शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

सुंदर साजिरा श्रावण आला...

By admin | Updated: August 2, 2016 23:08 IST

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे... बालकवींनी या गीतातून वर्णिलेला श्रावण हा मनामनांत चैतन्य पेरणारा

-  विजय बाविस्करश्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे... बालकवींनी या गीतातून वर्णिलेला श्रावण हा मनामनांत चैतन्य पेरणारा पाचूसारखा हिरवागार महिना. भारतीय वर्षगणतेतील या पाचव्या महिन्याच्या पौर्णिमेच्या सुमारास श्रवण नक्षत्र असते; म्हणून ह्यश्रावणह्ण नाव या महिन्याला पडले. श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन. हिरव्या रंगांची विशाल वस्त्रे एकावर एक लपेटून उभे असलेले चराचर डोळ्यांचे पारणे फेडते. ज्येष्ठात सुरू झालेला पावसाळा श्रावणात चांगलाच स्थिरावलेला असतो. या दिवसांत ऊन-पावसाचा लपंडाव चाललेला आढळतो. क्षणात आभाळात काळ्या ढगांची पीछेहाट होऊन सूर्याची किरणे धरणीवर तेजाची बरसात करतात, तर दुसऱ्याच क्षणी गडद निळे ढग, सूर्यकिरणांना मागे सारून घननीळ बरसतो आणि रेशीमधारा रिमझिमतात. जलधारांची बरसात करू लागतात. जलबिंदूंच्या माध्यमातून सूर्याच्या सप्त रंगांचे मनोहारी दर्शन घडविणारा श्रावण... श्रावण म्हणजे निसर्गाची रंगपंचमी. ओल्या मातीतून, गंधातून पुलकित करणाऱ्या या काळात नव्या पानाफुलांच्या आगमनाने श्रावणाच्या बहराला पूर्तता येते. याच महिन्यात जाईजुई, पारिजात, सोनचाफा इ. फुलांच्या वेलींना व झाडांना बहर येतो व त्यांच्या सुवासाने आसमंत दरवळून जातो. श्रावणातल्या संध्याकाळी, मावळत्या सूर्याला निरोप देणारे ढग, विविध रंगांनी नटूनथटून पश्चिमेच्या क्षितिजापाशी गोळा होतात. सूर्यबिंबाला त्या वेळी सौम्य, शांत अशी वेगळीच रुपेरी झळाळी प्राप्त झालेली असते. या सृष्टिसौंदर्याच्या मोहातूनच कविवर्य मंगेश पाडगावकरांनी श्रावणात घन निळा बसरला रिमझिम रेशीमधारा, उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा असे यर्थाथ वर्णन केले आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक तिथीला कोणते ना कोणते धर्मकृत्य असते; पण त्यातील सोमवार हा विशेष मानतात. दर सोमवारी फक्त रात्री एक वेळ जेवून शिवव्रत करण्याची प्रथा आहे. दर मंगळवारी नवविवाहिता मंगळागौरीची पूजा करतात. तर, भाविक स्त्रिया शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून सवाष्णीला पुरणपोळीचं जेवण घालतात. संध्याकाळी स्त्रियांना हळदी-कुंकू देतात. रविवार म्हणजे आदित्यवार. या दिवशी आदित्याची म्हणजेच सूर्याची पूजा करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. श्रावण महिना अनेक व्रतवैकल्ये आणि सणांनी सजलेला आहे. शुद्ध पंचमीला नागाची पूजा करून नागपंचमी साजरी होते. आजही कविवर्य गदिमांनी लिहिलेले व भावगीतगायक गजाननराव वाटवे यांनी अजरामर केलेले ह्यफांद्यावरी बांधिले गं मुलिंनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओलेह्ण हे गीत स्त्रीवर्गात तितकेच लोकप्रिय आहे. श्रावण पौर्णिमेला येणाऱ्या नारळी पौर्णिमेला नदी आणि समुद्रालगत राहणारे कोळी बांधव नदी वा समुद्राची पूजा करून त्यांना नारळ अर्पण करतात. या दिवसाला राखी पौर्णिमा असेही म्हणतात. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून हे पवित्र नाते अधिक घट्ट करते. याच दिवशी सुताची पोवती करून विष्णू, शिव, सूर्य इ. देवतांना अर्पण करतात म्हणून या तिथीला पोवती पौर्णिमाही म्हणतात. याच दिवशी नवीन यज्ञोपवीत धारण करण्याची ब्राह्मण पुरुषांची परंपरागत प्रथा आहे. या विधीला श्रावणी असे म्हणतात. श्रावणातल्या वद्य अष्टमीला श्रीकृष्णांचा जन्मदिन असतो. म्हणून तिला जन्माष्टमी किंवा कृष्णाष्टमी म्हणतात. नवमीला गोपाळकाला हा दहीहंडी उत्सव साजरा होतो. श्रावणी अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हटले जाते. गावागावांमधून या दिवशी बैलपोळ्याचा सण साजरा करतात. उत्तर भारतात या महिन्यात झुलन यात्रा, रक्षाबंधन, जन्माष्टमी व नंदोत्सव हे उत्सव विशेष महत्त्वाचे मानतात. पौर्णिमेच्या दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात व स्त्रिया त्यांच्यासंबंधी गीते गातात. हा उत्सव एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत चालतो. गीत, वाद्य वगैरेंच्या साह्याने घरोघरी तो उत्साहात साजरा होतो. या दिवसांत राधा-कृष्णांची पूजा करतात. घरोघरी कृष्णचरित्रातील काही भाग नाट्यरूपात सादर केला जातो. कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव करतात. नंदाला पुत्र झाला, या समजुतीने गीत, नृत्य, नाट्य यांच्या द्वारे हा उत्सव साजरा करतात. तसेच, या दिवशी हळदी-कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने अंगावर उडवतात. आषाढात सुरू झालेल्या चातुर्मासातील सर्वांत श्रेष्ठ मास म्हणून श्रावण महिन्याचे महत्त्व आहे. वसंतऋतूपेक्षा वेगळ्या तऱ्हेच्या पावसाळी फुलांनी हिरव्यागार वृक्षलतांनी नटलेली विलक्षण चिरसुगंधी विविधरंगी फुले हसऱ्या-नाचऱ्या श्रावणाला लाजरा बनवतात. म्हणूनच ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्याच शब्दात सांगयचे तर -हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आलाकवींना भुरळ घालणारा, सृजनाला आवाहन करणारा असा हा आनंदाचा धनी असलेला श्रावण खरोखरच मनभावन आहे.