शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

सुंदर साजिरा श्रावण आला...

By admin | Updated: August 2, 2016 23:08 IST

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे... बालकवींनी या गीतातून वर्णिलेला श्रावण हा मनामनांत चैतन्य पेरणारा

-  विजय बाविस्करश्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे... बालकवींनी या गीतातून वर्णिलेला श्रावण हा मनामनांत चैतन्य पेरणारा पाचूसारखा हिरवागार महिना. भारतीय वर्षगणतेतील या पाचव्या महिन्याच्या पौर्णिमेच्या सुमारास श्रवण नक्षत्र असते; म्हणून ह्यश्रावणह्ण नाव या महिन्याला पडले. श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन. हिरव्या रंगांची विशाल वस्त्रे एकावर एक लपेटून उभे असलेले चराचर डोळ्यांचे पारणे फेडते. ज्येष्ठात सुरू झालेला पावसाळा श्रावणात चांगलाच स्थिरावलेला असतो. या दिवसांत ऊन-पावसाचा लपंडाव चाललेला आढळतो. क्षणात आभाळात काळ्या ढगांची पीछेहाट होऊन सूर्याची किरणे धरणीवर तेजाची बरसात करतात, तर दुसऱ्याच क्षणी गडद निळे ढग, सूर्यकिरणांना मागे सारून घननीळ बरसतो आणि रेशीमधारा रिमझिमतात. जलधारांची बरसात करू लागतात. जलबिंदूंच्या माध्यमातून सूर्याच्या सप्त रंगांचे मनोहारी दर्शन घडविणारा श्रावण... श्रावण म्हणजे निसर्गाची रंगपंचमी. ओल्या मातीतून, गंधातून पुलकित करणाऱ्या या काळात नव्या पानाफुलांच्या आगमनाने श्रावणाच्या बहराला पूर्तता येते. याच महिन्यात जाईजुई, पारिजात, सोनचाफा इ. फुलांच्या वेलींना व झाडांना बहर येतो व त्यांच्या सुवासाने आसमंत दरवळून जातो. श्रावणातल्या संध्याकाळी, मावळत्या सूर्याला निरोप देणारे ढग, विविध रंगांनी नटूनथटून पश्चिमेच्या क्षितिजापाशी गोळा होतात. सूर्यबिंबाला त्या वेळी सौम्य, शांत अशी वेगळीच रुपेरी झळाळी प्राप्त झालेली असते. या सृष्टिसौंदर्याच्या मोहातूनच कविवर्य मंगेश पाडगावकरांनी श्रावणात घन निळा बसरला रिमझिम रेशीमधारा, उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा असे यर्थाथ वर्णन केले आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक तिथीला कोणते ना कोणते धर्मकृत्य असते; पण त्यातील सोमवार हा विशेष मानतात. दर सोमवारी फक्त रात्री एक वेळ जेवून शिवव्रत करण्याची प्रथा आहे. दर मंगळवारी नवविवाहिता मंगळागौरीची पूजा करतात. तर, भाविक स्त्रिया शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून सवाष्णीला पुरणपोळीचं जेवण घालतात. संध्याकाळी स्त्रियांना हळदी-कुंकू देतात. रविवार म्हणजे आदित्यवार. या दिवशी आदित्याची म्हणजेच सूर्याची पूजा करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. श्रावण महिना अनेक व्रतवैकल्ये आणि सणांनी सजलेला आहे. शुद्ध पंचमीला नागाची पूजा करून नागपंचमी साजरी होते. आजही कविवर्य गदिमांनी लिहिलेले व भावगीतगायक गजाननराव वाटवे यांनी अजरामर केलेले ह्यफांद्यावरी बांधिले गं मुलिंनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओलेह्ण हे गीत स्त्रीवर्गात तितकेच लोकप्रिय आहे. श्रावण पौर्णिमेला येणाऱ्या नारळी पौर्णिमेला नदी आणि समुद्रालगत राहणारे कोळी बांधव नदी वा समुद्राची पूजा करून त्यांना नारळ अर्पण करतात. या दिवसाला राखी पौर्णिमा असेही म्हणतात. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून हे पवित्र नाते अधिक घट्ट करते. याच दिवशी सुताची पोवती करून विष्णू, शिव, सूर्य इ. देवतांना अर्पण करतात म्हणून या तिथीला पोवती पौर्णिमाही म्हणतात. याच दिवशी नवीन यज्ञोपवीत धारण करण्याची ब्राह्मण पुरुषांची परंपरागत प्रथा आहे. या विधीला श्रावणी असे म्हणतात. श्रावणातल्या वद्य अष्टमीला श्रीकृष्णांचा जन्मदिन असतो. म्हणून तिला जन्माष्टमी किंवा कृष्णाष्टमी म्हणतात. नवमीला गोपाळकाला हा दहीहंडी उत्सव साजरा होतो. श्रावणी अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हटले जाते. गावागावांमधून या दिवशी बैलपोळ्याचा सण साजरा करतात. उत्तर भारतात या महिन्यात झुलन यात्रा, रक्षाबंधन, जन्माष्टमी व नंदोत्सव हे उत्सव विशेष महत्त्वाचे मानतात. पौर्णिमेच्या दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात व स्त्रिया त्यांच्यासंबंधी गीते गातात. हा उत्सव एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत चालतो. गीत, वाद्य वगैरेंच्या साह्याने घरोघरी तो उत्साहात साजरा होतो. या दिवसांत राधा-कृष्णांची पूजा करतात. घरोघरी कृष्णचरित्रातील काही भाग नाट्यरूपात सादर केला जातो. कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव करतात. नंदाला पुत्र झाला, या समजुतीने गीत, नृत्य, नाट्य यांच्या द्वारे हा उत्सव साजरा करतात. तसेच, या दिवशी हळदी-कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने अंगावर उडवतात. आषाढात सुरू झालेल्या चातुर्मासातील सर्वांत श्रेष्ठ मास म्हणून श्रावण महिन्याचे महत्त्व आहे. वसंतऋतूपेक्षा वेगळ्या तऱ्हेच्या पावसाळी फुलांनी हिरव्यागार वृक्षलतांनी नटलेली विलक्षण चिरसुगंधी विविधरंगी फुले हसऱ्या-नाचऱ्या श्रावणाला लाजरा बनवतात. म्हणूनच ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्याच शब्दात सांगयचे तर -हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आलाकवींना भुरळ घालणारा, सृजनाला आवाहन करणारा असा हा आनंदाचा धनी असलेला श्रावण खरोखरच मनभावन आहे.