शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 18:10 IST

बारामतीमध्ये बोलताना अजित पवार यांनी मुख्ममंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं होतं. त्यावर आता शरद पवार गटाने प्रतिक्रिया दिली आहे.

Jitendtra Awhad On Ajit Pawar : पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषणवणाऱ्या अजित पवारांना मुख्यमंत्री पदाने नेहमीच हुलकावणी दिली आहे. मात्र आता गेल्या काही काळापासून अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा त्यांच्या कार्यकर्त्यांनीही वारंवार बोलून दाखवली आहे.अशातच आता एका मुलाखतीदरम्यान अजित पवार यांनी २००४ मध्ये मला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं मात्र शरद पवारांनी त्यास नकार दिला असा आरोप केला आहे. यावर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.

२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाची संधी होती. छगन भुजबळ, आबा पाटील किंवा मला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं. जर माझ्या नशिबात असतं तर मीही मुख्यमंत्री झालो असतो. मुख्यमंत्रीपद आलं होतं मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला, असं वक्तव्य  अजित पवार यांनी बारामतीतील प्रचारसभेत केलं होतं. त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत ज्या वेळेस अजित पवारांना १४५ हा मॅजिक फिगर गाठता येईल. त्यावेळी मी मुख्यमंत्री होईल, असे म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी दिलं प्रत्युत्तर

यावर आता प्रत्त्युतर देताना जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना एक नंबरचे स्वार्थी असल्याचे म्हटलं आहे. "सन २००४ मध्ये मला साहेबांनी मुख्यमंत्री केले नाही, असे अजित पवार खासगीमध्ये बोलत आहेत. सन २००४ मध्ये नक्कीच राष्ट्रवादीच्या जास्त जागा निवडून आल्या होत्या. पण त्या जास्तीच्या जागा तुमच्यामुळे नाही तर कै.आर.आर. पाटील  यांच्यामुळे आल्या होत्या. आर.आर. पाटील यांनीच जेम्स लेन प्रकरणात कारवाई केली होती. समाज पेटून उठलेला असतानाही आम्ही जेव्हा जेम्स लेन आणि पुरंदरे यांच्यावर बोलत होतो. तेव्हा तुम्ही बोलू नका, असे सांगत होतात. २००४ मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी पद्मसिंह पाटील,  विजयसिंह मोहिते-पाटील, आर.आर. पाटील, जयंत पाटील , मधुकरराव पिचड हेच लायक उमेदवार होते. पण या सर्व ज्येष्ठ नेत्यांना सोडून अजित पवार यांना मुख्यमंत्री केले असते तर जनमाणसात वाईट संदेश गेला असता म्हणून शरद पवार यांनी राजकीय मुत्सद्दीपणा दाखवून ५ अतिरिक्त महत्वाची मंत्रिपदे राष्ट्रवादीच्या वाट्याला मिळवून घेतली. अजित पवार तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद दिले. आता तुमच्या या खासगीतील चर्चेमुळे तुमचे स्वार्थाचे गणित उघड झाले आहे. साहेबांनी आपणाला मुख्यमंत्री केले नाही, हे सांगून अजित पवार हेच आता अप्रत्यक्ष सांगत आहेत की ,मी स्वार्थी नंबर १ आहे !," असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

२०१४ ला साहेबांच्या मताप्रमाणे भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला होता. २००४ साली मुख्यमंत्री मिळाले असते परंतु काँग्रेसला पद दिले. मी विकासासाठी मत मागतोय. मला बारामतीने आजपर्यंत भरभरून दिले आहे. विरोधकांना पंतप्रधान यांच्यावर टीका करायला जागा नाही, अशी टीका अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे बोलताना केली होती. 

दरम्यान २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा असूनही महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद काँग्रेसला मिळाले होते. त्यावेळी अजित पवार २००४ साली मुख्यमंत्री होऊ शकले असते. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सूत्रानुसार मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळणारच होतं. मात्र तसं झालं नाही आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४baramati-pcबारामतीAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाड