिती आठवडाभर चालणा-या या उपक्रमांद्वारे दिली जाणार आहे. लोकांनी अशा प्रसंगी अधिक संवेदनशीलतेने मदतीचा हात पुढे करावा हे या उपक्रमांमागचा हेतू आहे. या उपक्रमांमध्ये शैक्षणिक कार्यक्रम,शिबिरे,पथनाट्य व चित्रफितींचा समावेश असेल.डॅ.पराग संचेती म्हणाले, रस्त्यावरील अपघातात जमलेल्या गर्दीपैकी बघ्या व्यक्तींनी नुसतेच बघत न राहाता जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली पाहिजे. मात्र त्यासाठी अशा घटनांच्या वेळी सर्वप्रथम कोणती कृती करायला पाहिजे याची माहिती असणे गरजेचे आहे. अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीसाठी पुढाकार घेणा-या व्यक्तीलाच केसमध्ये अडकविण्याची भीती असते त्यामुळे सामान्य व्यक्ती मदतीसाठी पुढे येत नाहीत. सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी धावून जाणा-या व्यक्तीला ( गुड समरिटान) स्वत:चे नाव व पत्ता पोलिसांनी सांगणे बंधनकारक नाही. पोलीस अशा गुड समरिटानला अपघाताचा साक्षीदार बनण्याची सक्ती करू शकत नाही. तसेच त्याचा जबाब घेण्यासाठी त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावू शकत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी थांबा. तुमच्या मदतीने कुणाचे तरी प्राण वाचू शकणार आहेत. यासाठी हा जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आला आहे.............*अपघातग्रस्त व्यक्तीचा श्वास चालू आहे याची खात्री करून घ्या. श्वासातून घरघर येत असेल तर अशा व्यक्तीचा खालचा जबडा ( हनुवटी) हाताच्या बोटांनी उचल्यास श्वासमार्ग मोकळा होण्यास मदत होते.बेशुद्ध व्यक्तीत जीभेचा मागचा भाग घशामध्ये पडून- अडकून श्वासमार्ग बंद पडतो त्यामुळे ती व्यक्ती अपघातातील जखमांमुळे मृत्यू न पावता श्वास बंद पडल्यामुळे मृत्यू पावते. * अपघातग्रस्त व्यक्तीच्या शरीरातून होणारा रक्तस्त्राव थांबवा. कधीकधी अपघातात अति रक्तस्त्रावामुळे व्यक्तीचा मृत्यू  होऊ शकतो. अपघात स्थळी रक्तस्त्राव थांबण्यासाठी जखमेवर हाताने दबाव द्या अथवा जखमेभोवती घट्ट फडके किंवा बँडेज गुंडाळा. या दोन सोप्या कृतीने जखमेतून होणारा रक्तस्त्राव थांबू शकतो. * अपघातग्रस्त व्यक्तीचे हात/पाय मोडले असतील व वेडेवाकडे झाले असतील तर त्यांना आधार द्या. अशा फँक्चर झालेल्या हातापायांना रूग्णाला फार न दुखावता जेवढे जमेल तेवढे सरळ करा व त्यांना सहज उपलब्ध कडक वस्तुंचा ( कार्डबोर्ड, काठ्या, छत्री) आधार द्या. * जखमी व्यक्ती जर श्वास घेत असेल पण प्रतिसाद देत नसेल ( शुद्धधीवर नसेल) तर अशा व्यक्तीला कुशीवर झोपवा. कुशीवर झोपवल्यास अशा व्यक्तीचा श्वासमार्ग मोकळा राहातो. 

अपघात घडल्यास या क्रमांकावर संपर्क साधापोलीस (100)अँम्ब्युलन्स ( 108)एकात्मिक आपत्कालीन ( 112) 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय