शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अल्पावधीचा मुक्काम ठरतोय मारक, पोषण आहार देण्यात अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 05:55 IST

रोजगारासाठी परक्या मुलखात येणाऱ्या कामगारांना एका ठिकाणी अगदी सव्वा ते दीड महिन्याचा रोजगार मिळतो.

- प्रगती जाधव-पाटीलसातारा : रोजगारासाठी परक्या मुलखात येणाऱ्या कामगारांना एका ठिकाणी अगदी सव्वा ते दीड महिन्याचा रोजगार मिळतो. रोजगारासाठी त्यांच्या भटकंतीचे हे चक्र निश्चित ठरलेले आहे. या चक्रात दुर्दैवाने मुलांच्या शिक्षणाचा आणि पोषणाचा विषय कुठेच अजेंड्यावर नसतो. परिणामी, शासकीय योजना आणि आहार नियमितपणे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही.दुष्काळी टप्प्यातून सधन टापूत कामानिमित्त येणाºया कामगार आणि त्यांच्या मुलांसाठी शासनस्तरावर अनोख्या योजना असल्या तरी त्या निव्वळ कागदावरच आहेत. बीड जिल्ह्यातून बहुतांश ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्राकडे वळतात. ही टोळी पिढ्यान्पिढ्या त्याच शेतावर आणि कारखान्यावर येऊन काम करतात; पण कामगारांसह दाखल होणाºया त्यांच्या मुलांना ट्रॅक करणे आणि आहार, आरोग्य सुविधा पुरविणे शासकीय यंत्रणांना कठीण जात आहे. शासकीय यंत्रणांना साखर शाळेसाठी स्वतंत्र अंगणवाडीसेविका देण्याची तरतूद नाही. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळात महिला व बालविकास विभाग या मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. कित्येकदा या मुलांपर्यंत आहार पोहोचवला जातो; पण तो शिजवून देणेही पालकांना शक्य होत नाही.ऊसतोड कामगारांचा दिवस पहाटे तीन वाजता सुरू होतो. रात्री केलेले अन्न डब्यात भरून ही टोळी मुलांना घेऊन शेतात पोहोचते. सकाळी आठ आणि दुपारी साधारण एक वाजता त्यांच्या जेवणाच्या वेळा असतात. त्यानंतर सायंकाळी चार वाजेपर्यंत टोळी घरी पोहोचते. अंघोळ करून दोन्ही वेळचा स्वयंपाक एकदाच करून या महिला झोपी जातात. त्यांच्या या दिनक्रमात शासकीय कार्यालयाची वेळ निघून जाते. त्यामुळे मुलांना पोषण आहार मिळणे किंवा त्यांचे लसीकरण लांबत जाते आणि त्यांनतर ते विस्मृतीत जाते.दुसरीकडे चारा छावणीतील मुलांपर्यंत आहार आणि लसीकरण पोहोचवले जाते. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने या मुलांना ट्रॅक करणे सहज शक्य होते. एकाच ठिकाणी चार महिन्यांचा सलग मुक्काम हे त्याचे मुख्य कारण असल्याचे मानले जाते.हे करणे आहे शक्यकामगारांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी साखर कारखान्यांना द्यावी.रिक्त असलेली अंगणवाडीआणि मदतनीस पदे भरावीत.स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग वाढवून मुलांपर्यंत पोषण आहार पोहोचवणे.बालविवाहाचे प्रमाणही लक्षणीयऊसतोड कामगार गावात अवघे तीन महिने राहतात. बाकीच्या वेळी ते कुटुंबाबरोबर कामाच्या गावांमध्ये स्थलांतर करतात.या स्थलांतरातून ज्येष्ठ आणि मुलींना वगळण्यात येते; पण गावाकडे आजी-आजोबांबरोबर राहणाºया या मुलींच्या संरक्षणाची काहीच सोय नसते. त्यामुळे येथील मुलींचा बालविवाह करण्याकडे पालकांचा कल दिसतो. लैंगिक शोषणाच्या भीतीने हे बालविवाह करण्यात येत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.हंगामी सेविकांची नेमणूक करून पोषणआहार आणि शिक्षणाची सोय करावी.हंगामी पाळणाघराची व्यवस्था करावी.सक्षम साखर शाळा निर्माण करणे.परजिल्ह्यातून येणाºया कामगारांबरोबर मुलांची नोंद शासनाकडे करणेबंधनकारक असावी.स्थलांतरित होणाºया ६ ते १४ वर्षांच्या मुलांची संख्या बीडपासून सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर आणि कर्नाटकचा काही भागसरासरी पाहिले तर ऊसतोड कामगारांच्या मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढते आहे. याचे कारण त्यांची दिनचर्या हेच आहे. पिठले आणि बाजरीची भाकरी हे त्यांचे नियमित अन्न आहे. एकाच वेळी चार दिवस पुरतील एवढ्या भाकरी करून या महिला शेतावर कामाला जातात. त्यांच्यामागे येणारी मुले अनेकदा भूक लागली म्हणून ऊस खातात. यामुळे मुलांची भूक मरते व त्यांच्यात कुपोषण वाढत जाते. या मुलांचे पोट वाढते आणि हाता-पायाच्या काड्या होतात.- दीपक नागरगोजे, शांतीवन, बीड 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य