शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 18:10 IST

बारामतीमध्ये बोलताना अजित पवार यांनी मुख्ममंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं होतं. त्यावर आता शरद पवार गटाने प्रतिक्रिया दिली आहे.

Jitendtra Awhad On Ajit Pawar : पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषणवणाऱ्या अजित पवारांना मुख्यमंत्री पदाने नेहमीच हुलकावणी दिली आहे. मात्र आता गेल्या काही काळापासून अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा त्यांच्या कार्यकर्त्यांनीही वारंवार बोलून दाखवली आहे.अशातच आता एका मुलाखतीदरम्यान अजित पवार यांनी २००४ मध्ये मला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं मात्र शरद पवारांनी त्यास नकार दिला असा आरोप केला आहे. यावर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.

२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाची संधी होती. छगन भुजबळ, आबा पाटील किंवा मला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं. जर माझ्या नशिबात असतं तर मीही मुख्यमंत्री झालो असतो. मुख्यमंत्रीपद आलं होतं मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला, असं वक्तव्य  अजित पवार यांनी बारामतीतील प्रचारसभेत केलं होतं. त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत ज्या वेळेस अजित पवारांना १४५ हा मॅजिक फिगर गाठता येईल. त्यावेळी मी मुख्यमंत्री होईल, असे म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी दिलं प्रत्युत्तर

यावर आता प्रत्त्युतर देताना जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना एक नंबरचे स्वार्थी असल्याचे म्हटलं आहे. "सन २००४ मध्ये मला साहेबांनी मुख्यमंत्री केले नाही, असे अजित पवार खासगीमध्ये बोलत आहेत. सन २००४ मध्ये नक्कीच राष्ट्रवादीच्या जास्त जागा निवडून आल्या होत्या. पण त्या जास्तीच्या जागा तुमच्यामुळे नाही तर कै.आर.आर. पाटील  यांच्यामुळे आल्या होत्या. आर.आर. पाटील यांनीच जेम्स लेन प्रकरणात कारवाई केली होती. समाज पेटून उठलेला असतानाही आम्ही जेव्हा जेम्स लेन आणि पुरंदरे यांच्यावर बोलत होतो. तेव्हा तुम्ही बोलू नका, असे सांगत होतात. २००४ मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी पद्मसिंह पाटील,  विजयसिंह मोहिते-पाटील, आर.आर. पाटील, जयंत पाटील , मधुकरराव पिचड हेच लायक उमेदवार होते. पण या सर्व ज्येष्ठ नेत्यांना सोडून अजित पवार यांना मुख्यमंत्री केले असते तर जनमाणसात वाईट संदेश गेला असता म्हणून शरद पवार यांनी राजकीय मुत्सद्दीपणा दाखवून ५ अतिरिक्त महत्वाची मंत्रिपदे राष्ट्रवादीच्या वाट्याला मिळवून घेतली. अजित पवार तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद दिले. आता तुमच्या या खासगीतील चर्चेमुळे तुमचे स्वार्थाचे गणित उघड झाले आहे. साहेबांनी आपणाला मुख्यमंत्री केले नाही, हे सांगून अजित पवार हेच आता अप्रत्यक्ष सांगत आहेत की ,मी स्वार्थी नंबर १ आहे !," असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

२०१४ ला साहेबांच्या मताप्रमाणे भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला होता. २००४ साली मुख्यमंत्री मिळाले असते परंतु काँग्रेसला पद दिले. मी विकासासाठी मत मागतोय. मला बारामतीने आजपर्यंत भरभरून दिले आहे. विरोधकांना पंतप्रधान यांच्यावर टीका करायला जागा नाही, अशी टीका अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे बोलताना केली होती. 

दरम्यान २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा असूनही महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद काँग्रेसला मिळाले होते. त्यावेळी अजित पवार २००४ साली मुख्यमंत्री होऊ शकले असते. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सूत्रानुसार मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळणारच होतं. मात्र तसं झालं नाही आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४baramati-pcबारामतीAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाड